शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

उमेदवारीसाठी भाजपालाच अधिक पसंती

By admin | Updated: January 13, 2017 01:36 IST

लोकसभा, विधानसभेनंतर नगरपालिकांवरही झेंडा फडकविणाऱ्या भारतीय जनता पार्टीची राजकारण्यांना चांगलीच भुरळ पडली आहे.

जि.प., पं.स.निवडणूक : विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भाजपाच्या छावणीतसंतोष कुंडकर  वणीलोकसभा, विधानसभेनंतर नगरपालिकांवरही झेंडा फडकविणाऱ्या भारतीय जनता पार्टीची राजकारण्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. येत्या १६ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी भाजपाच्या तंबूत ईच्छूकांची गर्दी झाली आहे. विविध राजकीय पक्षांचे अनेक कार्यकर्ते भाजपाच्या छावणीत दाखल होत असले तरी नोटाबंदीचा फटका सहन करणारा ग्रामीण मतदार आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपा कौैल देणार का, असा प्रश्न राजकीय विश्लेषकांच्या गोटात चर्चिला जात आहे. बुधवारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला. निवडणुकीला उणापुरा एक महिना आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. लोकसभा, विधानसभेनंतर राज्यातील बहुतांश नगरपालिकांवर भारतीय जनता पार्टीने सत्ता प्राप्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थाही आपल्या ताब्यात असाव्या, यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी भाजपाने आतापासूनच व्यूहरचना आखली आहे. भाजपाचे राजकीय यश लक्षात घेता विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर आहेत. काहींनी अधिकृत प्रवेशदेखील घेतला आहे. यामुळे भाजपाची ताकद वाढत असली तरी नोटाबंदीनंतर प्रचंड त्रास सहन करणारा ग्रामीण मतदार काय भूमिका घेते, याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागले आहे. मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणात भाजपाला फारशी मुसंडी मारता आली नाही. वणी तालुक्यातील चार जि.प.व आठ पं.स गणांपैकी एक जि.प.व एक पंचायत समिती गण भाजपाला ताब्यात घेता आला. या उलट या तालुक्यात शिवसेनेचेच प्राबल्य राहिले आहे. आता आगामी निवडणुकीत सेनेच्या अस्तित्वाला भाजपाकडून कशा पद्धतीने सुरूंग लावण्याचा प्रयत्न केला जाईल, हे पाहणे रंजक ठरणार आहे. मारेगाव व झरी तालुक्यातही भाजपाची हिच अवस्था होती. त्यामुळे आता भाजपाला कॉंग्रेस, शिवसेना व मनसेला शह देण्यासाठी फार मोठी ताकद पणाला लावावी लागणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू असून काही पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या आहेत. नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळे जुने निष्ठावान कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. नव्याने पक्षात दाखल झालेले पदाधिकारी तिकीटाची अपेक्षा ठेऊन आहेत. त्यामुळे तिकीट वाटप करताना निष्ठावानांची मर्जी सांभाळताना पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागणार आहे.