शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

३६ हजार हेक्टरवर बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 21:41 IST

तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडले असताना आता कपाशीवर बोंअडळीने हल्ला केल्याने अधिक चिंतेत पडले आहे.

ठळक मुद्देआमदारांकडून पाहणी : उमरखेड, महागाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडले असताना आता कपाशीवर बोंअडळीने हल्ला केल्याने अधिक चिंतेत पडले आहे.मागीलवर्षीपेक्षा यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्त्पन्न होईल, अशी आशा बाळगून तालुक्यातील शेतकºयांनी यंदा १६ हजार  हेक्टरवर कपाशीची लागवड केली. परंतु काही बियाणे कंपन्यांनी बोगस, दर्जाहिन व कमी प्रतिकार शक्ती असलेले बियाणे शेतकºयांच्या माथी मारले. त्यामुळे यावर्षी अधिकचे उत्पन्न होणे अवघड झाले आहे. त्यामुळे लागवड खर्चसुद्धा निघणार नाही, अशी परिस्थिती आह. अनेक गावांतील शेतकरी शेतात उभ्या असलेल्या कपाशीवर नांगर फिरवित आहे.नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतात जाऊन आमदार राजेंद्र नजरधने यांनी प्रत्यक्ष पिकाची पाहणी केली. मार्लेगाव, खरुस, विडूळ, ढाणकी आदी ठिकाणी आमदार नजरधने यांनी भाजपा जिल्हा सचिव नितीन भुतडा, कृषी अधिकारी एन के कुमरे, कृषी सहाय्यक आर. पी. येरमुलवाड, जी. के. कुलकर्णी, मुनेश्वर, जानकार, देशपांडे, नायब तहसीलदार राजेश चव्हाण यांना घेऊन कपाशीच्या पिकाची पाहणी केली.आमदार नजरधने यांनी नागपूर येथील येत्या हिवाळी अधिवेशनात नुकसानग्रस्त कपाशीचे नमुने दाखवणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या माध्यमातून शेतकºयांना न्याय व नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन शेतकºयांना दिले आहे.महागाव तालुक्यात २० हजार हेक्टरवरील कपाशी संकटातमहागाव : गुलाबी बोंडअळीने तालुक्यातील २० हजार हेक्टरवरील कपाशीला घेरले आहे. तालुका कृषी विभागाकडे ५०० शेतकºयांनी याबाबत अधिकृतपणे तक्रारी दिल्या आहेत. महागाव तालुका कापूस उत्पादक म्हणून ओळखला जातो. यंदा २९ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. त्यापैकी तब्बल २० हजार हेक्टरमधील कपाशीवर लाल बोंडअळीने हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. कपाशीच्या सुरक्षिततेसाठी तीन तालुके मिळून केवळ एकच कीड नियंत्रक आहे. हे कार्यक्षेत्र मोठे असल्याने कीड नियंत्रक कोणत्याच तालुक्याकडे फिरकल्याचे दिसत नाही. तालुक्यातील अंबोडा, वाघनाथ, खडका, चिलगव्हाण, उटी, हिवरा, करंजखेड, मुडाणा, लेवा आदी गावांतील कापूस उत्पादकांनी तक्रारी केल्यानंतर आमदार राजेंद्र नजरधने यांनी अधिकाºयांचा ताफा घेउन शेत शिवार गाठले. त्यांनी संपूर्ण पाहणी केली. त्यांनी शेती आणि शेतकºयांची स्थिती बघून नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश दिले. तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणविर आणि त्यांचा कृषी विभाग बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करीत आहे. मात्र बियाणे कंपन्यांचे अधिकारी, कर्मचारी यात सहभागी होताना दिसत नाही. कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालावर स्वाक्षरी करायलासुद्धा ते तयार नाही. बियाणे कंपन्यांच्या या मुजोरीमुळे शेतकºयांमध्ये रोष निर्माण झाला आहे.शेतकरी जागृतपिकांवर रोगांचे संक्रमण आणि त्याचा शोध लावण्यासाठी अंबोडा येथील ‘अमृत’ पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या सतर्कतेने तालुक्यातील शेतकरी जागृत होत आहेत. त्यांचे संशोधन विद्यापीठाच्या पुस्तकी ज्ञान असलेल्या अधिकाºयांसाठी चपराक ठरत आहे.