शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

शेतकऱ्यांचा विकासच भाऊसाहेबांचे ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भारतातील शेतकऱ्यांचा विकास हेच भाऊसाहेबांचे ध्येय होते. म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकºयांसाठी खर्ची ...

ठळक मुद्देख्वाजा बेग : शिवाजी विद्यालयात जयंती उत्सव, विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतातील शेतकऱ्यांचा विकास हेच भाऊसाहेबांचे ध्येय होते. म्हणूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकºयांसाठी खर्ची घातले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी केले.येथील शिवाजी विद्यालयात डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सभासद अ‍ॅड. भैयासाहेब पावडे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका उषा दिवटे, अशोक घारफळकर, मुख्याध्यापिका एस.एस. शेंडे, पर्यवेक्षक जी.एस. कणसे, संदीप ठाकरे, संजय पुरी, राजश्री कासलीकर, अनिल देशमुख आदी उपस्थित होते.भैयासाहेब पावडे यांचे अध्यक्षीय मार्गदर्शन झाले. उपस्थित पाहुण्यांनी समयोचित विचार मांडले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मिलिंद वाळके व चमूने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस.एस. शेंडे, संचालन धैर्यशील चौधरी यांनी केले. प्रा. सुनील कडू यांनी आभार मानले. यावेळी प्रवीण भोयर आदींची उपस्थिती होती.विद्यार्थ्यांचा गुणगौरवशिवाजी विद्यालयात विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. पर्यवेक्षक जी.एस. कणसे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक उद्धवराव साबळे, साधनाताई काळे, नितीन बांगर, विशाल पावडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष गुरनुले, संयोजक राजश्री कासलीकर आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन, हस्तकला, पोस्टर, रांगोळी आदी स्पर्धात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संचालन धैर्यशील चौधरी यांनी केले.