शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

उधारीवरचा कापूस उठला शेतकऱ्यांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 12:46 IST

यावर्षी कापसाची लागवड घटल्याने दर वधारतील, असा अंदाज होता. त्यानुसार प्रारंभी कापसाचे दर ५८०० रूपयापर्यंत चढले. मात्र बाजारपेठेत आवक नसतानाही आता ५४०० रूपयापर्यंत भाव खाली आले. याला आंतरराष्ट्रीय बाजारातील उधारीवरच्या कापूस गाठींची आयात कारणीभूत आहे. आयात रोखल्याखेरीज दर सुधारण्याचे संकेत नाही.

ठळक मुद्देअमेरिकेच्या धोरणाने झटका

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी कापसाची लागवड घटल्याने दर वधारतील, असा अंदाज होता. त्यानुसार प्रारंभी कापसाचे दर ५८०० रूपयापर्यंत चढले. मात्र बाजारपेठेत आवक नसतानाही आता ५४०० रूपयापर्यंत भाव खाली आले. याला आंतरराष्ट्रीय बाजारातील उधारीवरच्या कापूस गाठींची आयात कारणीभूत आहे. आयात रोखल्याखेरीज दर सुधारण्याचे संकेत नाही.जागतिक बाजारातील कापसाचे दर आणि भारतातील दर सारखेच आहे. या स्थितीत अमेरिका भारतातील व्यापाऱ्यांना उधारीवर कापूस विकण्यास तयार आहे. या कापूस गाठीला तीन ते चार महिन्यांची सवलत मिळाली आहे. यामुळे चिन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धात अमेरिकेने भारतालाच ढाल बनवून भारतीय बाजारपेठ काबीज करणे सुरू केले आहे.दोन वर्षांपासून अमेरिका याच पद्धतीने कापूस गाठींची विक्री करीत आहे. याचा फटका महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना बसत आहे. हा प्रकार नियंत्रित करण्यासाठी कापसाच्या आयातीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. त्या दृष्टीने केंद्र शासनाने पावले उचलावे, असे मत शेतकरी संघटनानी नोंदविले आहे. कृषी अभ्यासकांनी त्या दृष्टीने तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे मत ‘लोकमत’कडे नोंदविले आहे.उधारीवरील कापसामुळे देशभरात कापसाच्या किमती दबावाखाली आल्या आहेत. गत तीन महिन्यापासून घसरण होत आहे. कापसाचे दर क्विंटलमागे ६०० रूपयाने घटले आहे. उत्पादन घटल्याने कापसाचे दर सहा हजार रूपये क्विंटलच्या वर जातील, असा अंदाज होता. मात्र अमेरिकेच्या व्यापार धोरणाने भारतीय बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे.पाकिस्तानचे कापूस सौदे रद्दभारतातून २० लाख कापूस गाठीची निर्यात होणार होती. यातील ७ लाख गाठीचे सौदे झाले. मात्र दहशतवादी घटनांमुळे दोन लाख गाठी थांबविण्यात आल्या. पुढील कालावधीत जाणारा कापूस यामुळे थांबणार आहे.उधारीवरच्या २७ लाख गाठी देशभरातबहुराष्ट्रीय कंपनीकडून भारतात येणाºया कापूस गाठीचे वितरण करण्यात येते. गतवर्षी २० लाख गाठी आयात झाल्या होत्या. यावर्षी याा गाठी २७ लाखांवर पोहचल्या आहे. यातून बाजारात कापसाचे दर पडले आहेत.आयात होणाºया कापसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्याकरिता आयातीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. किमान आधारभूत किमतीखाली शेतमालाची आयातच करू नये.- विजय जावंधिया, कृषी अभ्यासक, वर्धाकापसाच्या आयातीवर निर्बंधाचे प्रयत्न झाले. मात्र यश आले नाही. यामुळे २० टक्के कापसाची आयात झाली. यातही उधारीवर कापूस देशात आला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहे.- पाशा पटेल, अध्यक्ष, कृषीमूल्य आयोग

टॅग्स :agricultureशेती