शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

भारत निर्माण प्रकल्पाचे भिजत घोंगडे

By admin | Updated: December 6, 2014 02:05 IST

मागील तीन वर्षांपासून येथे भारत निर्माण प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे नदीवरून मिळणाऱ्या शुध्द पाण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे.

मुकुटबन : मागील तीन वर्षांपासून येथे भारत निर्माण प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे नदीवरून मिळणाऱ्या शुध्द पाण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे. वर्षभर वेगाने चाललेले काम आता कासवगतीत येऊन ठेपल्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे़ येथे भारत निर्माण प्रकल्पांतर्गत ३ कोटी १७ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला़ त्या अनुषंगाने गावाच्या दक्षिणेस चार किलोमीटर अंतरावरील पैनगंगा नदीवरून मुकुटबनवासीयांना शुध्द पाणी देण्यासाठी काम सुरू झाले. तीन वर्षांपूर्वी कामाला सुरूवात झाली़ नदीवर तीन विहिरी बांधण्यात आल्या़ मात्र प्रत्यक्षात त्यावर अद्याप मोटर बसविण्यात आल्या नाही़ पाणी वितरण प्रणालीअंतर्गत सध्या गावात आहे, त्याच जुन्या पाईपलाईनला पाईप जोडण्यात आले आहे. गावाच्या उंच भागावर नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. एका मोकळ्या जागी जलशुध्दीकरणाची इमारतही तयार झाली आहे. हे सर्व बांधकाम पूर्ण होऊनही, ग्रामस्थांना अद्याप शुद्ध पाणी मिळालेच नाही. यात नेमकी माशी कुठे शिंकली, हे कळायला मार्ग नाही़या प्रकल्पाला मंजुरीसाठी तत्कालीन सरपंच प्रमोद बरशेट्टीवार, भूमारेड्डी बाजन्लावार, करमचंद बघेले, रमेश उदकवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कासावार यांच्या माध्यमातून मंजुरी प्राप्त करून घेतली. त्यानंतर भूमिपूजन करण्यातच वेळ वाया गेला़ अखेर घाई-गडबडीत भूमिपूजन आटोपले़ कामही सुरू झाले़ पूर्वी काम करणाऱ्या कंत्राटदाराला अनेक समस्यांचा सामना करावा लागला़ आता सर्व समस्या निकाली लागल्यानंतरही प्रकल्पाचे नेमके पाणी कुठे मुरत आहे, हे जनतेला कळत नाही. गावकऱ्यांना नदीवरून मिळणाऱ्या शुध्द पाण्याची प्रतीक्षाच लागून आहे. गावातील पाणी संपूर्ण फ्लोराईडयुक्त असल्यामुळे ग्रामस्थांना किडनी, गुडघ्याचे आजार, कमरेचे आजार, लहान मुलांचे हाडे ठिसूळ होणे, दात किडणे अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यातून कधी सुटका होईल, याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)