शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

काटखेडाच्या परिवारावर २५ वर्षांपासून बहिष्कार

By admin | Updated: February 26, 2016 02:16 IST

घटस्फोट झालेल्या पत्नीच्या मुलाला स्वीकारले नाही म्हणून पुसद तालुक्यातील काटखेडा येथील एका परिवारावर गत २५ वर्षांपासून जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकला आहे.

जात पंचायतीचा निर्णय : १६ जणांच्या कुटुंबाची न्यायासाठी धडपडपुसद : घटस्फोट झालेल्या पत्नीच्या मुलाला स्वीकारले नाही म्हणून पुसद तालुक्यातील काटखेडा येथील एका परिवारावर गत २५ वर्षांपासून जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकला आहे. ८० वर्षांच्या वृद्धासह १६ जणांचा हा परिवार बहिष्कृत म्हणून जगत आहे. न्यायासाठी पोलिसांचे दरवाजे ठोठावत असून अद्यापही जात पंचायतीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.पुसद तालुक्यातील काटखेडा येथे साखरे परिवार राहतो. हरिभाऊ बेगाजी साखरे यांनी पहिली पत्नी लीलाबाई हिला ३ फेब्रुवारी १९६८ रोजी घटस्फोट दिला. त्या फारकतनाम्यात या दाम्पत्याला कोणतीही संतती नसल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यांनतर हरिभाऊने अबिराबाईसोबत दुसरे लग्न केले. परंतु त्यानंतर लीलाबाईला झालेला मुलगा हरिभाऊचा असल्याचे सांगत तशी नोंद ग्रामपंचायतीत करण्यात आली. मात्र आपला मुलगा नसल्याचे हरिभाऊने सांगितले. त्यावरून प्रकरण जात पंचायतीत गेले. जात पंचायतीतील ११ सदस्यांनी या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केले. साखरे परिवाराच्या घरी कुणीही जाऊ नये, समाजाच्या कार्यक्रमात बोलवू नये, असे ठरविण्यात आले. यामुळे साखरे परिवार एकाकी झाला. एवढेच नाही तर काही मंडळी या परिवाराला त्रास देऊ लागले. त्यामुळे हरिभाऊच्या विनोद नामक मुलाने गाव सोडले, तर दोन मुलासह आजही हरिभाऊ काटखेडा येथे राहतो. त्यांना आता समाजातील मंडळी विशेषत: जात पंचायतीचे सदस्य त्रस्त करून सोडत आहे. या प्रकरणी साखरे परिवाराने पुसद ग्रामीण पोलीस ठांण्यात तक्रार केली. मात्र दखल घेतली नाही. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही न्याय मागितला. परंतु उपयोग झाला नाही. शेवटी प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. उच्च न्यायालयाने या प्रकरणी जात पंचायतीच्या सदस्यांना चांगल्या वर्तणुकीची तंबी दिली. परंतु या तंबीचा फारसा फरक पडलेला नाही. कारण काही दिवसानंतर आता पुन्हा या मंडळींनी त्रास देणे सुरू केले आहे. गेल्या २५ वर्षांपासून साखरे परिवार उपेक्षिताचे जीणे जगत आहे. न्यायासाठी धडपडत आहे. परंतु कुणीही न्याय देत नाही. विशेष म्हणजे सामाजिक बहिष्कार टाकणे कायद्याने गुन्हा आहे. त्याबाबत संबंधितांवर कठोर कारवाईचे निर्देश असून दखलपात्र गुन्हा नोंदविता येतो. परंतु साखरे परिवाराला अद्यापही न्याय मिळाला नाही.