शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

उधारीवरचा कापूस उठला शेतकऱ्यांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 12:46 IST

यावर्षी कापसाची लागवड घटल्याने दर वधारतील, असा अंदाज होता. त्यानुसार प्रारंभी कापसाचे दर ५८०० रूपयापर्यंत चढले. मात्र बाजारपेठेत आवक नसतानाही आता ५४०० रूपयापर्यंत भाव खाली आले. याला आंतरराष्ट्रीय बाजारातील उधारीवरच्या कापूस गाठींची आयात कारणीभूत आहे. आयात रोखल्याखेरीज दर सुधारण्याचे संकेत नाही.

ठळक मुद्देअमेरिकेच्या धोरणाने झटका

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी कापसाची लागवड घटल्याने दर वधारतील, असा अंदाज होता. त्यानुसार प्रारंभी कापसाचे दर ५८०० रूपयापर्यंत चढले. मात्र बाजारपेठेत आवक नसतानाही आता ५४०० रूपयापर्यंत भाव खाली आले. याला आंतरराष्ट्रीय बाजारातील उधारीवरच्या कापूस गाठींची आयात कारणीभूत आहे. आयात रोखल्याखेरीज दर सुधारण्याचे संकेत नाही.जागतिक बाजारातील कापसाचे दर आणि भारतातील दर सारखेच आहे. या स्थितीत अमेरिका भारतातील व्यापाऱ्यांना उधारीवर कापूस विकण्यास तयार आहे. या कापूस गाठीला तीन ते चार महिन्यांची सवलत मिळाली आहे. यामुळे चिन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धात अमेरिकेने भारतालाच ढाल बनवून भारतीय बाजारपेठ काबीज करणे सुरू केले आहे.दोन वर्षांपासून अमेरिका याच पद्धतीने कापूस गाठींची विक्री करीत आहे. याचा फटका महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना बसत आहे. हा प्रकार नियंत्रित करण्यासाठी कापसाच्या आयातीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. त्या दृष्टीने केंद्र शासनाने पावले उचलावे, असे मत शेतकरी संघटनानी नोंदविले आहे. कृषी अभ्यासकांनी त्या दृष्टीने तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे मत ‘लोकमत’कडे नोंदविले आहे.उधारीवरील कापसामुळे देशभरात कापसाच्या किमती दबावाखाली आल्या आहेत. गत तीन महिन्यापासून घसरण होत आहे. कापसाचे दर क्विंटलमागे ६०० रूपयाने घटले आहे. उत्पादन घटल्याने कापसाचे दर सहा हजार रूपये क्विंटलच्या वर जातील, असा अंदाज होता. मात्र अमेरिकेच्या व्यापार धोरणाने भारतीय बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे.पाकिस्तानचे कापूस सौदे रद्दभारतातून २० लाख कापूस गाठीची निर्यात होणार होती. यातील ७ लाख गाठीचे सौदे झाले. मात्र दहशतवादी घटनांमुळे दोन लाख गाठी थांबविण्यात आल्या. पुढील कालावधीत जाणारा कापूस यामुळे थांबणार आहे.उधारीवरच्या २७ लाख गाठी देशभरातबहुराष्ट्रीय कंपनीकडून भारतात येणाºया कापूस गाठीचे वितरण करण्यात येते. गतवर्षी २० लाख गाठी आयात झाल्या होत्या. यावर्षी याा गाठी २७ लाखांवर पोहचल्या आहे. यातून बाजारात कापसाचे दर पडले आहेत.आयात होणाºया कापसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्याकरिता आयातीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. किमान आधारभूत किमतीखाली शेतमालाची आयातच करू नये.- विजय जावंधिया, कृषी अभ्यासक, वर्धाकापसाच्या आयातीवर निर्बंधाचे प्रयत्न झाले. मात्र यश आले नाही. यामुळे २० टक्के कापसाची आयात झाली. यातही उधारीवर कापूस देशात आला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहे.- पाशा पटेल, अध्यक्ष, कृषीमूल्य आयोग

टॅग्स :agricultureशेती