शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

खबरदार ! पीक विम्यातून कर्ज कापाल तर...

By admin | Updated: April 29, 2015 02:20 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनी पीक विम्याच्या मदतीतून शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते कापले.

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनी पीक विम्याच्या मदतीतून शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते कापले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बँकर्स कमिटीला आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. एवढेच नाही तर पीक विम्यातून कर्ज कापले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांना मदत दिली. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली. मात्र जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे सरळ कर्ज खात्यात वळते केले. राज्य समितीच्या शिफारसीनंतर जिल्ह्यातील कर्ज वितरणाबाबत कपातीचे धोरण राबवित आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी बॅकर्स कमिटीची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी कर्जाबाबत विविध सूचना दिल्या. तसेच अनेक अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कर्ज वितरणासाठी पुरेसा निधी नाही. त्यामुळे राज्य बँकेकडे अतिरिक्त कर्जाची मागणी करण्यात आली. या मागणीकडे राज्य बँकेने कानाडोळा केला. त्यामुळे मुबलक कर्ज वितरणासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असमर्थ आहे, असे या बैठकीत जिल्हा बँकेच्यावतीने सांगण्यात आले. राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँकांनीही आपल्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडल्या. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य समितीच्या शिफारसीनुसारच कर्ज वितरित करण्याचे आदेश दिले. यात हयगय करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. (शहर वार्ताहर)