शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 02:42 IST

उरण फाटा येथील पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड पडले असून अनेक ठिकाणी तडे गेल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : उरण फाटा येथील पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड पडले असून अनेक ठिकाणी तडे गेल्याचे देखील पाहायला मिळत आहे. यामुळे पुलांवरून दररोज शेकडो वाहनांमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, तर गतवर्षात याच पुलावर सर्वाधिक गंभीर अपघात घडलेले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराकडून परिस्थितीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.सायन-पनवेल मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. त्यात उरण फाटा येथील पुलाचाही समावेश आहे. मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणारी वाहने व जेएनपीटीकडे जाणारे कंटेनर यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी व्हायची. शिवाय अपघातांच्या घटना देखील त्याठिकाणी घडत होत्या. यामुळे त्याठिकाणी हा उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे. मात्र पुलाचे काम झाल्यापासूनच त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रसंग त्याठिकाणी घडत आहेत. गतवर्षी पुलावर डांबरीकरणात झालेल्या निष्काळजीमुळे वाहनांच्या अपघाताची मालिका सुरू होती. त्यात एकाचा प्राण देखील गेला असून याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला होता. त्यानंतरही या पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काही वर्षातच या पुलाच्या सुरक्षा कठड्याला जागोजागी तडे गेले आहेत. सीबीडीकडून वाशीकडे येणाºया मार्गाच्या कठड्यावर हे तडे सर्वाधिक दिसून येत आहेत. तडे गेल्याने सुरक्षा कठड्याचे वेगवेगळे भाग झाले असून, ते देखील कोणत्याही क्षणी कोसळतील अशा स्थितीत आहेत. अशावेळी एखाद्या जड वाहनाचा अपघात होवून त्याची पुलाच्या कठड्याला धडक बसल्यास ते वाहन कठड्यासह खाली कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.पुलावरील त्याच मार्गाच्या उतारापूर्वी काही अंतर अगोदर सुरक्षा कठड्याचा मोठा भाग कोसळलेला आहे. कठड्याचा हा भाग मागील पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून त्याच ठिकाणी ठेवलेला आहे. यामुळे पुलावरून उतरत असलेले एखादे भरधाव वाहन त्याठिकाणी पुलावरून खाली कोसळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. अशातच भर पावसात पुलावरून पाण्याचे पाट वाहत आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पुलाच्या कडेला ठरावीक अंतरावर होल करण्यात आले आहेत. मात्र पाण्यासोबत वाहत आलेला मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा त्यात अडकल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे पुलावरील पाण्याचा निचरा होत नसून ते पुलावरूनच उताराच्या दिशेने वाहत आहे. यामुळे अगोदरच निसरडा असलेल्या पुलावरून वाहणाºया पाण्यामुळे भरधाव वेगाने धावणाºया वाहनांसाठी अपघातजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. पुलावरील या दुरवस्थेचे उघड दर्शन घडत असतानाही त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजिक बांधकाम विभागासह ठेकेदाराचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परंतु त्यांचा हा निष्काळजीपणा भविष्यात दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. यामुळे पुलावरून ये-जा करणाºया प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.>कठड्याची उंची धोकादायकउरण फाट्यावरील पुलासह सायन-पनवेल मार्गावरील इतरही पुलांच्या सुरक्षा कठड्याच्या उंचीमुळे देखील अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. कठड्याची उंची कमी असल्याने एखाद्या अपघातामध्ये दुचाकीस्वार अथवा जड वाहन कठड्यावरून खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच भीतीने दुचाकीस्वारांना डाव्या बाजूने जाताना कठड्यापासून काहीसे लांबूनच चालावे लागत आहे. त्यामुळे मधल्या लेनमध्ये दुचाकी आल्यास पाठीमागून येणाºया दुसºया भरधाव वाहनांची त्यांना धडक बसणार नाही याची खबरदारी बाळगावी लागत आहे.उरण फाटा येथील पुलावर डांबरीकरणावेळी झालेल्या त्रुटीमुळे रस्ता गुळगुळीत होवून अपघात घडत होते. त्याचवेळी पोलिसांनी तिथल्या परिस्थितीची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागासह ठेकेदाराला दिली होती. त्यानंतरही दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने २ जुलै २०१७ रोजी पुलावर एकापाठोपाठ अनेक वाहने घसरून घडलेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालेला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ठेकेदाराने पुलावर जागोजागी आडव्या पट्ट्या मारल्या आहेत. मात्र उर्वरित जागी गतवर्षासारखीच परिस्थिती असल्याने यंदाच्या पावसाळ्यात देखील हा पूल वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतो.