शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

पाण्याचे सर्वात चांगले नियोजन महाराष्ट्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 15:09 IST

पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरणात महाराष्ट्राचे काम देशात सर्वात चांगले आहे. तशी मोहर केंद्र सरकारने लावली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारची मोहर जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला प्रथम पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याचा काटकसरीने वापर, पुनर्उपयोग, सांडपाणी व्यवस्थापन आणि जलपुनर्भरणात महाराष्ट्राचे काम देशात सर्वात चांगले आहे. तशी मोहर केंद्र सरकारने लावली आहे. सन २०१८ च्या सर्वोत्कृष्ट जलपुरस्कारासाठी महाराष्टष्ट्राची निवड झाली आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या हस्ते २५ फेब्रुवारीला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सन्मानित केले जाणार आहे.देशातील सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशात जल क्षेत्राशी संबंधित विविध घटकांचे देश पातळीवर मूल्यांकन करून सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्याची परंपरा केंद्र सरकारने २००७-०८ पासून सुरू केली आहे. सन २०१८ च्या सर्वोत्कृष्ट जल पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची निवड झाली आहे. जलसंपदा व पाण्याचे न्यायोचित, समसमान वितरण आणि व्यवस्थापनासाठी या प्राधिकरणाची स्थाापना झाली आहे. जागतिक बँकेची मदत व केंद्र सरकारच्या सहभागाने उभारले जाणारे प्रकल्प, सिंचन सुविधेतून निर्माण झालेल्या जलसंपदेचे शेती सिंचन, उद्योग, कारखाने, औष्णिक विद्युत प्रकल्प, स्थानिक स्वराज्य क्षेत्रात समसमान पेयजल वितरण व्यवस्था, नद्या व पाणी स्रोतांचे संपूर्ण व्यवस्थापन यासाठी हे प्राधिकरण कार्यरत आहे.या क्षेत्रात प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय व अंमलबजावणीचे होत असलेले सकारात्मक परिणाम याचा सर्वंकश विचार करून केंद्र सरकारने महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट जलनियमन प्राधिकरण म्हणून प्रथम पुरस्कारासाठी निवड केली आहे. पंतप्रधानासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष के.पी. बक्षी, अभियांत्रिकी सदस्य विनय कुळकर्णी, विधी सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी, अर्थ सदस्य डॉ.एस.टी. सांगळे, सचिव रसिकलाल चव्हाण हे हा सर्वोत्कृष्ट सन्मान स्वीकारणार आहे.महाराष्ट्र प्रथम पुरस्काराचे मानकरीसर्वोच्च न्यायालयाने पाण्याच्या अधिकाराला जीवन जगण्याचा मूलभूत-मौलिक अधिकार म्हणून संवैधानिक मान्यता दिली आहे. महाराष्ट्रातील प्राधिकरणाने महत्वपूर्ण आदेश पारित केले आहे. सर्वोत्कृष्ट जल पुरस्काराच्या निकषात महाराष्ट्रातील जलसंपत्ती प्राधिकरण सर्वच निकषावर सर्वोत्कृष्ट ठरल्याने देशातील सर्वोत्कृष्ट प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले आहे, अशी माहिती विधि सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणी