शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

काटखेडाच्या परिवारावर २५ वर्षांपासून बहिष्कार

By admin | Updated: February 26, 2016 02:16 IST

घटस्फोट झालेल्या पत्नीच्या मुलाला स्वीकारले नाही म्हणून पुसद तालुक्यातील काटखेडा येथील एका परिवारावर गत २५ वर्षांपासून जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकला आहे.

जात पंचायतीचा निर्णय : १६ जणांच्या कुटुंबाची न्यायासाठी धडपडपुसद : घटस्फोट झालेल्या पत्नीच्या मुलाला स्वीकारले नाही म्हणून पुसद तालुक्यातील काटखेडा येथील एका परिवारावर गत २५ वर्षांपासून जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकला आहे. ८० वर्षांच्या वृद्धासह १६ जणांचा हा परिवार बहिष्कृत म्हणून जगत आहे. न्यायासाठी पोलिसांचे दरवाजे ठोठावत असून अद्यापही जात पंचायतीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.पुसद तालुक्यातील काटखेडा येथे साखरे परिवार राहतो. हरिभाऊ बेगाजी साखरे यांनी पहिली पत्नी लीलाबाई हिला ३ फेब्रुवारी १९६८ रोजी घटस्फोट दिला. त्या फारकतनाम्यात या दाम्पत्याला कोणतीही संतती नसल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यांनतर हरिभाऊने अबिराबाईसोबत दुसरे लग्न केले. परंतु त्यानंतर लीलाबाईला झालेला मुलगा हरिभाऊचा असल्याचे सांगत तशी नोंद ग्रामपंचायतीत करण्यात आली. मात्र आपला मुलगा नसल्याचे हरिभाऊने सांगितले. त्यावरून प्रकरण जात पंचायतीत गेले. जात पंचायतीतील ११ सदस्यांनी या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केले. साखरे परिवाराच्या घरी कुणीही जाऊ नये, समाजाच्या कार्यक्रमात बोलवू नये, असे ठरविण्यात आले. यामुळे साखरे परिवार एकाकी झाला. एवढेच नाही तर काही मंडळी या परिवाराला त्रास देऊ लागले. त्यामुळे हरिभाऊच्या विनोद नामक मुलाने गाव सोडले, तर दोन मुलासह आजही हरिभाऊ काटखेडा येथे राहतो. त्यांना आता समाजातील मंडळी विशेषत: जात पंचायतीचे सदस्य त्रस्त करून सोडत आहे. या प्रकरणी साखरे परिवाराने पुसद ग्रामीण पोलीस ठांण्यात तक्रार केली. मात्र दखल घेतली नाही. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही न्याय मागितला. परंतु उपयोग झाला नाही. शेवटी प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. उच्च न्यायालयाने या प्रकरणी जात पंचायतीच्या सदस्यांना चांगल्या वर्तणुकीची तंबी दिली. परंतु या तंबीचा फारसा फरक पडलेला नाही. कारण काही दिवसानंतर आता पुन्हा या मंडळींनी त्रास देणे सुरू केले आहे. गेल्या २५ वर्षांपासून साखरे परिवार उपेक्षिताचे जीणे जगत आहे. न्यायासाठी धडपडत आहे. परंतु कुणीही न्याय देत नाही. विशेष म्हणजे सामाजिक बहिष्कार टाकणे कायद्याने गुन्हा आहे. त्याबाबत संबंधितांवर कठोर कारवाईचे निर्देश असून दखलपात्र गुन्हा नोंदविता येतो. परंतु साखरे परिवाराला अद्यापही न्याय मिळाला नाही.