शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

बळीराजा चेतना अभियानाला पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 21:15 IST

बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा अहवाल त्रयस्त संस्थेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने अभियान सुरू ठेवण्यासाठी महसूल विभागाकडेही प्रस्ताव पाठविला होता.

ठळक मुद्देपेरणीसाठी साडेतीन कोटी : शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी अडीच कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा अहवाल त्रयस्त संस्थेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने अभियान सुरू ठेवण्यासाठी महसूल विभागाकडेही प्रस्ताव पाठविला होता. या दोन्ही बाबींचा संयुक्त विचार झाल्यानंतर अभियानाला वर्षभराची मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता असून तूर्त जिल्हा प्रशासनाने आपल्या स्तरावर महिनाभराची मुदतवाढ केली आहे.यामुळे अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अभियानातून साडेतीन कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी निधीही महिला बालकल्याण विभागाकडे वळता करण्यात आला आहे. २०१५ पासून बळीराजा चेतना अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली होती. या अभियानाच्या माध्यमातून शेतकºयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे, कार्यशाळा घेणे, आर्थिक मदत करणे आणि आरोग्यासाठी निधी पुरविणे, सामूहिक विवाह मेळावे घेणे यासह विविध बाबींचा यामध्ये समावेश आहे. या अभियानाच्या माध्यमातून गत चार वर्षामध्ये काय बदल झाले, याचा अभ्यास करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर हा अहवाल राज्य शासनाकडे सादर झाला.आता या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली. यामुळे आचारसंहितेपूर्वी बळीराजा चेतना अभियानाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वळता केला. तर दोन कोटी ३६ लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळता करण्यात आला. या निधीतून यावर्षीच्या हंगामात विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. प्रत्येक ग्रामस्तरीय समितीला ३० हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यातून ६ शेतकऱ्यांना निधीचे वितरण केले जाणार आहे. पेरणीसाठी मदत म्हणून हा निधी दिला जाणार आहे. याकरिता ग्रामपंचायतीला ग्रामसभेत बहुमताचा ठराव घेऊन शेतकऱ्यांची निवड करायची आहे. यानंतर हा निधी शेतकऱ्यांना वितरीत करायचा आहे. शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याकरिता निधी वितरित करण्यात आला आहे. यासोबतच विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे.बळीराजा चेतना अभियानाच्या मुदतवाढीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तूर्त जिल्हा प्रशासनाने आपल्या स्तरावर महिनाभराची मुदतवाढ दिली आहे. अंमलबजावणीसाठी लागणारा निधी संबंधित विभागाकडे वळता करण्यात आला आहे. यासोबतच या हंगामात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे.- ललित वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरी