शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संचालक मंडळ दोन वर्षांपासून ‘प्रभारी’

By admin | Updated: January 6, 2015 23:07 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ तब्बल दोन वर्षांपासून प्रभारी असल्याने बँकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो आहे. बँकेची रखडलेली ३५० जागांची नोकरभरती हा

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ तब्बल दोन वर्षांपासून प्रभारी असल्याने बँकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो आहे. बँकेची रखडलेली ३५० जागांची नोकरभरती हा या परिणामाचाच एक भाग मानला जात आहे. जिल्हा बँकेच्या २८ सदस्यीय संचालक मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर २०१२ ला संपला. त्यानंतर बँकेच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र शासनाची तयारी नसल्याने निवडणूक आयोगाने शासनाला या निवडणुकांसाठी मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ जिल्हा बँक संचालकांच्या सोईचीच होऊन गेली. त्यानंतर लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आल्याने बँकेच्या या संचालक मंडळाचे चांगलेच फावले. पाहता पाहता या संचालक मंडळाला मुदत संपून डिसेंबर २०१४ मध्ये दोन वर्ष पूर्ण झाले. मात्र आपला पाच वर्षाचा कार्यकाळ संपला म्हणून कुण्याही संचालकाने पदाचा राजीनामा देण्याची, बँकेवर प्रशासक बसवा असे म्हणण्याचे धाडस दाखविलेले नाही. यावरून या संचालकांचे २३०० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या बँकेच्या खुर्चीवरील ‘प्रेम’ लक्षात येते. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा बँकेत प्रभारी संचालक मंडळ असल्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धोरणे राबविताना बँकेला अडचणी निर्माण होत आहे. एक तर बँकेला ठोस धोरणात्मक निर्णय या प्रभारी संचालक मंडळाच्या कार्यकाळात घेता येत नाही. आर्थिक बाबींवरील निर्णय थांबत नसले तरी नोकरभरती सारखे निर्णय दोन वर्षांपासून रखडले आहेत. जिल्हा बँकेची मुख्य शाखा, विभागीय शाखा व ग्रामीण शाखा मिळून ८९ कार्यालये आहेत. अवघ्या ५३० कर्मचाऱ्यांवर या कार्यालयांचा डोल्हारा चालविला जात आहे. बँकेला ३५० लिपिक-शिपाई आदी कर्मचाऱ्यांची तातडीने आवश्यकता आहे. मात्र पूर्णवेळ संचालक मंडळ नसल्याने या जागा भरणे कठीण होत असल्याचे सहकार विभागातून सांगण्यात आले. बँकेच्या निवडणुका पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात घेतल्या जात होत्या. आता मात्र त्यासाठी सहकार विभागाला मधुकरराव चौधरी हे स्वतंत्र निवडणूक आयुक्त आहेत. जिल्हा उपनिबंधकांना निवडणूक घेण्याचा हा अधिकार दिला जाऊ शकतो. जिल्हा बँकेने १७०० मतदारांचा समावेश असलेली अपडेट यादी उपनिबंधकांना सादर केली आहे. त्यात जिल्हास्तरीय मतदारसंघात सर्व १७०० मतदार मतदान करणार असून तालुकास्तरीय मतदारसंघात ४० ते ४५ मतदार राहणार आहे. पूर्वी २८ संचालक होते. बैद्यनाथन समितीच्या शिफारसीनंतर ही संख्या २१ वर मर्यादित करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)