शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, जिल्ह्याची भूजल पातळी दरवर्षी घसरतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:52 IST

जिल्ह्याचे पर्जन्यमान मुबलक असले तरी यामध्ये सातत्य नाही. पावसात खंड पडत आहे. भूजलाच्या स्त्रोतावरही परिणाम झाला आहे. यामुळे जिल्ह्याचा भूजलस्त्रोत दिवसेन्दिवस घटत आहे. याबाबत भूवैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपर्जन्यमानातही घट । पाणी उपशाचे प्रमाण वाढले, पावसाचे पाणी न मुरताच वाहून जाते

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे पर्जन्यमान मुबलक असले तरी यामध्ये सातत्य नाही. पावसात खंड पडत आहे. भूजलाच्या स्त्रोतावरही परिणाम झाला आहे. यामुळे जिल्ह्याचा भूजलस्त्रोत दिवसेन्दिवस घटत आहे. याबाबत भूवैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. भूजल पुनर्भरणावर भर देण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.गेल्या पाच वर्षात पर्जन्यमानात सतत घट नोंदविण्यात आली आहे. पर्जन्यमानाअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९११.३४ मिलीमिटर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बरसलेला पाऊस साठवून ठेवला जात नाही, तो वाहून जातो. जलाशयांमध्ये नाममात्र संचय होतो. यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती आणि उन्हाळ्यात टंचाई अशा स्थितीचा सामना जिल्ह्याला करावा लागतो.२०१३ मध्ये जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १५० टक्के पाऊस झाला. २०१४ मध्ये ७८ टक्के पाऊस पडला. २०१५ मध्ये ७७ टक्के, २०१६ मध्ये ९९ टक्के, २०१७ मध्ये ६१ टक्के, तर २०१८ मध्ये ७८ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. एकूण पर्जन्यमानावर लक्ष केंद्रित केले तर पावसामध्ये सातत्य राहिले नाही. ७० ते १५० टक्के पाऊस जिल्ह्यात पडला.इतकेच नव्हेतर पावसाच्या दिवसात २५ दिवसापर्यंतचा खंडही पडलेला आहे. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. भूजलावरही मोठा परिणाम झाला. दरवर्षी भूजलाची पातळी एक मिटरमध्ये कमी-अधिक होत आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेने याची हवी तेवढ्या गांभीर्याने दखल घेतलेली दिसून येत नाही.बेसॉल्ट आणि सायन्स स्टोन्सचा थर१५ तालुके बेसॉल्ट खडकापासून बनले आहे. वणी तालुका सायन्स म्हणजे खरपा दगडाच्या थरापासून बनला आहे. बेसाल्ट अधिक पाणी साठवून ठेवत नाही. तर सायन्स स्टोन पाणी साठवतो. तरी कोल माईन्समुळे पाण्याचा उपसा वाढला आणि भूजल खाली गेले आहे. इतर १५ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसाही वाढत आहे. मात्र जिल्ह्यातील १६ तालुक्यांचा भूस्तर लक्षात घेऊन पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाई