शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बिल देणाऱ्या बीडीओची चौकशी

By admin | Updated: April 29, 2015 02:22 IST

पंचायत समितीत येणाऱ्या वरझडी व वरुड या दोन गावांमध्ये रोजगार हमी योजनेचे कोणतेही काम न करता ४० लाखांचे बोगस बिल सादर करणाऱ्या तत्कालिन

यवतमाळ : पंचायत समितीत येणाऱ्या वरझडी व वरुड या दोन गावांमध्ये रोजगार हमी योजनेचे कोणतेही काम न करता ४० लाखांचे बोगस बिल सादर करणाऱ्या तत्कालिन गटविकास अधिकाऱ्याची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. या संदर्भात मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ठराव घेण्यात आला. कागदोपत्री काम दाखवून मॅन्युअल मस्टरच्या आधारे २०११-१२ मध्ये ४० लाखांची देयके तत्कालिन गटविकास अधिकारी संजय ईश्वरकर यांनी सादर केली. कोणतेही काम न करता बील सादर करण्याचा प्रकार जिल्हा परिषद सदस्यांच्या तक्रारीने उघडकीस आला. आता या प्रकरणात स्थायी समितीत चर्चा झाल्यानंतर सीईओंनी विभागीय चौकशी नेमण्याचे आदेश दिले आहे. याच बैठकीत ग्रामसेवकांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा चर्चेस आला. कृषी पदवीकाधारक ग्रामसेवकाला केवळ तीन ते चार दिवसांचे प्रशिक्षण देऊन लाखोंचा व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी सोपवीली जाते. ग्रामसभेचे कामकाज, ग्रामपंचायत अधिनियम, ठराव लिहीने, ग्रामपंचायतीचे अभिलेखे जतन करणे, विविध योजनांमधून मिळणाऱ्या निधीचा जमाखर्च ठेवणे अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. प्रत्यक्षात याचे कुठलेही प्रशिक्षण ग्रामसेवकांना दिले जात नाही. एकीकडे शासन गावांच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी ग्रामीण भागात देत आहे. दुसरीकडे मात्र येथील प्रशासकीय जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याला कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. यात सुधारणा येण्यासाठी ग्रामसेवकांना किमान दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जावे अशी मागणी देवानंद पवार यांनी बैठकीत केली. यानंतर अमन गावंडे यांनी चिमणाबाघापूर येथील रोहयो अपहार, नायगाव पाणीपुरवठा योजनेचा अपहार, गवंडीच्या सौर उर्जा पाणीपुरवठा योजनेच्या कामातील अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. शिवाय सहा प्रतिनियुक्ती कर्मचाऱ्यांपैकी केवळ एकालाच परत पाठविण्यात आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. सातत्याने तेचतेच मुद्दे मांडून कुठलीही कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर सीईओ कलशेट्टी यांनी १५ दिवसांची मुदत मागत कारवाईचे आश्वासन दिले. उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांनी पाच पंचायत समितीच्या फर्निचर पुरवठा कंत्राटाचा मुद्दा उपस्थित केला. यावर अधिकाऱ्यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिले. आर्थिक वर्ष संपत असल्याने पैसे परत जाऊ नये यासाठी निविदा प्रक्रिया करताना घाईघाईने निर्णय घेतल्याचे सांगितले. यानंतर जलयुक्त शिवार अभियानाच्या तिन्ही यंत्रणांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड, जिल्हा परिषद सिंचन विभाग, स्थानिकस्तर सिंचन विभाग यांच्याकडे ३९६ कोटींची कामे आहेत. यापैकी कृषी विभागाने ४१ कोटी ७२ लाख रुपये मार्चपर्यंत खर्च केल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेकडे ३७ कोटी, स्थानिकस्तर सिंचन विभागाकडे १२८ कोटींचे काम सुरू असल्याचे सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)