शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

सावधान, जिल्ह्याची भूजल पातळी दरवर्षी घसरतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:52 IST

जिल्ह्याचे पर्जन्यमान मुबलक असले तरी यामध्ये सातत्य नाही. पावसात खंड पडत आहे. भूजलाच्या स्त्रोतावरही परिणाम झाला आहे. यामुळे जिल्ह्याचा भूजलस्त्रोत दिवसेन्दिवस घटत आहे. याबाबत भूवैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपर्जन्यमानातही घट । पाणी उपशाचे प्रमाण वाढले, पावसाचे पाणी न मुरताच वाहून जाते

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे पर्जन्यमान मुबलक असले तरी यामध्ये सातत्य नाही. पावसात खंड पडत आहे. भूजलाच्या स्त्रोतावरही परिणाम झाला आहे. यामुळे जिल्ह्याचा भूजलस्त्रोत दिवसेन्दिवस घटत आहे. याबाबत भूवैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. भूजल पुनर्भरणावर भर देण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.गेल्या पाच वर्षात पर्जन्यमानात सतत घट नोंदविण्यात आली आहे. पर्जन्यमानाअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९११.३४ मिलीमिटर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बरसलेला पाऊस साठवून ठेवला जात नाही, तो वाहून जातो. जलाशयांमध्ये नाममात्र संचय होतो. यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती आणि उन्हाळ्यात टंचाई अशा स्थितीचा सामना जिल्ह्याला करावा लागतो.२०१३ मध्ये जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १५० टक्के पाऊस झाला. २०१४ मध्ये ७८ टक्के पाऊस पडला. २०१५ मध्ये ७७ टक्के, २०१६ मध्ये ९९ टक्के, २०१७ मध्ये ६१ टक्के, तर २०१८ मध्ये ७८ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. एकूण पर्जन्यमानावर लक्ष केंद्रित केले तर पावसामध्ये सातत्य राहिले नाही. ७० ते १५० टक्के पाऊस जिल्ह्यात पडला.इतकेच नव्हेतर पावसाच्या दिवसात २५ दिवसापर्यंतचा खंडही पडलेला आहे. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. भूजलावरही मोठा परिणाम झाला. दरवर्षी भूजलाची पातळी एक मिटरमध्ये कमी-अधिक होत आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेने याची हवी तेवढ्या गांभीर्याने दखल घेतलेली दिसून येत नाही.बेसॉल्ट आणि सायन्स स्टोन्सचा थर१५ तालुके बेसॉल्ट खडकापासून बनले आहे. वणी तालुका सायन्स म्हणजे खरपा दगडाच्या थरापासून बनला आहे. बेसाल्ट अधिक पाणी साठवून ठेवत नाही. तर सायन्स स्टोन पाणी साठवतो. तरी कोल माईन्समुळे पाण्याचा उपसा वाढला आणि भूजल खाली गेले आहे. इतर १५ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसाही वाढत आहे. मात्र जिल्ह्यातील १६ तालुक्यांचा भूस्तर लक्षात घेऊन पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई