शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

२२ तासांपासून वीज पुरवठा खंडित

By admin | Updated: June 23, 2014 00:20 IST

वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी व नियोजनशून्य कारभाराचा फटका गेल्या अनेक दिवसांपासून बाभूळगाव तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. आता तर नियोजनशून्यतेने कळस गाठला असून

बाभूळगाव : वीज वितरणविरोधात संतापबाभूळगाव : वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी व नियोजनशून्य कारभाराचा फटका गेल्या अनेक दिवसांपासून बाभूळगाव तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. आता तर नियोजनशून्यतेने कळस गाठला असून गेल्या २२ तासांपासून पहूर फिडरवरील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे परिसरातील अनेक गावे अंधारामध्ये आकंठ बुडाली होती.शनिवारी दुपारी ४ वाजतापासून पहूर फिडरवरील वीज पुरवठा खंडित झाला. पहूर फिडरवरील नागरिकांना वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, वेळेवर भारनियमन करणे यामुळे अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो. २१ जूनच्या दुपारी ४ वाजता असाच वीज पुरवठा अचानक बंद झाला. याचा फटका या फिडरवरून विद्युत पुरवठा होत असलेल्या जवळपास ३० गावातील हजारो नागरिकांना झाला. २२ जूनच्या दुपारी २ वाजता हा विद्युत पुरवठा सुरू झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.ऐन पावसाळ्याच्या दिवसातही तालुक्यातील वीज वितरण कंपनीचे नियोजन मात्र योग्य असल्याचे दिसून येत नाही. या घटनेमुळे परिसरातील ३० गावांना अंधारात रात्र काढावी लागली. या संदर्भात वीज वितरण कंपनीशी संपर्क केला असता नागरिकांना मात्र उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. याचा फटका सामान्य नागरिकांसह व्यावसायिकांना बसला. शिंदी गावामध्ये नदी नसल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. वीज नसल्यामुळे गावातील हौद भरल्या गेले नाही. परिणामी गावातील पशुपालकांना तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा नदीवर पाणी पाजण्यासाठी जनावरांना न्यावे लागले. असाच त्रास इतरही गावातील नागरिकांना सहन करावा लागला. पावसाळ्याच्या दिवसात असे प्रकार होवू नये, यासाठी वीज वितरण कंपनीने काळजी घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)