शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

भारत निर्माण प्रकल्पाचे भिजत घोंगडे

By admin | Updated: December 6, 2014 02:05 IST

मागील तीन वर्षांपासून येथे भारत निर्माण प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे नदीवरून मिळणाऱ्या शुध्द पाण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे.

मुकुटबन : मागील तीन वर्षांपासून येथे भारत निर्माण प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे नदीवरून मिळणाऱ्या शुध्द पाण्याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे. वर्षभर वेगाने चाललेले काम आता कासवगतीत येऊन ठेपल्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे़ येथे भारत निर्माण प्रकल्पांतर्गत ३ कोटी १७ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला़ त्या अनुषंगाने गावाच्या दक्षिणेस चार किलोमीटर अंतरावरील पैनगंगा नदीवरून मुकुटबनवासीयांना शुध्द पाणी देण्यासाठी काम सुरू झाले. तीन वर्षांपूर्वी कामाला सुरूवात झाली़ नदीवर तीन विहिरी बांधण्यात आल्या़ मात्र प्रत्यक्षात त्यावर अद्याप मोटर बसविण्यात आल्या नाही़ पाणी वितरण प्रणालीअंतर्गत सध्या गावात आहे, त्याच जुन्या पाईपलाईनला पाईप जोडण्यात आले आहे. गावाच्या उंच भागावर नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. एका मोकळ्या जागी जलशुध्दीकरणाची इमारतही तयार झाली आहे. हे सर्व बांधकाम पूर्ण होऊनही, ग्रामस्थांना अद्याप शुद्ध पाणी मिळालेच नाही. यात नेमकी माशी कुठे शिंकली, हे कळायला मार्ग नाही़या प्रकल्पाला मंजुरीसाठी तत्कालीन सरपंच प्रमोद बरशेट्टीवार, भूमारेड्डी बाजन्लावार, करमचंद बघेले, रमेश उदकवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कासावार यांच्या माध्यमातून मंजुरी प्राप्त करून घेतली. त्यानंतर भूमिपूजन करण्यातच वेळ वाया गेला़ अखेर घाई-गडबडीत भूमिपूजन आटोपले़ कामही सुरू झाले़ पूर्वी काम करणाऱ्या कंत्राटदाराला अनेक समस्यांचा सामना करावा लागला़ आता सर्व समस्या निकाली लागल्यानंतरही प्रकल्पाचे नेमके पाणी कुठे मुरत आहे, हे जनतेला कळत नाही. गावकऱ्यांना नदीवरून मिळणाऱ्या शुध्द पाण्याची प्रतीक्षाच लागून आहे. गावातील पाणी संपूर्ण फ्लोराईडयुक्त असल्यामुळे ग्रामस्थांना किडनी, गुडघ्याचे आजार, कमरेचे आजार, लहान मुलांचे हाडे ठिसूळ होणे, दात किडणे अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यातून कधी सुटका होईल, याची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)