शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

भाजपाला सर्वाधिक पाच जागा

By admin | Updated: October 19, 2014 23:18 IST

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात पैकी सर्वाधिक पाच जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. येथे काँग्रेसला एकही

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सात पैकी सर्वाधिक पाच जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. येथे काँग्रेसला एकही जागा मिळविता आली नाही. गेल्या वेळी जिल्ह्यात काँग्रेसचे पाच आमदार होते. मात्र यावेळी या पाचही जागा भाजपाने पटकाविल्या. त्यामुळे शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार, विजय खडसे या दिग्गजांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे पुत्र राहुल ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला. पुसदमध्ये मनोहरराव नाईकांच्या रुपाने राष्ट्रवादीने तर दिग्रसमध्ये संजय राठोड यांच्या रुपाने शिवसेनेने आपली जागा कायम राखली. संजय राठोड यांनी विजयाची हॅटट्रिक साधताना ७९ हजार ८६४ एवढ्या विक्रमी मतांनी निवडून येण्याचा पराक्रम केला. मतांची ही आघाडी विदर्भात सर्वाधिक आहे. राष्ट्रवादीचे नेते मनोहरराव नाईक यांनीही तब्बल ६५ हजार ३५९ मतांची आघाडी घेत शिवसेनेचे प्रकाश पाटील देवसरकर यांचा पराभव केला. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चुरस पहायला मिळाली. अखेरच्या फेरीपर्यंत शिवसेना आणि भाजपा यांच्यात पाठलाग सुरू होता. अखेर भाजपाचे मदन येरावार यांनी अवघ्या एक हजार २२७ मतांनी निसटता विजय मिळविला. शिवसेनेचे संतोष ढवळे यांनी तब्बल ५२ हजार ४४४ मते घेत भाजपाला अखेरपर्यंत जोरदार लढत दिली. त्यांच्या थोड्या फरकाने झालेल्या पराभवाने यवतमाळ शहरासह मतदारसंघात सर्वत्र हळहळ पहायला मिळाली. बसपाच्या मो.तारीक मो.शमी यांनी ३४ हजार ४९८ मते घेऊन तिसरा क्रमांक गाठला. काँग्रेसचे राहुल ठाकरे (३२१५२) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया (१७९०९) यांना आपले डिपॉझिटही वाचविता आलेले नाही. शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील मतांच्या बळावर आमदारकीचे स्वप्न रंगविणाऱ्या रवींद्र देशमुख यांच्याही भ्रमाचा फुगा फुटला. त्यांना केवळ ११८९ मते मिळाली. मंत्री पदासाठी चढाओढ राज्यात भाजपा आणि शिवसेना युतीची सत्ता येण्याची चिन्हे दिसू लागली आहे. ते पाहता मंत्रिमंडळात जिल्ह्यातून कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपातून मदन येरावार तर शिवसेनेतून संजय राठोड प्रबळ दावेदार मानले जात आहेत. कारण भाजपाचे अन्य चार विजयी उमेदवार विधानसभेसाठी नवखे ठरत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये जिल्ह्याला दोन मंत्री पदे आणि विधानसभा उपाध्यक्षांच्या निमित्ताने तिसरा लाल दिवा मिळाला होता. यावेळी किती लालदिवे मिळतात याकडे नजरा लागल्या आहेत.