शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

उघडे रोहित्र ठरताहेत जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 21:56 IST

वीज वितरण कंपनीचे शहरातील अनेक रोहित्र उघड्या अवस्थेत आहे. या रोहित्राजवळून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने स्पर्श होवून एखाद्याचा जीव जाण्याचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देदारव्हा येथील समस्या : तक्रारींकडे वीज वितरणचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : वीज वितरण कंपनीचे शहरातील अनेक रोहित्र उघड्या अवस्थेत आहे. या रोहित्राजवळून मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने स्पर्श होवून एखाद्याचा जीव जाण्याचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, याबाबत सजग नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही वीज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे.शहरातील रोहित्रावरील उघड्या पेट्या बंद करणे, फ्युजला ग्रीप लावणे याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार नागरिकांनी निवेदन दिले. दारव्हा ते कारंजा रोडवरील श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ रोहीत्र आहे. ते उघड्या अवस्थेत असल्याने जीवघेणे ठरत आहे. विविध नगरातील रोहित्रावरील पेट्या उघड्या असून वाटसरूंना मृत्यूचे निमंत्रण देत आहे. श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयातील हजारो विद्यार्थी या रोहित्राजवळूनच ये-जा करतात. तसेच बँक आॅफ इंडिया, स्टेट बँकेकडे जाणारा मार्ग, तलाठी कार्यालय, पोस्ट आॅफिस आदी भागात रोहीत्र असून ते उघडे आहे. या रोहित्राजवळच प्रवासी थांबा असल्यामुळे तेथे नेहमी गर्दी असते. नजर चुकीने रोहित्राच्या पेटीतील तारांना स्पर्श झाल्यास मृत्यूची दाट शक्यता आहे.रोहित्राच्या पेट्या बंद करण्याची मागणी वारंवार करण्यात आली. शिवाजी विद्यालयाजवळील पेटी तातडीने बंद करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात वीज वितरणला निवेदन देण्यात आले. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे बिमोद मुधाने, डॉ.बी.के. पंडित, सोमेश्वर पंचबुद्धे, विजय दुधे, राजेंद्र दुधे, पंजाबराव गावंडे, अ‍ॅड.आर.एल. कठाणे, हेमांशू जाधव, योगेश राठोड, शंतनू देशकरी, मोहन गावंडे, गोपाल पवार यासह विद्यार्थी उपस्थित होते.