शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

महागावात भाजपाला कुबड्याचा आधार

By admin | Updated: October 12, 2015 02:39 IST

नगरपंचायतीच्या निवडणुकीचे गणित जुळविण्यात सर्वच पक्ष आघाडीवर दिसत असताना या निवडणुकीत भाजपाची स्थिती मात्र केविलवाणी झाली आहे.

नगरपंचायत : निष्ठावंत कार्यकर्ते वाऱ्यावर, राजकीय वातावरण तापलेमहागाव : नगरपंचायतीच्या निवडणुकीचे गणित जुळविण्यात सर्वच पक्ष आघाडीवर दिसत असताना या निवडणुकीत भाजपाची स्थिती मात्र केविलवाणी झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर नऊ महिन्यातच भाजपाची वाताहत सुरू झाली आहे. शिस्तीमध्ये असलेला पक्ष आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडत आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला कुबड्याचा आधार घ्यावा लागत आहे.महागाव नगरपंचायतीसाठी नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख आता जवळ येत आहे. उमेदवारांवर दबाव आणून त्यांना नामांकन मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. भाजपही यात आघाडीवर दिसत आहे. मात्र या निवडणुकीत त्यांना कुबड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते भाजपात गेले नसले तरी भाजपाच्या बुडत्या जहाजाला दिशा देण्याचे काम ते पडद्याआड करीत आहे. त्यामुळे भाजपाला नदी पार करण्याचा आनंद वाटत असला तरी भाजपाच्या नावेला निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता छिद्र पाडणे सुरू केले आहे.काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, अपक्ष अशा सर्वच स्तरातील कार्यकर्त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत दुखावल्या गेले आहे. पक्षात सुरू असलेला तिकिट वाटपाचा खेळ भाजपातील ज्येष्ठ नेत्यांनाही माहीत आहे. खरी गोम ही आहे की, विधानसभेच्या निवडणुकीनंतर अल्पकाळात विद्यमान आमदाराने मतदारांची वचनपूर्ती केली नाही. त्याचा आता नगरपंचायत निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. जनतेच्या दारावर मते मागायला जायचे कसे, असा प्रश्न सुरू आहे.गेल्या १० महिन्यात महागावत कोणतेही विकासाचे काम आणले नाही. निवडणुकीच्या तोंडावर २५ लाख रुपयांची कामे देण्याचा केलेला वादा आणि शहरातील रस्त्यांचे घेतलेले मोजमाप किती खोटारडेपणाचे होते, याची वाच्यता होतानाच आचारसंहिता लागली. आता मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जावे म्हणून भाजपाची सूत्रे पडद्याआड काँग्रेस नेत्याच्या हाती दिली आहे. विद्यमान आमदारांनी जनसंपर्कही कमी केला आहे. महागाव, फुलसावंगी आणि उमरखेडमधून आमदारांचे घनिष्ठ होते तेही आता दूर झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या काळात विकासाला टक्केवारीचे ग्रहण लागले होते. त्यापलिकडे जावून सध्या अधिक टक्केवारी मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सर्व बाबींचा परिणाम भाजपाला नगरपंचायत निवडणुकीत सोसावा लागेल, हे कुणाला सांगणे न लागे. (शहर प्रतिनिधी)