शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

विदर्भातील सिंचनाची १७० कोटींची देयके औरंगाबादेत पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 10:33 IST

विदर्भातील पूर्ण झालेल्या लघु सिंचनाच्या कामांची १७० कोटी रुपयांची देयके गेल्या चार महिन्यांपासून औरंगाबाद येथे जलसंधारण मंडळात पडून आहेत. या देयकांच्या मंजुरीसाठी जाणीवपूर्वक अडवणुकीचे धोरण राबविले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

ठळक मुद्दे नागपूरच्या मंत्र्यांनीही हात टेकले नागपूरच्या मंत्र्यांनीही हात टेकले

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भातील पूर्ण झालेल्या लघु सिंचनाच्या कामांची १७० कोटी रुपयांची देयके गेल्या चार महिन्यांपासून औरंगाबाद येथे जलसंधारण मंडळात पडून आहेत. या देयकांच्या मंजुरीसाठी जाणीवपूर्वक अडवणुकीचे धोरण राबविले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यांत सन २०१२ ते २०१७ या पाच वर्षांसाठी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम राबविला गेला. यातून कृषी व मृदसंधारणासाठी १ हजार ७९१ कोटी तर लघु सिंचनासाठी (जलसंधारण) १ हजार ४५९ कोटी अशा एकूण तीन हजार २५० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मार्च २०१७ अखेरपर्यंत ८७४ कोटी ६७ लाख एवढा निधी प्राप्त झाला व तो खर्चही झाला. उपरोक्त निधीतून लघु सिंचनाच्या एक हजार ८७० योजना पूर्ण झाल्या. तर काही अंतिम टप्प्यात आहेत. कामे पूर्ण होऊनही निधीअभावी प्रलंबित देयकांचा प्रस्ताव लघु सिंचन मंडळाच्या नागपूर व अमरावती येथील अधीक्षक अभियंत्यांनी शासनाला सादर केला. अशा ६९८ कामांची १७० कोटी ३७ लाखांची देयके जलसंधारण मंडळाकडून देण्याचा निर्णय १३ सप्टेंबर २०१७ रोजी ग्रामविकास व जलसंधारण खात्याने घेतला. तेव्हापासून ही देयके जलसंधारण मंडळाच्या औरंगाबाद मुख्यालयात पडून आहेत. हे मंडळ नव्यानेच औरंगाबादमध्ये स्थापित जलसंधारण आयुक्तालयाच्या अखत्यारीत आहे.गेल्या चार महिन्यांपासून या देयकांसाठी विदर्भातून पाठपुरावा केला जात आहे. परंतु अद्यापही ही देयके मार्गी लागलेली नाही. दुसरीकडे आणखी ७० कोटींची देयके शासन स्तरावर मंजुरीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे औरंगाबाद जलसंधारण मंडळाकडून विदर्भाला किमान २४० कोटी रुपये देयक मंजुरीतून लागणार आहे. ही देयके निघावी म्हणून नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातत्याने बैठका घेतल्या, पाठपुरावा केला, परंतु त्यानंतरही देयके निघाली नाही. ‘खाते बदल करून द्या, तत्काळ देयके मंजूर करुन दाखवितो’ अशा शब्दात ना. बावनकुळे यांनी एका बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे जलसंधारण खात्यातील सूत्रांनी सांगितले. १७० कोटींची ही देयके रोखून धरण्यात राजकीय वर्चस्व व प्रांतिक वाद तर नाही ना, अशी शंकाही व्यक्त होऊ लागली आहे.

विदर्भातील सिंचनाकडे पाठप्रा. राम शिंदे यांनी आपले वजन वापरुन कृषी खात्याचे विभाजन करीत जलसंधारण हे स्वतंत्र खाते अस्तित्वात आणले. त्याचे आयुक्तालय औरंगाबादेत आहे. मात्र गेल्या तीन वर्षात विदर्भातील लघुसिंचनाच्या नव्या कामांना मंजुरीच दिली गेली नसल्याचे या विभागातून सांगण्यात आले.

टॅग्स :Governmentसरकार