शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

भाजपा खासदार-आमदारांत मतभेद

By admin | Updated: February 21, 2016 01:50 IST

भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून खासदार व आमदारांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहे.

जिल्हाध्यक्ष निवड : प्रदेशाध्यक्षांचा ‘रिपीट’चा निर्णय धुडकावला यवतमाळ : भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून खासदार व आमदारांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहे. त्यातूनच प्रदेश कार्यालयाने जिल्हाध्यक्ष ‘रिपीट’चा पाठविलेला निर्णय येथे रोखण्यात आला आहे. केंद्रात व राज्यात युतीची सत्ता असल्याने भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदाला वेगळेच वजन निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष होण्यासाठी भाजपात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. कुणाच्या गटाचा जिल्हाध्यक्ष व्हावा यावरून आता नेत्यांमध्येही गट पडले आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या नावाला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची पसंती आहे. म्हणूनच ना. अहीर हे डांगे यांना खास प्रदेशाध्यक्षांच्या भेटीसाठी चार दिवसांपूर्वी पुण्यात व नंतर मुंबईत घेऊन गेले होते. केंद्रीय राज्यमंत्र्यांचा आग्रह पाहता त्यांनी सूचविलेल्या नावाला प्रदेशाध्यक्षांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्याचे सांगितले जाते. मात्र ‘जिल्हास्तरावरील विरोध तुम्ही शमवा’ अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपविली गेली. डांगे यांना रिपीट केले जाणार असल्याचे वृत्त धडकताच भाजपाची स्थानिक नेते मंडळी आणि आमदार अस्वस्थ झाले. त्यांनी प्रदेश महामंत्री रवी भुसारी यांना संपर्क केला. प्रदेशाध्यक्षांच्या आग्रहापुढे आपला नाईलाज झाल्याचे उत्तर त्यांच्याकडून दिले गेल्याचे सांगितले जाते. ना. हंसराज अहीर यांनी प्रदेशाध्यक्षांकडून जिल्हाध्यक्ष पदाचे गणित शिजवून आणल्याने येथील आमदार मंडळी व पक्षाचे माजी खासदार, माजी आमदार नाराज आहेत. जिल्हाध्यक्ष जिल्ह्यात ठरणार की मुंबईत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या मुद्यावरून खासदार व आमदार यांच्यातील मतभेदही उघड झाले. आमदारांचा विरोध झुगारुन खासदारांनी आपल्या सोईचा जिल्हाध्यक्ष बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या तरी या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत नाही. राजेंद्र डांगे मात्र ‘आपणच रिपीट होणार, प्रदेशने ग्रीन सिग्नल दिला, स्थानिक विरोधही निपटून काढू’ असे कार्यकर्त्यांना दाव्याने सांगताना दिसत आहे. तर रिपीट होऊ नये म्हणून भाजपातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, नेते आणि विशेषत: संघ परिवार कामी लागल्याचे जिल्ह्याचे नेतृत्व खासदार ठरविणार की आमदार असा वाद भाजपात आता सुरू झाला आहे. त्यातूनच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होत आहे. अहीर यांच्या विरोधात यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या निमित्ताने उघड भूमिका घेतली आहे. वणीचे आमदार अहिरांच्या बाजूने आहे. उर्वरित चार आमदारांचा अजेंडा उघड झाला नसला तरी त्यांचीही भूमिका ‘रिपीट’ होऊ नये अशीच असल्याचे बोलले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)