शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

बोगस जेसीबीने पोखरले जलयुक्त शिवार

By admin | Updated: August 31, 2015 02:14 IST

महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला जिल्ह्यात बोगस जेसीबीने पोखरले असून कोट्यवधीच्या या कामात रोजगार हमी योजनेतील मृत मजुराच्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसत आहे.

सुरेंद्र राऊत यवतमाळ महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेला जिल्ह्यात बोगस जेसीबीने पोखरले असून कोट्यवधीच्या या कामात रोजगार हमी योजनेतील मृत मजुराच्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसत आहे. आरटीओ दप्तरी नोंद नसलेल्या जेसीबी या कामावर राबवून अनेकांनी आपले उखळ पांढरे केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या कामांची चौकशी झाल्यास बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील सिंचनाचा टक्का वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. पाणलोटच्या सर्व योजनांचे एकत्रीकरण करून त्याला अभियानाचे स्वरूप देण्यात आले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामांबाबत गंभीर असून त्यांनी नुकताच जिल्ह्यातील जलयुक्त कामांचाच आढावा घेतला. या अभियानातील कामांमध्ये अपहार होऊ नये म्हणून वेगवेगळ्या यंत्रणेकडून कामांचे मूल्यमापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र निर्ढावलेले अधिकारी आणि राजकीय पुढारी यांच्या संगनमताने पद्धतशीरपणे धूळ फेक केली जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून २८ कोटींची कामे मंजूर झाली होती. ही कामे मिळविण्यासाठी अनेकांनी खटाटोप केला. अस्तित्वात नसलेल्या जेसीबीच्या खोट्या आरसी बुक तयार करून कृषी विभागाला सादर केल्या. कृषी विभागाने कोणतीही शहनिशा न करता या कंत्राटदारांना काम अग्रक्रमाने दिले. विशेष म्हणजे ३१ मार्चपर्यंत कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता कामे देण्यात आली. त्यामुळेच बोगस जेसीबी मशीन जिल्ह्यात कागदोपत्री अस्तित्वात आल्यात. गतवर्षी रोहयोच्या कामावर मृत मजूर राबल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. मृतांच्या नावांवर मस्टर भरून अधिकारी व कंत्राटदारांनी लूट केली होती. झरी तालुक्यात कोट्यवधींचा अपहार झाल्याचे सिद्ध झाले होते. अशीच पुनरावृत्ती आता जलयुक्त शिवारच्या कामात होत असल्याचे पुढे येत आहे. पाणलोटच्या खोदकामाचे दर कृषी विभागाने वाढविण्याची मागणी जेसीबी मालक संघटनेने केली होती. प्रति लिटर २० रुपये दरात काम करणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर शासनाने खोदकामाचे दर २९ रुपये ५० पैसे प्रति मीटर इतके केले होते. मात्र काम वाटप करताना मूळ जेसीबी मालकांना पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्यात आले. ज्यांनी अर्थपूर्ण संबंध निर्माण केले. त्यांनाच ही कामे मिळाली आहे. नि:क्षप चौकशी झाल्यास बडे मासे गळाला लागतील.