शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

‘अमृत’साठी फोडलेल्या रस्त्यांवर ब्रेकडाऊन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:49 IST

शहरासाठी ३०२ कोटींच्या अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्वत्र पाईप लाईन टाकण्यासाठी झालेल्या खोदकामाच्या ठिकाणी चिखल आणि मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

ठळक मुद्देशहरात सर्वत्र चिखल : अपघात वाढले, घरांचा परिसर तुडुंब भरला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरासाठी ३०२ कोटींच्या अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्वत्र पाईप लाईन टाकण्यासाठी झालेल्या खोदकामाच्या ठिकाणी चिखल आणि मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामध्ये वाहन घसरून किरकोळ अपघात होत आहे, तर काही ठिकाणी वाहन फसून चक्काजाम होत आहे.शहराच्या सर्वच भागात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. खोदकाम झालेल्या ठिकाणी योग्यरित्या माती टाकली गेली नाही. थातुरमातूर काम करण्यात आले. पावसाच्या पाण्यामुळे अशा ठिकाणी नाल्या तयार झाल्या आहेत. अर्धा फूटपर्यंत खोल खड्डे झाल्याने विविध प्रकारची वाहने त्यात फसत आहे. आठवडी बाजार परिसराच्या राणी झाँशी चौकात खोदलेल्या नालीत दररोज वाहन फसून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडत आहे. चर्च रोड परिसरातून मार्ग काढण्यासाठीही जागा शिल्लक राहिली नाही. शिवाय गोदणी रोड, उमरसरा, भोसा, वाघापूर, लोहारा, वडगाव आदी भागातही हीच परिस्थिती आहे. हनुमान आखाडा ते चांदणी चौक रस्त्यावरील मातीचे ढीग कायम आहेत.हिंदी हायस्कूल ते वीर वामनराव चौक रस्ता खेड्यालाही लाजविणारा झालेला आहे. आयुर्वेद महाविद्यालय परिसराचीही हिच अवस्था आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याखालून टाकलेले पाईप खोदकाम करताना काढून टाकले. आता पाणी वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने लोकांच्या घराचा परिसर तुडुंब भरलेला आहे. घरात पाणी शिरायचे तेवढे बाकी आहे.ग्रामीण भागातही गंभीर प्रश्नआसेगाव(देवी) : बेंबळा प्रकल्पासाठी ग्रामीण भागातून पाईप लाईन टाकण्यात आली. रस्त्यावर सहा ते सात फुटांचा खड्डा खोदण्यात आला. या ठिकाणाची योग्यरित्या दबाई केली गेली नाही. पावसाच्या पाण्याने तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये वाहन फसण्याचे प्रकार वाढले आहे. किरकोळ अपघातही नित्याची बाब झाली आहे. राणीअमरावती, गळव्हा, भिसनी हे रस्ते बेंबळाच्या पाईप लाईनसाठी फोडण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात