शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

पाण्याचे सर्वात चांगले नियोजन महाराष्ट्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 15:09 IST

पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरणात महाराष्ट्राचे काम देशात सर्वात चांगले आहे. तशी मोहर केंद्र सरकारने लावली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारची मोहर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला प्रथम पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरणात महाराष्ट्राचे काम देशात सर्वात चांगले आहे. तशी मोहर केंद्र सरकारने लावली आहे. सन २०१८ च्या सर्वोत्कृष्ट जलपुरस्कारासाठी महाराष्टष्ट्राची निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या हस्ते २५ फेब्रुवारीला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सन्मानित केले जाणार आहे.देशातील सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशात जल क्षेत्राशी संबंधित विविध घटकांचे देश पातळीवर मूल्यांकन करून सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्याची परंपरा केंद्र सरकारने २००७-०८ पासून सुरू केली आहे. सन २०१८ च्या सर्वोत्कृष्ट जल पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची निवड झाली आहे. जलसंपदा व पाण्याचे न्यायोचित, समसमान वितरण आणि व्यवस्थापनासाठी या प्राधिकरणाची स्थाापना झाली आहे. जागतिक बँकेची मदत व केंद्र सरकारच्या सहभागाने उभारले जाणारे प्रकल्प, सिंचन सुविधेतून निर्माण झालेल्या जलसंपदेचे शेती सिंचन, उद्योग, कारखाने, औष्णिक विद्युत प्रकल्प, स्थानिक स्वराज्य क्षेत्रात समसमान पेयजल वितरण व्यवस्था, नद्या व पाणी स्रोतांचे संपूर्ण व्यवस्थापन यासाठी हे प्राधिकरण कार्यरत आहे.या क्षेत्रात प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय व अंमलबजावणीचे होत असलेले सकारात्मक परिणाम याचा सर्वंकश विचार करून केंद्र सरकारने महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट जलनियमन प्राधिकरण म्हणून प्रथम पुरस्कारासाठी निवड केली आहे. पंतप्रधानासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्षी, अभियांत्रिकी सदस्य विनय कुळकर्णी, विधी सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी, अर्थ सदस्य डॉ.एस.टी. सांगळे, सचिव रसिकलाल चव्हाण हे हा सर्वोत्कृष्ट सन्मान स्वीकारणार आहे.महाराष्ट्र प्रथम पुरस्काराचे मानकरीसर्वोच्च न्यायालयाने पाण्याच्या अधिकाराला जीवन जगण्याचा मूलभूत-मौलिक अधिकार म्हणून संवैधानिक मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील प्राधिकरणाने महत्वपूर्ण आदेश पारित केले आहे. सर्वोत्कृष्ट जल पुरस्काराच्या निकषात महाराष्ट्रातील जलसंपत्ती प्राधिकरण सर्वच निकषावर सर्वोत्कृष्ट ठरल्याने देशातील सर्वोत्कृष्ट प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले आहे, अशी माहिती विधि सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणी