शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

बोगस बिल देणाऱ्या बीडीओची चौकशी

By admin | Updated: April 29, 2015 02:22 IST

पंचायत समितीत येणाऱ्या वरझडी व वरुड या दोन गावांमध्ये रोजगार हमी योजनेचे कोणतेही काम न करता ४० लाखांचे बोगस बिल सादर करणाऱ्या तत्कालिन

यवतमाळ : पंचायत समितीत येणाऱ्या वरझडी व वरुड या दोन गावांमध्ये रोजगार हमी योजनेचे कोणतेही काम न करता ४० लाखांचे बोगस बिल सादर करणाऱ्या तत्कालिन गटविकास अधिकाऱ्याची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. या संदर्भात मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ठराव घेण्यात आला. कागदोपत्री काम दाखवून मॅन्युअल मस्टरच्या आधारे २०११-१२ मध्ये ४० लाखांची देयके तत्कालिन गटविकास अधिकारी संजय ईश्वरकर यांनी सादर केली. कोणतेही काम न करता बील सादर करण्याचा प्रकार जिल्हा परिषद सदस्यांच्या तक्रारीने उघडकीस आला. आता या प्रकरणात स्थायी समितीत चर्चा झाल्यानंतर सीईओंनी विभागीय चौकशी नेमण्याचे आदेश दिले आहे. याच बैठकीत ग्रामसेवकांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा चर्चेस आला. कृषी पदवीकाधारक ग्रामसेवकाला केवळ तीन ते चार दिवसांचे प्रशिक्षण देऊन लाखोंचा व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी सोपवीली जाते. ग्रामसभेचे कामकाज, ग्रामपंचायत अधिनियम, ठराव लिहीने, ग्रामपंचायतीचे अभिलेखे जतन करणे, विविध योजनांमधून मिळणाऱ्या निधीचा जमाखर्च ठेवणे अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. प्रत्यक्षात याचे कुठलेही प्रशिक्षण ग्रामसेवकांना दिले जात नाही. एकीकडे शासन गावांच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी ग्रामीण भागात देत आहे. दुसरीकडे मात्र येथील प्रशासकीय जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याला कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. यात सुधारणा येण्यासाठी ग्रामसेवकांना किमान दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जावे अशी मागणी देवानंद पवार यांनी बैठकीत केली. यानंतर अमन गावंडे यांनी चिमणाबाघापूर येथील रोहयो अपहार, नायगाव पाणीपुरवठा योजनेचा अपहार, गवंडीच्या सौर उर्जा पाणीपुरवठा योजनेच्या कामातील अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. शिवाय सहा प्रतिनियुक्ती कर्मचाऱ्यांपैकी केवळ एकालाच परत पाठविण्यात आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. सातत्याने तेचतेच मुद्दे मांडून कुठलीही कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर सीईओ कलशेट्टी यांनी १५ दिवसांची मुदत मागत कारवाईचे आश्वासन दिले. उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर यांनी पाच पंचायत समितीच्या फर्निचर पुरवठा कंत्राटाचा मुद्दा उपस्थित केला. यावर अधिकाऱ्यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिले. आर्थिक वर्ष संपत असल्याने पैसे परत जाऊ नये यासाठी निविदा प्रक्रिया करताना घाईघाईने निर्णय घेतल्याचे सांगितले. यानंतर जलयुक्त शिवार अभियानाच्या तिन्ही यंत्रणांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड, जिल्हा परिषद सिंचन विभाग, स्थानिकस्तर सिंचन विभाग यांच्याकडे ३९६ कोटींची कामे आहेत. यापैकी कृषी विभागाने ४१ कोटी ७२ लाख रुपये मार्चपर्यंत खर्च केल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेकडे ३७ कोटी, स्थानिकस्तर सिंचन विभागाकडे १२८ कोटींचे काम सुरू असल्याचे सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)