शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सावधान, जिल्ह्याची भूजल पातळी दरवर्षी घसरतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:52 IST

जिल्ह्याचे पर्जन्यमान मुबलक असले तरी यामध्ये सातत्य नाही. पावसात खंड पडत आहे. भूजलाच्या स्त्रोतावरही परिणाम झाला आहे. यामुळे जिल्ह्याचा भूजलस्त्रोत दिवसेन्दिवस घटत आहे. याबाबत भूवैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपर्जन्यमानातही घट । पाणी उपशाचे प्रमाण वाढले, पावसाचे पाणी न मुरताच वाहून जाते

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे पर्जन्यमान मुबलक असले तरी यामध्ये सातत्य नाही. पावसात खंड पडत आहे. भूजलाच्या स्त्रोतावरही परिणाम झाला आहे. यामुळे जिल्ह्याचा भूजलस्त्रोत दिवसेन्दिवस घटत आहे. याबाबत भूवैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. भूजल पुनर्भरणावर भर देण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.गेल्या पाच वर्षात पर्जन्यमानात सतत घट नोंदविण्यात आली आहे. पर्जन्यमानाअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९११.३४ मिलीमिटर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बरसलेला पाऊस साठवून ठेवला जात नाही, तो वाहून जातो. जलाशयांमध्ये नाममात्र संचय होतो. यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती आणि उन्हाळ्यात टंचाई अशा स्थितीचा सामना जिल्ह्याला करावा लागतो.२०१३ मध्ये जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १५० टक्के पाऊस झाला. २०१४ मध्ये ७८ टक्के पाऊस पडला. २०१५ मध्ये ७७ टक्के, २०१६ मध्ये ९९ टक्के, २०१७ मध्ये ६१ टक्के, तर २०१८ मध्ये ७८ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. एकूण पर्जन्यमानावर लक्ष केंद्रित केले तर पावसामध्ये सातत्य राहिले नाही. ७० ते १५० टक्के पाऊस जिल्ह्यात पडला.इतकेच नव्हेतर पावसाच्या दिवसात २५ दिवसापर्यंतचा खंडही पडलेला आहे. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. भूजलावरही मोठा परिणाम झाला. दरवर्षी भूजलाची पातळी एक मिटरमध्ये कमी-अधिक होत आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेने याची हवी तेवढ्या गांभीर्याने दखल घेतलेली दिसून येत नाही.बेसॉल्ट आणि सायन्स स्टोन्सचा थर१५ तालुके बेसॉल्ट खडकापासून बनले आहे. वणी तालुका सायन्स म्हणजे खरपा दगडाच्या थरापासून बनला आहे. बेसाल्ट अधिक पाणी साठवून ठेवत नाही. तर सायन्स स्टोन पाणी साठवतो. तरी कोल माईन्समुळे पाण्याचा उपसा वाढला आणि भूजल खाली गेले आहे. इतर १५ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसाही वाढत आहे. मात्र जिल्ह्यातील १६ तालुक्यांचा भूस्तर लक्षात घेऊन पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई