शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 02:42 IST

उरण फाटा येथील पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड पडले असून अनेक ठिकाणी तडे गेल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : उरण फाटा येथील पुलाच्या सुरक्षा कठड्याला भगदाड पडले असून अनेक ठिकाणी तडे गेल्याचे देखील पाहायला मिळत आहे. यामुळे पुलांवरून दररोज शेकडो वाहनांमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, तर गतवर्षात याच पुलावर सर्वाधिक गंभीर अपघात घडलेले असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराकडून परिस्थितीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.सायन-पनवेल मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. त्यात उरण फाटा येथील पुलाचाही समावेश आहे. मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणारी वाहने व जेएनपीटीकडे जाणारे कंटेनर यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी व्हायची. शिवाय अपघातांच्या घटना देखील त्याठिकाणी घडत होत्या. यामुळे त्याठिकाणी हा उड्डाणपूल उभारण्यात आलेला आहे. मात्र पुलाचे काम झाल्यापासूनच त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे प्रसंग त्याठिकाणी घडत आहेत. गतवर्षी पुलावर डांबरीकरणात झालेल्या निष्काळजीमुळे वाहनांच्या अपघाताची मालिका सुरू होती. त्यात एकाचा प्राण देखील गेला असून याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला होता. त्यानंतरही या पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काही वर्षातच या पुलाच्या सुरक्षा कठड्याला जागोजागी तडे गेले आहेत. सीबीडीकडून वाशीकडे येणाºया मार्गाच्या कठड्यावर हे तडे सर्वाधिक दिसून येत आहेत. तडे गेल्याने सुरक्षा कठड्याचे वेगवेगळे भाग झाले असून, ते देखील कोणत्याही क्षणी कोसळतील अशा स्थितीत आहेत. अशावेळी एखाद्या जड वाहनाचा अपघात होवून त्याची पुलाच्या कठड्याला धडक बसल्यास ते वाहन कठड्यासह खाली कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.पुलावरील त्याच मार्गाच्या उतारापूर्वी काही अंतर अगोदर सुरक्षा कठड्याचा मोठा भाग कोसळलेला आहे. कठड्याचा हा भाग मागील पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून त्याच ठिकाणी ठेवलेला आहे. यामुळे पुलावरून उतरत असलेले एखादे भरधाव वाहन त्याठिकाणी पुलावरून खाली कोसळण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. अशातच भर पावसात पुलावरून पाण्याचे पाट वाहत आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी पुलाच्या कडेला ठरावीक अंतरावर होल करण्यात आले आहेत. मात्र पाण्यासोबत वाहत आलेला मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा त्यात अडकल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे पुलावरील पाण्याचा निचरा होत नसून ते पुलावरूनच उताराच्या दिशेने वाहत आहे. यामुळे अगोदरच निसरडा असलेल्या पुलावरून वाहणाºया पाण्यामुळे भरधाव वेगाने धावणाºया वाहनांसाठी अपघातजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. पुलावरील या दुरवस्थेचे उघड दर्शन घडत असतानाही त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजिक बांधकाम विभागासह ठेकेदाराचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परंतु त्यांचा हा निष्काळजीपणा भविष्यात दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतो. यामुळे पुलावरून ये-जा करणाºया प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.>कठड्याची उंची धोकादायकउरण फाट्यावरील पुलासह सायन-पनवेल मार्गावरील इतरही पुलांच्या सुरक्षा कठड्याच्या उंचीमुळे देखील अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. कठड्याची उंची कमी असल्याने एखाद्या अपघातामध्ये दुचाकीस्वार अथवा जड वाहन कठड्यावरून खाली कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच भीतीने दुचाकीस्वारांना डाव्या बाजूने जाताना कठड्यापासून काहीसे लांबूनच चालावे लागत आहे. त्यामुळे मधल्या लेनमध्ये दुचाकी आल्यास पाठीमागून येणाºया दुसºया भरधाव वाहनांची त्यांना धडक बसणार नाही याची खबरदारी बाळगावी लागत आहे.उरण फाटा येथील पुलावर डांबरीकरणावेळी झालेल्या त्रुटीमुळे रस्ता गुळगुळीत होवून अपघात घडत होते. त्याचवेळी पोलिसांनी तिथल्या परिस्थितीची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागासह ठेकेदाराला दिली होती. त्यानंतरही दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने २ जुलै २०१७ रोजी पुलावर एकापाठोपाठ अनेक वाहने घसरून घडलेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झालेला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ठेकेदाराने पुलावर जागोजागी आडव्या पट्ट्या मारल्या आहेत. मात्र उर्वरित जागी गतवर्षासारखीच परिस्थिती असल्याने यंदाच्या पावसाळ्यात देखील हा पूल वाहनचालकांसाठी धोकादायक ठरू शकतो.