शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ब्लास्टिंगमुळे दारव्हात घरांना हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST

शहरापासून काही अंतरावर असलेल्या बागवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान सुरु करण्यात आल्या आहे. त्यात दोन मोठ्या कंन्स्ट्रक्शन कंपनीने याच परिसरात प्लांट सुरू केले आहे. पूर्वी महिनाभरातून एखादा ब्लास्ट होत होता. परंतु आता मात्र याठिकाणी जवळपास दररोजच प्रचंड प्रमाणात ब्लास्टींग होत आहे.

ठळक मुद्देबागवाडीत गिट्टी खदाण : भिंतींना पडल्या भेगा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शहरालगत असलेल्या बागवाडी शिवारातील गिट्टी खदानीतील ब्लास्टींगमुळे दारव्हा शहरातील काही घरांना दररोज प्रचंड हादरे बसतात. यामुळे शहरातील काही नगरातील नागरिक भयभीत झाले आहे. या ब्लास्टिंगमुळे भविष्यात विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.शहरापासून काही अंतरावर असलेल्या बागवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान सुरु करण्यात आल्या आहे. त्यात दोन मोठ्या कंन्स्ट्रक्शन कंपनीने याच परिसरात प्लांट सुरू केले आहे. पूर्वी महिनाभरातून एखादा ब्लास्ट होत होता. परंतु आता मात्र याठिकाणी जवळपास दररोजच प्रचंड प्रमाणात ब्लास्टींग होत आहे. खदानीच्या काही अंतरावर वृंदावन, शिक्षक कॉलनी तसेच कृषी कॉलनी आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात घरे आहे. प्रचंड प्रमाणात होणाऱ्या ब्लास्टमुळे येथील घरांना जोरदार हादरे बसतात. त्यामुळे अनेक घरांना तडे गेले.स्फोटाच्या आवाजाचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लहान बालके, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीवर मोठा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी सायंकाळच्या वेळी आशाच प्रकारे प्रचंड प्रमाणात स्फोट करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांना हादरे बसले. दररोज होणाºया स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गिट्टी खदानीत संबंधित कंपनी दगड फोडण्यासाठी दररोज ब्लास्ट करतात. यातून अनेकदा बारीक प्रमाणातील दगड अस्ताव्यस्त फेकले जातात. ब्लास्टच्या स्फोटामुळे प्रचंड आवाज होतो. या ब्लास्टचा मोठा हादरा बसतो. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून वृंदावन, शिक्षक कॉलनी व कृषी कॉलनीतील नागरिक भयभीत झाले आहे. त्यांना अनर्थ घडण्याची चिंता सतावत आहे. घरांना तडे जात असल्याने घर पडण्याची शक्यताही बळावली आहे. त्यामुळे या तिन्ही परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.नागरिकांनी दिले एसडीओंना निवेदनगिट्टी खदानीतील ब्लास्टमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे. सोमवारी परिसरातील नागरिकांनी खदानीची चौकशी करून तत्काळ ब्लास्टींग बंद करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी अमोल गायके, विलास भड, गजानन आमटे, प्रल्हाद राठोड, विलास पुरी, देवराव बोकडे, ए.बी. बारडे, जी.बी. कामानकर, जी.पी. डोंगरे, जी.बी. मेश्राम, पी.एस. लोहकरे, व्ही.एस. केळकर, आर.एम. डवले, ए.आर. बोरकर, डी.यू. घुगे, श्याम रोडे, बळीराम थोरात आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक