शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

उघडे रोहित्र ठरताहेत जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 9:55 PM

वीज वितरण कंपनीचे शहरातील अनेक रोहित्र उघड्या अवस्थेत आहे. या रोहित्राजवळून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने स्पर्श होवून एखाद्याचा जीव जाण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देदारव्हा येथील समस्या : तक्रारींकडे वीज वितरणचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वीज वितरण कंपनीचे शहरातील अनेक रोहित्र उघड्या अवस्थेत आहे. या रोहित्राजवळून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने स्पर्श होवून एखाद्याचा जीव जाण्याचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, याबाबत सजग नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही वीज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.शहरातील रोहित्रावरील उघड्या पेट्या बंद करणे, फ्युजला ग्रीप लावणे याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार नागरिकांनी निवेदन दिले. दारव्हा ते कारंजा रोडवरील श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ रोहीत्र आहे. ते उघड्या अवस्थेत असल्याने जीवघेणे ठरत आहे. विविध नगरातील रोहित्रावरील पेट्या उघड्या असून वाटसरूंना मृत्यूचे निमंत्रण देत आहे. श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयातील हजारो विद्यार्थी या रोहित्राजवळूनच ये-जा करतात. तसेच बँक आॅफ इंडिया, स्टेट बँकेकडे जाणारा मार्ग, तलाठी कार्यालय, पोस्ट आॅफिस आदी भागात रोहीत्र असून ते उघडे आहे. या रोहित्राजवळच प्रवासी थांबा असल्यामुळे तेथे नेहमी गर्दी असते. नजर चुकीने रोहित्राच्या पेटीतील तारांना स्पर्श झाल्यास मृत्यूची दाट शक्यता आहे.रोहित्राच्या पेट्या बंद करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. शिवाजी विद्यालयाजवळील पेटी तातडीने बंद करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात वीज वितरणला निवेदन देण्यात आले. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे बिमोद मुधाने, डॉ.बी.के. पंडित, सोमेश्वर पंचबुद्धे, विजय दुधे, राजेंद्र दुधे, पंजाबराव गावंडे, अ‍ॅड.आर.एल. कठाणे, हेमांशू जाधव, योगेश राठोड, शंतनू देशकरी, मोहन गावंडे, गोपाल पवार यासह विद्यार्थी उपस्थित होते.