शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

ब्लास्टिंगमुळे दारव्हात घरांना हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST

शहरापासून काही अंतरावर असलेल्या बागवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान सुरु करण्यात आल्या आहे. त्यात दोन मोठ्या कंन्स्ट्रक्शन कंपनीने याच परिसरात प्लांट सुरू केले आहे. पूर्वी महिनाभरातून एखादा ब्लास्ट होत होता. परंतु आता मात्र याठिकाणी जवळपास दररोजच प्रचंड प्रमाणात ब्लास्टींग होत आहे.

ठळक मुद्देबागवाडीत गिट्टी खदाण : भिंतींना पडल्या भेगा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरालगत असलेल्या बागवाडी शिवारातील गिट्टी खदानीतील ब्लास्टींगमुळे दारव्हा शहरातील काही घरांना दररोज प्रचंड हादरे बसतात. यामुळे शहरातील काही नगरातील नागरिक भयभीत झाले आहे. या ब्लास्टिंगमुळे भविष्यात विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.शहरापासून काही अंतरावर असलेल्या बागवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान सुरु करण्यात आल्या आहे. त्यात दोन मोठ्या कंन्स्ट्रक्शन कंपनीने याच परिसरात प्लांट सुरू केले आहे. पूर्वी महिनाभरातून एखादा ब्लास्ट होत होता. परंतु आता मात्र याठिकाणी जवळपास दररोजच प्रचंड प्रमाणात ब्लास्टींग होत आहे. खदानीच्या काही अंतरावर वृंदावन, शिक्षक कॉलनी तसेच कृषी कॉलनी आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात घरे आहे. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टमुळे येथील घरांना जोरदार हादरे बसतात. त्यामुळे अनेक घरांना तडे गेले.स्फोटाच्या आवाजाचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लहान बालके, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीवर मोठा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी सायंकाळच्या वेळी आशाच प्रकारे प्रचंड प्रमाणात स्फोट करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांना हादरे बसले. दररोज होणाºया स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गिट्टी खदानीत संबंधित कंपनी दगड फोडण्यासाठी दररोज ब्लास्ट करतात. यातून अनेकदा बारीक प्रमाणातील दगड अस्ताव्यस्त फेकले जातात. ब्लास्टच्या स्फोटामुळे प्रचंड आवाज होतो. या ब्लास्टचा मोठा हादरा बसतो. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून वृंदावन, शिक्षक कॉलनी व कृषी कॉलनीतील नागरिक भयभीत झाले आहे. त्यांना अनर्थ घडण्याची चिंता सतावत आहे. घरांना तडे जात असल्याने घर पडण्याची शक्यताही बळावली आहे. त्यामुळे या तिन्ही परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.नागरिकांनी दिले एसडीओंना निवेदनगिट्टी खदानीतील ब्लास्टमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. सोमवारी परिसरातील नागरिकांनी खदानीची चौकशी करून तत्काळ ब्लास्टींग बंद करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी अमोल गायके, विलास भड, गजानन आमटे, प्रल्हाद राठोड, विलास पुरी, देवराव बोकडे, ए.बी. बारडे, जी.बी. कामानकर, जी.पी. डोंगरे, जी.बी. मेश्राम, पी.एस. लोहकरे, व्ही.एस. केळकर, आर.एम. डवले, ए.आर. बोरकर, डी.यू. घुगे, श्याम रोडे, बळीराम थोरात आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक