शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
4
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
5
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
6
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
7
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
8
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
9
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
10
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
11
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
12
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
13
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
14
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
15
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
16
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
17
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
18
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
19
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
20
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज मर्यादेसाठी बँकांना स्वातंत्र्य

By admin | Updated: April 17, 2016 02:20 IST

चांगले व नियमित व्यवहार असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून यावर्षीपासून बँकर्स कमिटीने जिल्ह्यातील बँकांना पीक कर्ज वाटपाच्या मर्यादेत स्वातंत्र्य दिले आहे.

बँकर्स कमिटी : कापूस हेक्टरी ३३ ते ४४ हजार, सोयाबीन २६ ते ३२ हजार ंयवतमाळ : चांगले व नियमित व्यवहार असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून यावर्षीपासून बँकर्स कमिटीने जिल्ह्यातील बँकांना पीक कर्ज वाटपाच्या मर्यादेत स्वातंत्र्य दिले आहे. त्याची पीकनिहाय किमान व कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. बँकर्स कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना होणारे पीक, मध्यम, दीर्घमुदती कर्ज वाटप, वसुली, त्यातील अडचणी, थकबाकीदार, जप्ती, कारवाई अशा विविध मुद्यांवर सखोल चर्चा झाली. गतवर्षीपर्यंत प्रत्येक पिकाची कर्ज वाटपाची मर्यादा निश्चित केली जात होती. ती सर्व बँकांना लागू राहत होती. त्यात अनेक बँकांना नियमित व्यवहार असलेल्या चांगल्या शेतकऱ्यांना अधिक कर्ज देण्याची इच्छा असूनही मर्यादेमुळे ते देता येत नव्हते. ही बाब बँकर्स कमिटीच्या बैठकीत राष्ट्रीयकृत बँकांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे त्यात फेरबदल करण्यात आले. आता कापसाला प्रती हेक्टरी किमान ३३ हजार आणि कमाल ४४ हजार पीक कर्ज दिले जाणार आहे. सोयाबीनला ही मर्यादा २६ हजार ३२ हजार अशी करण्यात आली. यापूर्वी कापसाला सरसकट ३२ हजार एवढी कमाल मर्यादा होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपली प्रती हेक्टरी कर्ज वाटपाची मर्यादा ३२ हजार एवढी ठेवली आहे. राष्ट्रीयकृत बँका मात्र कापसाला ४४ हजार आणि सोयाबीनला हेक्टर ३२ हजारापर्यंत कर्ज वाटप करू शकणार आहे. यात आता अर्थचक्र सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा बँकेचे टार्गेट घटविलेशेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आधार ठरलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे यावर्षी खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकर्स कमिटीने काही प्रमाणात घटविले आहे. गेल्या वर्षी ६६४ कोटींचे उद्दिष्ट होते. यावर्षी ते ४५० कोटी ठेवण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र ३७५ कोटीपर्यंत कर्ज वाटप होण्याची शक्यता आहे. कारण बँकेची गेल्या वर्षीच्या कर्जाची वसुली ३०० कोटींवरच पोहोचली आहे. दुष्काळी परिस्थितीत वसुलीचा हा आकडा चांगला असला तरी कर्ज वाटताना जिल्हा बँकेला अखेरच्या महिन्यात पैशाची चणचण भासू शकते. जिल्हा बँक पीक कर्ज वाटपासाठी दरवर्षी राज्य बँकेकडे सव्वातीनशे कोटींच्या कर्जाची मागणी नोंदविते. त्यातील २३० कोटींपर्यंतच कर्ज राज्य बँक मंजूर करते. नवे कर्ज वाटप सुरू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०१६-१७ च्या खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप १ एप्रिलपासून सुरू केले आहे. आतापर्यंत चार कोटी रुपयांच्या कर्जाची उचल शेतकऱ्यांनी केली आहे. कुणी प्रत्यक्ष शेती कामासाठी तर बहुतांश शेतकऱ्यांनी यापूर्वी इतरांकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी जिल्हा बँकेकडून कर्ज उचलल्याचे मानले जाते. राष्ट्रीयकृत बँकांना ८०० कोटींचे उद्दिष्टजिल्ह्यात सर्व राष्ट्रीयकृत बँकांमिळून यंदाच्या हंगामासाठी ८०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकर्स कमिटीने निश्चित करून दिले आहे. गतवर्षी राष्ट्रीयकृत बँकांना ४५० कोटींचे उद्दिष्ट होते. बँकर्स कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतरही राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे हे उद्दिष्ट गतवर्षी ६० टक्क्यापर्यंतच गाठले होते. मात्र कर्ज वाटपातील अडचणी समजून घेत अध्यक्षांनी आपली आक्रमक भूमिका आता काही प्रमाणात मवाळ केल्याचे सांगितले जाते. थकबाकीमुळे शेतकरी नव्या कर्जास पात्र न होणे हेसुद्धा राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्ज वाटपाचे टार्गेट पूर्ण न होण्यामागील एक प्रमुख कारण सांगितले जाते. यावर्षी राष्ट्रीयकृत बँकांचे टार्गेट ४५० कोटींवरून थेट ८०० कोटींवर पोहोचविण्यात आले आहे.