शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

३६ हजार हेक्टरवर बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 21:41 IST

तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडले असताना आता कपाशीवर बोंअडळीने हल्ला केल्याने अधिक चिंतेत पडले आहे.

ठळक मुद्देआमदारांकडून पाहणी : उमरखेड, महागाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडले असताना आता कपाशीवर बोंअडळीने हल्ला केल्याने अधिक चिंतेत पडले आहे.मागीलवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्त्पन्न होईल, अशी आशा बाळगून तालुक्यातील शेतकºयांनी यंदा १६ हजार  हेक्टरवर कपाशीची लागवड केली. परंतु काही बियाणे कंपन्यांनी बोगस, दर्जाहिन व कमी प्रतिकार शक्ती असलेले बियाणे शेतकºयांच्या माथी मारले. त्यामुळे यावर्षी अधिकचे उत्पन्न होणे अवघड झाले आहे. त्यामुळे लागवड खर्चसुद्धा निघणार नाही, अशी परिस्थिती आह. अनेक गावांतील शेतकरी शेतात उभ्या असलेल्या कपाशीवर नांगर फिरवित आहे.नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतात जाऊन आमदार राजेंद्र नजरधने यांनी प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली. मार्लेगाव, खरुस, विडूळ, ढाणकी आदी ठिकाणी आमदार नजरधने यांनी भाजपा जिल्हा सचिव नितीन भुतडा, कृषी अधिकारी एन के कुमरे, कृषी सहाय्यक आर. पी. येरमुलवाड, जी. के. कुलकर्णी, मुनेश्वर, जानकार, देशपांडे, नायब तहसीलदार राजेश चव्हाण यांना घेऊन कपाशीच्या पिकाची पाहणी केली.आमदार नजरधने यांनी नागपूर येथील येत्या हिवाळी अधिवेशनात नुकसानग्रस्त कपाशीचे नमुने दाखवणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या माध्यमातून शेतकºयांना न्याय व नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन शेतकºयांना दिले आहे.महागाव तालुक्यात २० हजार हेक्टरवरील कपाशी संकटातमहागाव : गुलाबी बोंडअळीने तालुक्यातील २० हजार हेक्टरवरील कपाशीला घेरले आहे. तालुका कृषी विभागाकडे ५०० शेतकºयांनी याबाबत अधिकृतपणे तक्रारी दिल्या आहेत. महागाव तालुका कापूस उत्पादक म्हणून ओळखला जातो. यंदा २९ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. त्यापैकी तब्बल २० हजार हेक्टरमधील कपाशीवर लाल बोंडअळीने हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. कपाशीच्या सुरक्षिततेसाठी तीन तालुके मिळून केवळ एकच कीड नियंत्रक आहे. हे कार्यक्षेत्र मोठे असल्याने कीड नियंत्रक कोणत्याच तालुक्याकडे फिरकल्याचे दिसत नाही. तालुक्यातील अंबोडा, वाघनाथ, खडका, चिलगव्हाण, उटी, हिवरा, करंजखेड, मुडाणा, लेवा आदी गावांतील कापूस उत्पादकांनी तक्रारी केल्यानंतर आमदार राजेंद्र नजरधने यांनी अधिकाºयांचा ताफा घेउन शेत शिवार गाठले. त्यांनी संपूर्ण पाहणी केली. त्यांनी शेती आणि शेतकºयांची स्थिती बघून नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश दिले. तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणविर आणि त्यांचा कृषी विभाग बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करीत आहे. मात्र बियाणे कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी यात सहभागी होताना दिसत नाही. कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालावर स्वाक्षरी करायलासुद्धा ते तयार नाही. बियाणे कंपन्यांच्या या मुजोरीमुळे शेतकºयांमध्ये रोष निर्माण झाला आहे.शेतकरी जागृतपिकांवर रोगांचे संक्रमण आणि त्याचा शोध लावण्यासाठी अंबोडा येथील ‘अमृत’ पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या सतर्कतेने तालुक्यातील शेतकरी जागृत होत आहेत. त्यांचे संशोधन विद्यापीठाच्या पुस्तकी ज्ञान असलेल्या अधिकाºयांसाठी चपराक ठरत आहे.