शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

वगाराचे बांबू बन चोरट्यांच्या हवाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:10 IST

घाटंजी तालुक्याच्या वगारा(टाकळी) येथील बांबूचे बन चोरट्यांच्या हवाली गेल्याचे चित्र आहे. बांबूची प्रचंड प्रमाणात कापणी होत असल्याने हे बन विरळ होत चालले आहे.

ठळक मुद्दे‘एफडीसीएम’चे दुर्लक्ष : लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी

अब्दुल मतीन ।लोकमत न्यूज नेटवर्कपारवा : घाटंजी तालुक्याच्या वगारा(टाकळी) येथील बांबूचे बन चोरट्यांच्या हवाली गेल्याचे चित्र आहे. बांबूची प्रचंड प्रमाणात कापणी होत असल्याने हे बन विरळ होत चालले आहे. वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) मात्र या बाबीकडे दुर्लक्ष सुरू आहे. चोरीच्या बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंची एसटी बसद्वारे सर्रास वाहतूक सुरू आहे. शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतानाही कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पहाटे ५ वाजल्यापासूनच बांबू चोरण्यासाठी चोरटे हजेरी लावतात. सूपं, टोपल्या, डाले, तट्टे तयार करण्यासाठी बांबू तोडून नेले जाते. या बनाची राखण करण्यासाठी चौकीदाराची नियुक्ती करण्यात आली. शिवाय वनरक्षकही आहे. यानंतरही बांबूचे बन सुरक्षित ठेवले जात नाही. बनातून तोडलेल्या बांबूपासून बनविलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी लगतच्या आर्णी, किनवट, घाटंजी आदी भागातील खरेदीदार दाखल होतात. बांबूची किंमत मोजावी लागत नसल्याने या वस्तू परिसरातील कारागिरांकडून त्यांना कमी किमतीत उपलब्ध होतात. खरेदी केलेल्या वस्तूंची वाहतूक एसटी बसवरून केली जाते. एसटी कर्मचाºयांकडूनही मात्र या वस्तू कुठल्याही अडचणीशिवाय वाहून नेल्या जातात. या बनातील बांबूचा हर्रास पाच-सहा वर्षांपूर्वी झाला होता. यानंतर याकडे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे.