शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नरसापुरात तुटल्या पक्षभेदाच्या श्रृंखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:11 IST

गावगाड्याच्या राजकारणात पक्षीय नेत्यांमधून विस्तवही जात नाही. वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांवर कुरघोडी करण्यातच सर्व धन्यता मानतात. मात्र गाव पाणीदार करण्यासाठी याच गावपुढाऱ्यांसह सामान्य ग्रामस्थांनी आता एकमेकांचा हात पकडून खांद्याला-खांदा लावून श्रमदान केल्याचा अनुभाव तालुक्यातील नरसापूर येथे आला.

ठळक मुद्देमहाश्रमदान : पाणीदार गावासाठी नागरिक एकवटले

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गावगाड्याच्या राजकारणात पक्षीय नेत्यांमधून विस्तवही जात नाही. वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांवर कुरघोडी करण्यातच सर्व धन्यता मानतात. मात्र गाव पाणीदार करण्यासाठी याच गावपुढाऱ्यांसह सामान्य ग्रामस्थांनी आता एकमेकांचा हात पकडून खांद्याला-खांदा लावून श्रमदान केल्याचा अनुभाव तालुक्यातील नरसापूर येथे आला.नरसापूर येथील ग्राम सुधार समितीतर्फे महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. त्यासाठी आमदार प्रा.डॉ. अशोक उईके, माजी आमदार प्रा. वसंत पुरके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख या परंपरागत विरोधकांनी एकत्र येऊन हातात टिकास, पावडे व टोपले घेत जलसंधारणाचे काम केले. अनेकदा एकमेकांच्या कार्याला विरोध करणाºया या तीन नेत्यांत श्रमदानासाठी झालेली एकी अनेकांना सुखद धक्का देऊन गेली. त्यामुळे गावकरी व बाहेरुन आलेल्या शेकडो लोकांचा उत्साह द्विगुणीत झाला.श्रमदानामध्ये उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, चिंतामणी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, वनपरिक्षेत्राधिकारी नितीन वानखडे, तालुका कृषी अधिकारी संजय पाठक, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, सोनाली चव्हाण, प्राचार्य अविनाश शिर्के, डॉ. विजय कावलकर, प्रा. घनशाम दरणे, नायब तहसीलदार देशपांडे, कहारे, बावणे, उपनगराध्यक्ष मनोज काळे, नगरसेवक राजू पड्डा, अशोक उमरतकर, मुन्ना लाखीयाँ, रुपेश राऊत, अशोक बागडे, अर्चना दवारे, योगेश बोटरे यांच्यासह सर्व विभागातील कर्मचारी व हजारो लोकांचा सहभाग होता.अनेकांनी केले सहकुटूंब श्रमदानया महाश्रमदानात प्रवीण देशमुख, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार भोसले, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांसह अनेकांनी सहपरिवार श्रमदान केले. यामुळे लोकांचा उत्साह आणखी वाढला. श्रमदान सुरू असतानाच मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेलेले जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना नरसापूर येथे महाश्रमदानात हजारो नागरिकांनी सहभाग घेतल्याची माहिती देण्यात आली. डॉ. देशमुख यांनी लगेच संदीपकुमार अपार यांच्या भ्रमणध्वनीवरुन उपस्थितांशी हितगूज केले. गावकऱ्यांच्या कार्याची स्तुती केली. विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी यापूर्वीच शिवारफेरी काढली होती.