शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

महात्मा फुले-आंबेडकर स्मृती पर्वाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:47 IST

महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाला मंगळवारपासून येथील आझाद मैदानात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अ‍ॅड. अशोक बसोत्रा यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर उहापोह केला.

ठळक मुद्देअशोक बसोत्रा यांचे मार्गदर्शन : ओबीसी हक्क आणि अधिकारापासून दूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाला मंगळवारपासून येथील आझाद मैदानात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अ‍ॅड. अशोक बसोत्रा यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर उहापोह केला.‘भारतीय संविधान व सामाजिक वास्तव आणि फुले-आंबेडकरी विचारधारा’ या विषयावर अ‍ॅड. बसोत्रा यांनी विचार मांडले. ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. मंडल आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे लागू व्हाव्या, शिष्यवृत्ती, पदोन्नती तसेच संसदेत ओबीसींना संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले. भारतात समतामुलक समाजाची निर्मिती होणे काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी आपला हक्क व अधिकाराची लढाई आपल्याला स्वत: लढावी लागेल. ज्यांनी आपल्या वाट्याला समस्या निर्माण केल्या, तेच लोक आपली समस्या सोडवितील या भ्रमात ओबीसींनी राहू नये, असे ते म्हणाले.भारतीय संविधानात बाबासाहेबांनी ओबीसींसाठी अनेक तरतुदी करून ठेवलेल्या आहे. मात्र आतापर्यंतचे कुठलेही सरकार ओबीसींच्या हिताचे निर्णय घेऊ शकलेले नाही. ओबीसीच्या मतांच्या भरवशावर सरकार बनले. मात्र त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळू दिले नाही. परिणामी आज ओबीसींची अवस्था दयनीय झाली आहे. हे वेळीच बदलले नाही तर परिस्थिती यापेक्षाही गंभीर स्वरूप धारण केल्याशिवाय राहणार नाही, असे अ‍ॅड. अशोक बसोत्रा यावेळी म्हणाले.यावेळी अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर गोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश पिसे, शासकीय मुद्रण व प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. दिलीप घावडे, राजेश देवके, लक्ष्मीकांत लोळगे, सुनीता काळे, माया गोबरे आदी उपस्थित होते. प्रारंभी सायली तिखे, शीतल फसाटे, नितीन वाघ, उषा खटे, गोपाल धोबे, सार्थक तिखे, प्रशांत उमरतकर, मीनाक्षी काळे, स्नेहल मदनकर, सायली वाघ आदींनी महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित गीते सादर केली. यशस्वीतेसाठी अशोक तिखे, डॉ. विजय कावलकर, प्रा. सविता हजारे, कल्पना मादेश्वर, कमल खंडारे, नीता दरणे, माधुरी फेंडर, काशीनाथ लाहोरे, संजय ढाकुलकर, दीपक वाघ, प्रफुल्ल खेडकर, दत्ता चांदुरे, रवींद्र घावडे, गंगाधर खंडारे, चंद्रशेखर तिखे आदींनी पुढाकार घेतला, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख संजय बोरकर यांनी दिली.