शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे सर्वात चांगले नियोजन महाराष्ट्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 15:09 IST

पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरणात महाराष्ट्राचे काम देशात सर्वात चांगले आहे. तशी मोहर केंद्र सरकारने लावली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारची मोहर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला प्रथम पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरणात महाराष्ट्राचे काम देशात सर्वात चांगले आहे. तशी मोहर केंद्र सरकारने लावली आहे. सन २०१८ च्या सर्वोत्कृष्ट जलपुरस्कारासाठी महाराष्टष्ट्राची निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या हस्ते २५ फेब्रुवारीला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सन्मानित केले जाणार आहे.देशातील सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशात जल क्षेत्राशी संबंधित विविध घटकांचे देश पातळीवर मूल्यांकन करून सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्याची परंपरा केंद्र सरकारने २००७-०८ पासून सुरू केली आहे. सन २०१८ च्या सर्वोत्कृष्ट जल पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची निवड झाली आहे. जलसंपदा व पाण्याचे न्यायोचित, समसमान वितरण आणि व्यवस्थापनासाठी या प्राधिकरणाची स्थाापना झाली आहे. जागतिक बँकेची मदत व केंद्र सरकारच्या सहभागाने उभारले जाणारे प्रकल्प, सिंचन सुविधेतून निर्माण झालेल्या जलसंपदेचे शेती सिंचन, उद्योग, कारखाने, औष्णिक विद्युत प्रकल्प, स्थानिक स्वराज्य क्षेत्रात समसमान पेयजल वितरण व्यवस्था, नद्या व पाणी स्रोतांचे संपूर्ण व्यवस्थापन यासाठी हे प्राधिकरण कार्यरत आहे.या क्षेत्रात प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय व अंमलबजावणीचे होत असलेले सकारात्मक परिणाम याचा सर्वंकश विचार करून केंद्र सरकारने महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट जलनियमन प्राधिकरण म्हणून प्रथम पुरस्कारासाठी निवड केली आहे. पंतप्रधानासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्षी, अभियांत्रिकी सदस्य विनय कुळकर्णी, विधी सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी, अर्थ सदस्य डॉ.एस.टी. सांगळे, सचिव रसिकलाल चव्हाण हे हा सर्वोत्कृष्ट सन्मान स्वीकारणार आहे.महाराष्ट्र प्रथम पुरस्काराचे मानकरीसर्वोच्च न्यायालयाने पाण्याच्या अधिकाराला जीवन जगण्याचा मूलभूत-मौलिक अधिकार म्हणून संवैधानिक मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील प्राधिकरणाने महत्वपूर्ण आदेश पारित केले आहे. सर्वोत्कृष्ट जल पुरस्काराच्या निकषात महाराष्ट्रातील जलसंपत्ती प्राधिकरण सर्वच निकषावर सर्वोत्कृष्ट ठरल्याने देशातील सर्वोत्कृष्ट प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले आहे, अशी माहिती विधि सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणी