शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बँका, एटीएममध्ये कृत्रिम चलन तुटवडा, ग्राहकांची कुचंबणा

By admin | Updated: May 19, 2017 01:46 IST

नागरिकांनी कॅशलेस व्हावे, रोखीने व्यवहार करू नये म्हणून केंद्र सरकारने नोटाबंदी केली.

कॅशलेस व्यवहारांसाठी असाही फंडा : ग्राहक म्हणतात, मोदीजी १५ लाख नकोच, किमान आमचे बँक खात्यातील हक्काचे पैसे तरी आम्हाला द्या लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : नागरिकांनी कॅशलेस व्हावे, रोखीने व्यवहार करू नये म्हणून केंद्र सरकारने नोटाबंदी केली. मात्र त्यानंतरही नागरिकांचा कॅशलेसकडे कल वाढत नसल्याचे पाहून चक्क कृत्रिम चलन तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना बँका, एटीएममधून पैसे मिळेनासे झाले असून जनतेची दाणादाण उडाली आहे. नोटाबंदीच्या काळात नागरिकांनी रोकड मिळविण्यासाठी जणू युद्धजन्य परिस्थितीचा सामना केला. त्यापेक्षाही गंभीर स्थिती सध्या बँका व एटीएममध्ये पहायला मिळत आहे. जिल्हा मुख्यालयी असलेल्या बँकांच्या मुख्य शाखेतसुद्धा ग्राहकाला पूर्णपैसे दिले जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. यावरून ग्रामीण भागात काय अवस्था असेल याची कल्पना येते. एटीएमवरील अवस्था तर आणखीनच बिकट आहे. यवतमाळ सारख्या शहरी भागातील एखाद दोन एटीएममध्ये पैसे असतात. तेथेही मोठ्या रांगा लागत असल्याने काही वेळातच पैसे संपतात. त्यामुळे नागरिकांचे व्यवहार कोलमडले आहे. ऐन पगाराच्या दिवसात १ ते १५ तारखेपर्यंत एटीएम रिकामे राहतात. त्यामुळे व्यवहार कसे करावे, असा प्रश्न निर्माण होतो. आॅनलाईन व्यवहारावर जोर असला तरी सामान्य नागरिकांना ते अद्यापही सुरक्षित वाटत नाही. शिवाय ते सुरक्षित असल्याचे सांगण्याची, त्याबाबत जनजागृती करण्याची तसदी बँका घेत नाही. बँका व एटीएममध्ये सरकारच्या सूचनेवरूनच रिझर्व्ह बँकेने कृत्रिम टंचाई निर्माण केल्याची माहिती बँकींग क्षेत्रातून पुढे आली आहे. जाणीवपूर्वक बँका व एटीएमला कमी चलन पुरवठा केला जात आहे. नागरिकांनी कॅशलेस व्हावे, आॅनलाईन व्यवहार करावे, यासाठी ही शक्कल लढविण्यात आली आहे. मात्र ही शक्कल मोदी सरकार आणि भाजपाच्या अंगलट येण्याची चिन्हे आहे, कारण या प्रकारामुळे जनतेत मोदी सरकार व भारतीय जनता पक्षाविरोधात तीव्र असंतोष निर्माण होत आहे. एटीएममधून रिकाम्या हाताने बाहेर निघणारा प्रत्येक ग्राहक ‘मोदीला आणखी निवडून देणारच का ?’ असा सवाल विचारुन २०१९ मधील फेरबदलाचे संकेत देतो आहे. मोदींच्या घोषणेचा फसवणुकीसाठी वापर काळा पैसा भारतात आणल्यानंतर नागरिकांच्या जनधन खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखविले होते. मात्र त्यांच्या या स्वप्न वजा घोषणेचा वापर चक्क नागरिकांच्या आॅनलाईन फसवणुकीसाठी केला जात आहे. याचा प्रत्यय गेल्याच आठवड्यात येथील नागपूर रोड स्थित अलहबीबनगरातील नागरिकाला आला. तुमच्या खात्यात १५ लाख जमा करायचे आहे, असे सांगून त्याचा एटीएम कार्ड नंबर व पासवर्ड मागण्यात आला. त्याने नंतर शेजाऱ्याचा एटीएम नंबर दिल्याने त्यातील ८२ हजार रुपये क्षणात वळते केले गेले. याच कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये मारहाण होऊन प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. चेक कुणी घेईना ! सरकार कॅशलेसवर जोर देत असले तरी बाजारात कुणीही नवख्या ग्राहकाचा चेक स्वीकारत नाही. हा चेक स्वीकारण्यासाठी व्यापारी कुणी तरी मध्यस्थ मागतात. एवढेच नव्हे तर लहान बँका-पतसंस्थासुद्धा इलेक्ट्रीक बिल भरणाऱ्या ग्राहकांकडून चेक स्वीकारत नाही. चेक देऊ पाहणाऱ्या ग्राहकाला पाच टक्के वॅटची भीती दाखविली जाते.