शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

माहूर गडावर रक्षाबंधनानिमित्त परिक्रमा यात्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:54 IST

येथील दत्तशिखर गडावरील प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेला (रक्षाबंधन) शनिवारपासून सुरूवात झाली. परिक्रमायात्रेसाठी तेलंगणा व विदर्भातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल झाले असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविदर्भ-मराठवाडा-तेलंगणातून हजारो भाविक दाखल : अतिरिक्त पोलीस तैनात, आगीच्या घटनेनंतर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

पुंडलिक पारटकर।लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : येथील दत्तशिखर गडावरील प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेला (रक्षाबंधन) शनिवारपासून सुरूवात झाली. परिक्रमायात्रेसाठी तेलंगणा व विदर्भातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल झाले असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी परिक्रमायात्रा आयोजित केली जाते. यासाठी राज्य व लगतच्या राज्यातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल होतात. या यात्रे दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांची महत्वाची भूमिका असते. यावर्षी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची शक्यता गृहित धरून २० आॅगस्टला येथील पंचायत समितीत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी यू.डी. मादाडे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. याबैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.परिक्रमायात्रेसाठी एसटीने ६५ अतिरिक्त बस उपलब्ध करून दिल्या. पोलिसांनी १० अधिकारी व ९७ कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपविली. ६५ बस माहूर बसस्थानक ते दत्त शिखरापर्यंत सेवा देणार आहे. परिक्रमायात्रा दत्तशिखर, कमंडलू तीर्थ, काळापाणी, अनुसयामाता मंदिराच्या पाठीमागून सयामाय टेकडी, मातृतीर्थ, पांडव लेणी, देवदेवेश्वरी, वनदेव, कैलास टेकडी, शेख फरीदबाबा दर्गा, सर्व तीर्थ या मार्गे ४० किलोमीटरची परिक्रमा करणार आहे. प्रशासन तत्पर असल्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सांगितले.धनोडा येथे वाहतूक ठप्पमहागाव/ धनोडा : परिक्रमा यात्रेसाठी हजारो यात्रेकरू माहूरकडे येत आहे. मात्र धनोडा येथून माहूरकडे जाणाऱ्या मार्गावरील पैनगंगेच्या पुलावरील कठडे तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. माहूरकडे जाणारी एकेरी वाहतूक शनिवारी दुपारी ३ वाजतापासून ठप्प पडली. त्यामुळे धनोडा टी पॉर्इंटवर यवतमाळ, पुसद, महागावकडे जाणाऱ्या मार्गावर जवळपास पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या दहा वर्षात प्रथमच परिक्रमा यात्रेसाठी अलोट गर्दी झाली आहे.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन