शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

बळीराजा चेतना अभियानाला पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 21:15 IST

बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा अहवाल त्रयस्त संस्थेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने अभियान सुरू ठेवण्यासाठी महसूल विभागाकडेही प्रस्ताव पाठविला होता.

ठळक मुद्देपेरणीसाठी साडेतीन कोटी : शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी अडीच कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा अहवाल त्रयस्त संस्थेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने अभियान सुरू ठेवण्यासाठी महसूल विभागाकडेही प्रस्ताव पाठविला होता. या दोन्ही बाबींचा संयुक्त विचार झाल्यानंतर अभियानाला वर्षभराची मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता असून तूर्त जिल्हा प्रशासनाने आपल्या स्तरावर महिनाभराची मुदतवाढ केली आहे.यामुळे अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अभियानातून साडेतीन कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी निधीही महिला बालकल्याण विभागाकडे वळता करण्यात आला आहे. २०१५ पासून बळीराजा चेतना अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली होती. या अभियानाच्या माध्यमातून शेतकºयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे, कार्यशाळा घेणे, आर्थिक मदत करणे आणि आरोग्यासाठी निधी पुरविणे, सामूहिक विवाह मेळावे घेणे यासह विविध बाबींचा यामध्ये समावेश आहे. या अभियानाच्या माध्यमातून गत चार वर्षामध्ये काय बदल झाले, याचा अभ्यास करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर हा अहवाल राज्य शासनाकडे सादर झाला.आता या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली. यामुळे आचारसंहितेपूर्वी बळीराजा चेतना अभियानाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वळता केला. तर दोन कोटी ३६ लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळता करण्यात आला. या निधीतून यावर्षीच्या हंगामात विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. प्रत्येक ग्रामस्तरीय समितीला ३० हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यातून ६ शेतकऱ्यांना निधीचे वितरण केले जाणार आहे. पेरणीसाठी मदत म्हणून हा निधी दिला जाणार आहे. याकरिता ग्रामपंचायतीला ग्रामसभेत बहुमताचा ठराव घेऊन शेतकऱ्यांची निवड करायची आहे. यानंतर हा निधी शेतकऱ्यांना वितरीत करायचा आहे. शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याकरिता निधी वितरित करण्यात आला आहे. यासोबतच विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे.बळीराजा चेतना अभियानाच्या मुदतवाढीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तूर्त जिल्हा प्रशासनाने आपल्या स्तरावर महिनाभराची मुदतवाढ दिली आहे. अंमलबजावणीसाठी लागणारा निधी संबंधित विभागाकडे वळता करण्यात आला आहे. यासोबतच या हंगामात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे.- ललित वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरी