शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

उमेदवारीसाठी भाजपाचे सर्वेक्षण

By admin | Updated: June 9, 2014 23:50 IST

विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघात कोण सक्षम उमेदवार ठरू शकतो याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. आतापर्यंत केवळ राज्यस्तरावर हे सर्वेक्षण केले जात होते.

विधानसभा : दिल्ली, मुंबईची चार पथके येणार यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघात कोण सक्षम उमेदवार ठरू शकतो याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. आतापर्यंत केवळ राज्यस्तरावर हे सर्वेक्षण केले जात होते. यावेळी मात्र केंद्रस्तरावरूनही दोन वेगवेगळ्या चमूंमार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. केंद्रात एकहाती सत्ता मिळविल्यानंतर भाजपाने आता राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अधिकाधिक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता असावी, असा प्रयत्न आहे. त्यातही २0१४ मध्ये निवडणुका होणार्‍या महाराष्ट्रासह अन्य राज्यांवर भर दिला जात आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेचे मत कोणत्या उमेदवाराबाबत चांगले आहे, कोण निवडून येऊ शकतो, याबाबत सर्वेक्षण केले जाते. आतापर्यंत प्रदेश भाजपाकडून दोन वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत हे सर्वेक्षण केले जात होते. त्यातील निष्कर्ष आधार मानून उमेदवारी दिली जात होती. परंतु अनेकदा नेत्यांनी आपल्या सोईच्या उमेदवारासाठी हे सर्वेक्षणही सोईने करून घेतल्याचा आरोप केला गेला. त्यामुळे खुद्द इच्छुक उमेदवारांनाच या सर्वेक्षणावर तेवढा विश्‍वास नाही. त्यामुळेच यावेळी राज्यासोबतच केंद्र शासनानेही आपल्या स्तरावरून महाराष्ट्रातील भाजपाच्या वाट्याला असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघात दोन एनजीओमार्फत स्वतंत्र सर्वेक्षण करावे, अशी मागणी रेटली गेली.                   (जिल्हा प्रतिनिधी)