शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

३६ हजार हेक्टरवर बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 21:41 IST

तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडले असताना आता कपाशीवर बोंअडळीने हल्ला केल्याने अधिक चिंतेत पडले आहे.

ठळक मुद्देआमदारांकडून पाहणी : उमरखेड, महागाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडले असताना आता कपाशीवर बोंअडळीने हल्ला केल्याने अधिक चिंतेत पडले आहे.मागीलवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्त्पन्न होईल, अशी आशा बाळगून तालुक्यातील शेतकºयांनी यंदा १६ हजार  हेक्टरवर कपाशीची लागवड केली. परंतु काही बियाणे कंपन्यांनी बोगस, दर्जाहिन व कमी प्रतिकार शक्ती असलेले बियाणे शेतकºयांच्या माथी मारले. त्यामुळे यावर्षी अधिकचे उत्पन्न होणे अवघड झाले आहे. त्यामुळे लागवड खर्चसुद्धा निघणार नाही, अशी परिस्थिती आह. अनेक गावांतील शेतकरी शेतात उभ्या असलेल्या कपाशीवर नांगर फिरवित आहे.नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतात जाऊन आमदार राजेंद्र नजरधने यांनी प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली. मार्लेगाव, खरुस, विडूळ, ढाणकी आदी ठिकाणी आमदार नजरधने यांनी भाजपा जिल्हा सचिव नितीन भुतडा, कृषी अधिकारी एन के कुमरे, कृषी सहाय्यक आर. पी. येरमुलवाड, जी. के. कुलकर्णी, मुनेश्वर, जानकार, देशपांडे, नायब तहसीलदार राजेश चव्हाण यांना घेऊन कपाशीच्या पिकाची पाहणी केली.आमदार नजरधने यांनी नागपूर येथील येत्या हिवाळी अधिवेशनात नुकसानग्रस्त कपाशीचे नमुने दाखवणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या माध्यमातून शेतकºयांना न्याय व नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन शेतकºयांना दिले आहे.महागाव तालुक्यात २० हजार हेक्टरवरील कपाशी संकटातमहागाव : गुलाबी बोंडअळीने तालुक्यातील २० हजार हेक्टरवरील कपाशीला घेरले आहे. तालुका कृषी विभागाकडे ५०० शेतकºयांनी याबाबत अधिकृतपणे तक्रारी दिल्या आहेत. महागाव तालुका कापूस उत्पादक म्हणून ओळखला जातो. यंदा २९ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. त्यापैकी तब्बल २० हजार हेक्टरमधील कपाशीवर लाल बोंडअळीने हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. कपाशीच्या सुरक्षिततेसाठी तीन तालुके मिळून केवळ एकच कीड नियंत्रक आहे. हे कार्यक्षेत्र मोठे असल्याने कीड नियंत्रक कोणत्याच तालुक्याकडे फिरकल्याचे दिसत नाही. तालुक्यातील अंबोडा, वाघनाथ, खडका, चिलगव्हाण, उटी, हिवरा, करंजखेड, मुडाणा, लेवा आदी गावांतील कापूस उत्पादकांनी तक्रारी केल्यानंतर आमदार राजेंद्र नजरधने यांनी अधिकाºयांचा ताफा घेउन शेत शिवार गाठले. त्यांनी संपूर्ण पाहणी केली. त्यांनी शेती आणि शेतकºयांची स्थिती बघून नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश दिले. तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणविर आणि त्यांचा कृषी विभाग बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करीत आहे. मात्र बियाणे कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी यात सहभागी होताना दिसत नाही. कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालावर स्वाक्षरी करायलासुद्धा ते तयार नाही. बियाणे कंपन्यांच्या या मुजोरीमुळे शेतकºयांमध्ये रोष निर्माण झाला आहे.शेतकरी जागृतपिकांवर रोगांचे संक्रमण आणि त्याचा शोध लावण्यासाठी अंबोडा येथील ‘अमृत’ पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या सतर्कतेने तालुक्यातील शेतकरी जागृत होत आहेत. त्यांचे संशोधन विद्यापीठाच्या पुस्तकी ज्ञान असलेल्या अधिकाºयांसाठी चपराक ठरत आहे.