शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा चेतना अभियानाला पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 21:15 IST

बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा अहवाल त्रयस्त संस्थेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने अभियान सुरू ठेवण्यासाठी महसूल विभागाकडेही प्रस्ताव पाठविला होता.

ठळक मुद्देपेरणीसाठी साडेतीन कोटी : शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी अडीच कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बळीराजा चेतना अभियानाच्या अंमलबजावणीचा अहवाल त्रयस्त संस्थेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने अभियान सुरू ठेवण्यासाठी महसूल विभागाकडेही प्रस्ताव पाठविला होता. या दोन्ही बाबींचा संयुक्त विचार झाल्यानंतर अभियानाला वर्षभराची मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता असून तूर्त जिल्हा प्रशासनाने आपल्या स्तरावर महिनाभराची मुदतवाढ केली आहे.यामुळे अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अभियानातून साडेतीन कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी निधीही महिला बालकल्याण विभागाकडे वळता करण्यात आला आहे. २०१५ पासून बळीराजा चेतना अभियानाची अंमलबजावणी सुरू झाली होती. या अभियानाच्या माध्यमातून शेतकºयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे, कार्यशाळा घेणे, आर्थिक मदत करणे आणि आरोग्यासाठी निधी पुरविणे, सामूहिक विवाह मेळावे घेणे यासह विविध बाबींचा यामध्ये समावेश आहे. या अभियानाच्या माध्यमातून गत चार वर्षामध्ये काय बदल झाले, याचा अभ्यास करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. यानंतर हा अहवाल राज्य शासनाकडे सादर झाला.आता या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली. यामुळे आचारसंहितेपूर्वी बळीराजा चेतना अभियानाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वळता केला. तर दोन कोटी ३६ लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळता करण्यात आला. या निधीतून यावर्षीच्या हंगामात विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. प्रत्येक ग्रामस्तरीय समितीला ३० हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यातून ६ शेतकऱ्यांना निधीचे वितरण केले जाणार आहे. पेरणीसाठी मदत म्हणून हा निधी दिला जाणार आहे. याकरिता ग्रामपंचायतीला ग्रामसभेत बहुमताचा ठराव घेऊन शेतकऱ्यांची निवड करायची आहे. यानंतर हा निधी शेतकऱ्यांना वितरीत करायचा आहे. शेतकऱ्यांच्या मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याकरिता निधी वितरित करण्यात आला आहे. यासोबतच विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे.बळीराजा चेतना अभियानाच्या मुदतवाढीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तूर्त जिल्हा प्रशासनाने आपल्या स्तरावर महिनाभराची मुदतवाढ दिली आहे. अंमलबजावणीसाठी लागणारा निधी संबंधित विभागाकडे वळता करण्यात आला आहे. यासोबतच या हंगामात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे.- ललित वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरी