शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

भाजपाला सर्वाधिक पाच जागा

By admin | Updated: October 19, 2014 23:18 IST

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात पैकी सर्वाधिक पाच जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. येथे काँग्रेसला एकही

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात पैकी सर्वाधिक पाच जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. येथे काँग्रेसला एकही जागा मिळविता आली नाही. गेल्या वेळी जिल्ह्यात काँग्रेसचे पाच आमदार होते. मात्र यावेळी या पाचही जागा भाजपाने पटकाविल्या. त्यामुळे शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार, विजय खडसे या दिग्गजांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पुत्र राहुल ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुसदमध्ये मनोहरराव नाईकांच्या रुपाने राष्ट्रवादीने तर दिग्रसमध्ये संजय राठोड यांच्या रुपाने शिवसेनेने आपली जागा कायम राखली. संजय राठोड यांनी विजयाची हॅटट्रिक साधताना ७९ हजार ८६४ एवढ्या विक्रमी मतांनी निवडून येण्याचा पराक्रम केला. मतांची ही आघाडी विदर्भात सर्वाधिक आहे. राष्ट्रवादीचे नेते मनोहरराव नाईक यांनीही तब्बल ६५ हजार ३५९ मतांची आघाडी घेत शिवसेनेचे प्रकाश पाटील देवसरकर यांचा पराभव केला. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चुरस पहायला मिळाली. अखेरच्या फेरीपर्यंत शिवसेना आणि भाजपा यांच्यात पाठलाग सुरू होता. अखेर भाजपाचे मदन येरावार यांनी अवघ्या एक हजार २२७ मतांनी निसटता विजय मिळविला. शिवसेनेचे संतोष ढवळे यांनी तब्बल ५२ हजार ४४४ मते घेत भाजपाला अखेरपर्यंत जोरदार लढत दिली. त्यांच्या थोड्या फरकाने झालेल्या पराभवाने यवतमाळ शहरासह मतदारसंघात सर्वत्र हळहळ पहायला मिळाली. बसपाच्या मो.तारीक मो.शमी यांनी ३४ हजार ४९८ मते घेऊन तिसरा क्रमांक गाठला. काँग्रेसचे राहुल ठाकरे (३२१५२) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया (१७९०९) यांना आपले डिपॉझिटही वाचविता आलेले नाही. शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील मतांच्या बळावर आमदारकीचे स्वप्न रंगविणाऱ्या रवींद्र देशमुख यांच्याही भ्रमाचा फुगा फुटला. त्यांना केवळ ११८९ मते मिळाली. मंत्री पदासाठी चढाओढ राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीची सत्ता येण्याची चिन्हे दिसू लागली आहे. ते पाहता मंत्रिमंडळात जिल्ह्यातून कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपातून मदन येरावार तर शिवसेनेतून संजय राठोड प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कारण भाजपाचे अन्य चार विजयी उमेदवार विधानसभेसाठी नवखे ठरत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये जिल्ह्याला दोन मंत्री पदे आणि विधानसभा उपाध्यक्षांच्या निमित्ताने तिसरा लाल दिवा मिळाला होता. यावेळी किती लालदिवे मिळतात याकडे नजरा लागल्या आहेत.