शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख हेक्टरवर बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:02 IST

जिल्ह्यात साडेचार लाखापैकी तब्बल सवादोन लाख हेक्टर कपाशीवर गुलाबी ओंबडअळीने हल्ला केला. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांच्या तीन हजार तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाल्या.

ठळक मुद्देतीन हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी : अर्ज भरणाऱ्यांनाच मदतीचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात साडेचार लाखापैकी तब्बल सवादोन लाख हेक्टर कपाशीवर गुलाबी ओंबडअळीने हल्ला केला. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांच्या तीन हजार तक्रारी कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाल्या. तथापि नुकसानीचे अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच मदतीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात यंदा चार लाख ५६ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. यापैकी तब्बल दोन लाख १३ हजार हेक्टरवरील कपाशीवर गुलाबी गँगने हल्ला केला आहे. बीटी वाणाच्या कपाशीवर बोंअडळी हल्ला करीत नाही, असा दावा बियाणे कंपन्यांनी केला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात बीटी कपाशीचा पेरा वाढला. आता तर सर्वच शेतकरी बीटी बियाण्यांची लागवड करतात. मात्र याच कपाशीवर आता गुलाबी ओंबडळीने हल्ला केल्याने शेतकरी पुरते कोलमडून पडले आहे. त्यांना काय करावे, हे सुचेनासे झाले आहे.कृषी विभागाने कपाशीचे तब्बल ५० टक्के क्षेत्र गुलाबी बोंडअळीने बाधीत झाल्याचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी गारद झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, याबाबतही संभ्रम आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी ‘जे’ आणि ‘एच’ फॉर्ममध्ये नुकसानीचा अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यानंतरच त्यांच्या शेतातील नुकसानीचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यातही ५० टक्केपेक्षा जादा नुकसान झाल्यासच नुकसान भरपाई दिली जाण्याची शक्यता आहे. जे शेतकरी अर्ज भरणार नाही, त्यांच्या शेतातील नुकसानीचे सर्वेक्षणही केले जाणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करणे आवश्यक झाले आहे. अन्यथा नुकसान होईनही त्यांना मदत मिळणे कठीण होणार आहे. परिणामी शेकडो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.नुकसान नैसर्गिक आपत्ती नाहीजिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बोंडअळीने झालेले नुुकसान नैसर्गिक आपत्तीत मोडत नाही. त्यामुळे कृषी विभागाने सुरूवातीला चक्क सर्वेक्षण करण्यास नकार दिला होता. हा प्रकार कीड सर्वेक्षण नियमात मोडतो. तथापि जिल्ह्यात कीड सर्वेक्षकांची संख्या कमी आहे. आता अपुऱ्या सर्वेक्षकांना हा सर्वे पूर्ण करावा लागणार आहे. कृषी विभागाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे चिंता व्यक्त केली आहे.