शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले-आंबेडकर स्मृती पर्वाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:47 IST

महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाला मंगळवारपासून येथील आझाद मैदानात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अ‍ॅड. अशोक बसोत्रा यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर उहापोह केला.

ठळक मुद्देअशोक बसोत्रा यांचे मार्गदर्शन : ओबीसी हक्क आणि अधिकारापासून दूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वाला मंगळवारपासून येथील आझाद मैदानात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते अ‍ॅड. अशोक बसोत्रा यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर उहापोह केला.‘भारतीय संविधान व सामाजिक वास्तव आणि फुले-आंबेडकरी विचारधारा’ या विषयावर अ‍ॅड. बसोत्रा यांनी विचार मांडले. ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. मंडल आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे लागू व्हाव्या, शिष्यवृत्ती, पदोन्नती तसेच संसदेत ओबीसींना संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले. भारतात समतामुलक समाजाची निर्मिती होणे काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी आपला हक्क व अधिकाराची लढाई आपल्याला स्वत: लढावी लागेल. ज्यांनी आपल्या वाट्याला समस्या निर्माण केल्या, तेच लोक आपली समस्या सोडवितील या भ्रमात ओबीसींनी राहू नये, असे ते म्हणाले.भारतीय संविधानात बाबासाहेबांनी ओबीसींसाठी अनेक तरतुदी करून ठेवलेल्या आहे. मात्र आतापर्यंतचे कुठलेही सरकार ओबीसींच्या हिताचे निर्णय घेऊ शकलेले नाही. ओबीसीच्या मतांच्या भरवशावर सरकार बनले. मात्र त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळू दिले नाही. परिणामी आज ओबीसींची अवस्था दयनीय झाली आहे. हे वेळीच बदलले नाही तर परिस्थिती यापेक्षाही गंभीर स्वरूप धारण केल्याशिवाय राहणार नाही, असे अ‍ॅड. अशोक बसोत्रा यावेळी म्हणाले.यावेळी अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर गोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रमेश पिसे, शासकीय मुद्रण व प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. दिलीप घावडे, राजेश देवके, लक्ष्मीकांत लोळगे, सुनीता काळे, माया गोबरे आदी उपस्थित होते. प्रारंभी सायली तिखे, शीतल फसाटे, नितीन वाघ, उषा खटे, गोपाल धोबे, सार्थक तिखे, प्रशांत उमरतकर, मीनाक्षी काळे, स्नेहल मदनकर, सायली वाघ आदींनी महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित गीते सादर केली. यशस्वीतेसाठी अशोक तिखे, डॉ. विजय कावलकर, प्रा. सविता हजारे, कल्पना मादेश्वर, कमल खंडारे, नीता दरणे, माधुरी फेंडर, काशीनाथ लाहोरे, संजय ढाकुलकर, दीपक वाघ, प्रफुल्ल खेडकर, दत्ता चांदुरे, रवींद्र घावडे, गंगाधर खंडारे, चंद्रशेखर तिखे आदींनी पुढाकार घेतला, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख संजय बोरकर यांनी दिली.