शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

माहूर गडावर रक्षाबंधनानिमित्त परिक्रमा यात्रेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:54 IST

येथील दत्तशिखर गडावरील प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेला (रक्षाबंधन) शनिवारपासून सुरूवात झाली. परिक्रमायात्रेसाठी तेलंगणा व विदर्भातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल झाले असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविदर्भ-मराठवाडा-तेलंगणातून हजारो भाविक दाखल : अतिरिक्त पोलीस तैनात, आगीच्या घटनेनंतर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

पुंडलिक पारटकर।लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : येथील दत्तशिखर गडावरील प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेला (रक्षाबंधन) शनिवारपासून सुरूवात झाली. परिक्रमायात्रेसाठी तेलंगणा व विदर्भातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल झाले असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी परिक्रमायात्रा आयोजित केली जाते. यासाठी राज्य व लगतच्या राज्यातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल होतात. या यात्रे दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांची महत्वाची भूमिका असते. यावर्षी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची शक्यता गृहित धरून २० आॅगस्टला येथील पंचायत समितीत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी यू.डी. मादाडे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. याबैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.परिक्रमायात्रेसाठी एसटीने ६५ अतिरिक्त बस उपलब्ध करून दिल्या. पोलिसांनी १० अधिकारी व ९७ कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपविली. ६५ बस माहूर बसस्थानक ते दत्त शिखरापर्यंत सेवा देणार आहे. परिक्रमायात्रा दत्तशिखर, कमंडलू तीर्थ, काळापाणी, अनुसयामाता मंदिराच्या पाठीमागून सयामाय टेकडी, मातृतीर्थ, पांडव लेणी, देवदेवेश्वरी, वनदेव, कैलास टेकडी, शेख फरीदबाबा दर्गा, सर्व तीर्थ या मार्गे ४० किलोमीटरची परिक्रमा करणार आहे. प्रशासन तत्पर असल्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सांगितले.धनोडा येथे वाहतूक ठप्पमहागाव/ धनोडा : परिक्रमा यात्रेसाठी हजारो यात्रेकरू माहूरकडे येत आहे. मात्र धनोडा येथून माहूरकडे जाणाऱ्या मार्गावरील पैनगंगेच्या पुलावरील कठडे तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. माहूरकडे जाणारी एकेरी वाहतूक शनिवारी दुपारी ३ वाजतापासून ठप्प पडली. त्यामुळे धनोडा टी पॉर्इंटवर यवतमाळ, पुसद, महागावकडे जाणाऱ्या मार्गावर जवळपास पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या दहा वर्षात प्रथमच परिक्रमा यात्रेसाठी अलोट गर्दी झाली आहे.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन