शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

सेना वरचढ होण्याची भाजपाला भीती

By admin | Updated: December 4, 2014 23:15 IST

जिल्ह्यातून शिवसेनेचा मंत्रीपदाचा मार्ग सुकर होताच भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सेनेला मंत्रीपद मिळाल्यास आणि भाजपाला संधे नाकारल्यास जिल्ह्यात शिवसेना वरचढ

मंत्रिपदासाठी लॉबिंग : शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला यवतमाळ : जिल्ह्यातून शिवसेनेचा मंत्रीपदाचा मार्ग सुकर होताच भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सेनेला मंत्रीपद मिळाल्यास आणि भाजपाला संधे नाकारल्यास जिल्ह्यात शिवसेना वरचढ होण्याची हूरहूर भाजपा नेत्यांना लागली आहे. त्यामुळेच या नेत्यांनी भाजपालाही जिल्ह्यात मंत्रीपद मिळावे म्हणून थेट मुख्यमंत्र्यांकडे मोर्चेबांधणी चालविली आहे.जिल्ह्यातील भाजपा नेत्यांचे एक शिष्टमंडळ सकाळीच नागपूरला रवाना झाले. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी ४ ची वेळ भेटीसाठी दिली आहे. त्यानंतर ते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री तथा विदर्भातील भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचीही भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात जिल्ह्यातील भाजपाच्या तीन आमदारांसह अन्य काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ आमदार मदन येरावार यांना ५ डिसेंबरच्या विस्तारात मंत्रीपद मिळावे म्हणून मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहे. त्याच प्रमाणे येरावार यांचे राजकीय गॉडफादर असलेल्या नितीन गडकरी यांच्याकडूनही मंत्रीपदाबाबतचा शब्द मिळविण्याचा या शिष्टमंडळाचा प्रयत्न राहणार आहे. शिवसेना सत्तेत सहभागी होत आहे. सेनेच्या वाट्याला पाच कॅबिनेट व सात राज्यमंत्रीपदे येणार आहेत. त्यात यवतमाळ जिल्ह्यातून शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख संजय राठोड यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे विस्तारात भाजपाच्या वाट्याला केवळ आठ जागा येणार असल्याने आणि इच्छुकांची रांग बरीच मोठी असल्याने जिल्ह्यातून आतापर्यंत निश्चित मानल्या जाणाऱ्या मदन येरावार यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. याची जाणीव झाल्याने भाजपाच्या नेत्यांनी मदन येरावार यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मोर्चेबांधणी चालविली. विशेष असे, या शिष्टमंडळात खुद्द मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले मदन येरावार यांचाच समावेश नाही. यावरून येरावार यांनीच हे शिष्टमंडळ पाठविले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. भाजपाचे जिल्ह्यातील अन्य आमदार पहिल्यांदाच निवडून आल्याने ‘तुम्हाला आत्ताच संधी नाही’ असे म्हणून त्यातील तिघांना लॉबिंगसाठी शिष्टमंडळात समाविष्ठ करून घेण्यात आले आहे. विशेष असे, या चार पैकी आर्णीचे आमदार राजू तोडसाम यांनी आपल्याला मंत्रीपद मिळावे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यामार्फत जोरदार फिल्डींग लावली आहे. विदर्भातून आदिवासी समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे म्हणून तोडसाम प्रयत्नरत आहेत. जिल्ह्यात भाजपाला मंत्रीपद न मिळाल्यास पक्षाचे वजन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवसेनेला मंत्रीपद मिळाल्यास आणि भाजपाला न मिळाल्यास सेनेचे जिल्हाभर नेटवर्क निर्माण होईल, प्रशासनावरही सेनेचीच पकड राहील. एक आमदार असूनही सेना वरचढ तर पाच आमदार असूनही भाजपा राजकीयदृष्ट्या मागे फेकली जाण्याची हूरहूर व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे नेटवर्क वाढल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपावर शिवसेना वरचढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचाच आधार घेऊन भाजपाचे शिष्टमंडळ मदन येरावार यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे लॉबिंग करीत आहे. मात्र येरावार यांच्यावर पूर्णत: गडकरींचा लागलेला शिक्का, त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेला सलोखा, बिल्डर लॉबीशी हितसंबंध पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शिष्टमंडळाला किती गांभीर्याने घेतात हे पाहणेही तेवढेच महत्वाचे ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)