शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भाजपाच्या एकजुटीने झाली राष्ट्रवादीची कोंडी

By admin | Updated: July 12, 2014 01:48 IST

शहरात राष्ट्रवादीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत नगपरिषदेतील सत्तेत भागीदारी मिळविली. आता सहा सदस्यांच्या भरवशावर ...

यवतमाळ : शहरात राष्ट्रवादीने आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत नगपरिषदेतील सत्तेत भागीदारी मिळविली. आता सहा सदस्यांच्या भरवशावर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी दावेदारी केली जात आहे. मात्र भाजप नगरसेवकांनी जुळवून घेण्याचा पवित्रा घेतल्याने राजकीय समिकरणालाच कलाटणी मिळाली आहे.राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी एका ज्येष्ठ नगरसेवकाच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या व्यक्तीगत प्रभावाचा उपयोग संख्याबळ जुळविण्यासाठी होईल हा त्यामागे छूपा उद्देश आहे. मात्र ही सर्व प्रक्रिया नेत्यांच्याच पातळीवर झाली. प्रत्यक्ष नगरसेवकांचे मत जाणून घेण्यात आले नाही. त्यामुळेच भाजप नगरसेवकांच्या बैैठकीत नगराध्यक्ष भाजपचाच व्हावा असा एकमुखी सुर उमटला. बंडखोर सदस्यांनीच एकत्र येण्याचा मनसुबा व्यक्त केल्याने कालपर्यंत दुफळीमुळे दुबळी वाटणारी भाजप अचानक भक्कम झाली आहे. सहा सदस्यांच्या बळावर राष्ट्रवादीने निर्णय प्रक्रियाच आपल्या हाती केंद्रित केली होती. यासाठी भाजप नगरसेवकांत असलेली फुट राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. आता राजकीय समीकरण बदलले असून केलेल्या चुकांची जाणीव भाजप नगरसेवकांना झाली आहे. भाजप नगरसेवकांच्या या भुमिकेमुळे राष्ट्रवादीची मात्र कोंडी झाली आहे. परंपरागत आघाडी असलेल्या काँग्रेस सोबत फारकत घेऊन राष्ट्रवादीने सत्तेत भागीदारी मिळविली. आत ही भागीदारीच संपुष्टात येते की काय अशी स्थिती आहे. सत्तेसाठी आघाडी स्थापन करून ‘वाटा-घाटी’ करणाऱ्या भाजप नेत्यानेही आपले हात वर केले आहे. विशेष असे, यवतमाळचा आगामी नगराध्यक्ष भाजपचाच व्हावा, अशी मागणी पक्ष श्रेष्ठीकडे करण्यात आली आहे. ही मागणी करताना संख्याबळाची हमी भाजपा पदाधिकारी आणि नेत्यानी घेतली आहे. राष्ट्रवादीला बाजूला ठेवून भाजपने संख्याबळ जुळविल्यास सत्तेतील मोठा भागीदार बाहेर निघणार आहे. त्यामुळे मागच्या अडीच वर्षात पदासाठी झालेली स्पर्धा कमी होणार आहे. पक्षासोबतच सत्तेसाठी मदत करणाऱ्या प्रत्येकाला पद देण्याचेही नियोजन केले जात आहे. बहुमत काठावरचे असलेतरी कोणताच फरक पडणार नाही, असा सुर भाजपच्या गोटातून उमटत आहे.भाजपाच्या स्वतंत्र खेळीला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने सहा सदस्यांना सोबत घेवून काँग्रेसेचे ११ सदस्य आणि बसपाच्या चार सदस्यांसोबत हात मिळवणी केल्यास त्यांनाही २१ हा काठावरच्या बहुमताचा आकडा गाठता येणे शक्य आहे. मात्र दरम्यानच्या काळात बरेच पाणी वाहून गेले आहे. बसपाचे सदस्य एकत्र नाहीत. हे समीकरण जुळवण्यासाठी ‘शक्ती’ खर्ची घालावी लागणार आहे. अशा स्थितीत बंडखोरी होण्याची चिन्हे कमीच आहे. आज तरी भाजपाचे पारडे जड दिसत आहे. अपक्ष तीन, बसपाचे एक आणि शिवसेना-भाजपचे १७ सदस्य मिळून संख्याबळाचे गणित मांडले जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे धक्कातंत्र पाहता शेवटच्या क्षणी यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेच्या राजकारणातील दोन मात्तबर आहेत. नवख्यांची दाणादाण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ते दोघे एकत्र आल्यास काहीही शक्य होऊ शकते, हा धोका ओळखुनच भाजपाकडून प्रत्येक पावित्रा सावधतेने घेतला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)