शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बारावी परीक्षेच्या कामावर बहिष्कार; बिनपगारी शिक्षक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 13:30 IST

गेल्या २० वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून तोंडावर आलेल्या बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे शिक्षण मंडळावर मोर्चा, मुंबईत धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या २० वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी आता अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून तोंडावर आलेल्या बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षक एकवटून गुरूवारी शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत.कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये हजारो शिक्षक गेल्या २० वर्षांपासून एकही पैसा न घेता काम करीत आहेत. मावळत्या काळात युती शासनाने २० टक्के अनुदानाचे आश्वासन या शिक्षकांना दिले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनात तोंडाला पाने पुसल्यानंतर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वेतन तरतूद होण्याची ग्वाही दिली आहे. परंतु, त्यासाठी ५८ कॉलममध्ये शाळांकडून माहिती मागविण्यात आली आहे. ती माहिती शाळांनी दिल्यावरही प्रशासकीय उदासीनतेमुळे या फाईल मंत्रालयापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षक संतापलेले आहेत.प्रशासनाला ताळ्यावर आणण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीने बारावीच्या परीक्षेच्या संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. २३ जानेवारीला शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर २७ जानेवारीपासून मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाणार आहे.ऐन परीक्षेच्या तोंडावर शाळा बंदबारावीच्या परीक्षा आता तोंडावर आल्या आहेत. मात्र त्याचवेळी शिक्षक २७ जानेवारीपासून मुंबईत बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. हे निर्वाणीचे आंदोलन म्हणून विनाअनुदानित शाळेतील सर्वच शिक्षक सहभागी होण्याची शक्यता आहे. शिवाय, विविध शिक्षक संघटनांनी या आंदोलनाला सक्रीय पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :examपरीक्षाTeacherशिक्षक