शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
3
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
4
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
5
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
7
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
8
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
9
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
11
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
12
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
13
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
14
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
15
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
16
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
17
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
18
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
19
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
20
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

बीट अंमलदारच राखू शकतो सुव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

प्रत्येकाने आपल्या बीटमधील बारीकसारिक घडामोडींवर लक्ष केंद्रीत करुन प्रतिबंध करावा असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले. सोमवारी पोलीस मुख्यालयात यवतमाळ उपविभागातील तपासी अंमलदारांचा दरबार घेतला, त्यावेळी बोलत होते.

ठळक मुद्देजिल्हा पोलीस अधीक्षक : मुख्यालयातील दरबारात दिल्या टिप्स्

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलीस ठाण्याचा कारभार हा बीट अंमलदारच यशस्वीपणे सांभाळतो. कायदा व सुव्यवस्थेची बुज राखण्याची खरी जबाबदारी बीट अंमलदारावर आहे. प्रत्येकाने आपल्या बीटमधील बारीकसारिक घडामोडींवर लक्ष केंद्रीत करुन प्रतिबंध करावा असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले. सोमवारी पोलीस मुख्यालयात यवतमाळ उपविभागातील तपासी अंमलदारांचा दरबार घेतला, त्यावेळी बोलत होते.जमादार आपल्या बीटमध्ये कशा पद्धतीने काम करतो यावरच होणाऱ्या गुन्ह्यांचे स्वरूप अवलंबून असते. पोलीस ठाण्यांचा खरा कारभार तपासी अंमलदार व बीट जमादार यांच्याकडून चालविला जातो. त्यांच्यापुढे असणाºया अडचणी जाणून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी दरबार घेतला. यावेळी प्रत्येक बीट अंमलदाराला तुम्ही तुमच्या बीटमध्ये चांगली कामगिरी करा तेथे बाहेरच्या पथकाला हस्तक्षेप करण्यासाठी वाव ठेऊ नका, कुणाच्या दबावात अवैध धंदे सुरू असले तरी त्याचे उत्तर बीट अंमलदाराला द्यावे लागेल. त्यामुळे यापुढे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून काम करा, अवैध धंदे, गुन्हेगार यांच्याशी हितसंबंध जोपासू नका, प्रलंबित गुन्हे तत्काळ निकाली काढा जेणे करून बीटमधील घडामोडींवर लक्ष ठेवता येईल, असेही सांगितले.यावेळी अनेक अंमलदाराने आपल्या अडचणी मांडल्या. ठाण्यात मुद्देमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याचे सांगितले. शासकीय निवासस्थानाची अवस्था बिकट आहे. त्या बाबतच्या अडचणी मांडल्या. पोलीस ठाण्याच्या जागेबाबतही पाठपुरावा करून त्या जागा कागदोपत्री नावावर करून घेण्याचे निर्देशही पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले. तीन तास चाललेल्या दरबारात पहिल्यांदा बीट जमादाराला वरिष्ठ अधिकाºयाकडून पाठबळ मिळाल्याची भावना व्यक्त झाली. यवतमाळचा दरबार संपल्यानंतर पोलीस अधीक्षक दारव्हा उपविभागातील दरबार घेण्यासाठी रवाना झाले. यापूर्वी पांढरकवडा, वणीतही त्यांनी दरबार घेऊन अशाच सूचना दिल्या होत्या.कुणाच्या दबावात येऊन नोकरी धोक्यात घालू नकाकुठल्याही प्रकारची तक्रार, एसीबी पथकाची कारवाई झालेल्या कर्मचारी-अधिकाºयाला खात्यात यापुढे ठेवले जाणार नाही. पुसद सारखे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीचे आपले कर्तव्य बजवावे, कुणाचा दबाव स्वीकारून स्वत:ची नोकरी धोक्यात घालू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या.