शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

उधारीवरचा कापूस उठला शेतकऱ्यांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 12:46 IST

यावर्षी कापसाची लागवड घटल्याने दर वधारतील, असा अंदाज होता. त्यानुसार प्रारंभी कापसाचे दर ५८०० रूपयापर्यंत चढले. मात्र बाजारपेठेत आवक नसतानाही आता ५४०० रूपयापर्यंत भाव खाली आले. याला आंतरराष्ट्रीय बाजारातील उधारीवरच्या कापूस गाठींची आयात कारणीभूत आहे. आयात रोखल्याखेरीज दर सुधारण्याचे संकेत नाही.

ठळक मुद्देअमेरिकेच्या धोरणाने झटका

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षी कापसाची लागवड घटल्याने दर वधारतील, असा अंदाज होता. त्यानुसार प्रारंभी कापसाचे दर ५८०० रूपयापर्यंत चढले. मात्र बाजारपेठेत आवक नसतानाही आता ५४०० रूपयापर्यंत भाव खाली आले. याला आंतरराष्ट्रीय बाजारातील उधारीवरच्या कापूस गाठींची आयात कारणीभूत आहे. आयात रोखल्याखेरीज दर सुधारण्याचे संकेत नाही.जागतिक बाजारातील कापसाचे दर आणि भारतातील दर सारखेच आहे. या स्थितीत अमेरिका भारतातील व्यापाऱ्यांना उधारीवर कापूस विकण्यास तयार आहे. या कापूस गाठीला तीन ते चार महिन्यांची सवलत मिळाली आहे. यामुळे चिन आणि अमेरिकेच्या व्यापारयुद्धात अमेरिकेने भारतालाच ढाल बनवून भारतीय बाजारपेठ काबीज करणे सुरू केले आहे.दोन वर्षांपासून अमेरिका याच पद्धतीने कापूस गाठींची विक्री करीत आहे. याचा फटका महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांना बसत आहे. हा प्रकार नियंत्रित करण्यासाठी कापसाच्या आयातीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. त्या दृष्टीने केंद्र शासनाने पावले उचलावे, असे मत शेतकरी संघटनानी नोंदविले आहे. कृषी अभ्यासकांनी त्या दृष्टीने तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे मत ‘लोकमत’कडे नोंदविले आहे.उधारीवरील कापसामुळे देशभरात कापसाच्या किमती दबावाखाली आल्या आहेत. गत तीन महिन्यापासून घसरण होत आहे. कापसाचे दर क्विंटलमागे ६०० रूपयाने घटले आहे. उत्पादन घटल्याने कापसाचे दर सहा हजार रूपये क्विंटलच्या वर जातील, असा अंदाज होता. मात्र अमेरिकेच्या व्यापार धोरणाने भारतीय बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे.पाकिस्तानचे कापूस सौदे रद्दभारतातून २० लाख कापूस गाठीची निर्यात होणार होती. यातील ७ लाख गाठीचे सौदे झाले. मात्र दहशतवादी घटनांमुळे दोन लाख गाठी थांबविण्यात आल्या. पुढील कालावधीत जाणारा कापूस यामुळे थांबणार आहे.उधारीवरच्या २७ लाख गाठी देशभरातबहुराष्ट्रीय कंपनीकडून भारतात येणाºया कापूस गाठीचे वितरण करण्यात येते. गतवर्षी २० लाख गाठी आयात झाल्या होत्या. यावर्षी याा गाठी २७ लाखांवर पोहचल्या आहे. यातून बाजारात कापसाचे दर पडले आहेत.आयात होणाºया कापसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्याकरिता आयातीवर निर्बंध घालण्याची गरज आहे. किमान आधारभूत किमतीखाली शेतमालाची आयातच करू नये.- विजय जावंधिया, कृषी अभ्यासक, वर्धाकापसाच्या आयातीवर निर्बंधाचे प्रयत्न झाले. मात्र यश आले नाही. यामुळे २० टक्के कापसाची आयात झाली. यातही उधारीवर कापूस देशात आला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहे.- पाशा पटेल, अध्यक्ष, कृषीमूल्य आयोग

टॅग्स :agricultureशेती