शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

यवतमाळची लेक सांभाळतेय बालग्राम, 120 मुलांची बनलीय माऊली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 14:36 IST

गेवराई येथे संतोष गर्जे यांनी सन 2006 मध्ये सहारा अनाथालय बालग्रामची स्थापना केली.

उदय पुंडे

(यवतमाळ):ढाणकी - समाजामध्ये आपण अनेक लोक पाहतो जे कोणत्याही ध्येयाविना किडा मुंगीसारखे आपले आयुष्य जगत असतात.  मात्र, काही असेही लोक असतात कि लोकांच्या सेवेसाठी आपल्या जीवनातील सर्व गोष्टींचा त्याग करतात. असेच एक उदाहरणं म्हणजे  यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील ढानकी गावाची लेक प्रीती दादाराव थुल. त्या पेशाने वकील आहेत. प्रीती ताई यांचा विवाह बीड जिल्हातील गेवराई येथील संतोष गर्जे यांच्यासोबत झाला.  लग्नानंतर सुखी संसाराचे स्वप्न अनेक मुली पाहत असतात. मात्र, प्रीती यांना आपल्या पुढील आयुष्याची कल्पना होती, कारण त्यांनी हा मार्ग स्वतः निवडला होता. आपल्या बहिणीच्या मृत्युनंतर तिच्या मुलीला सांभाळून तिच्यासोबत इतर अनाथ उपेक्षित मुलांना संभाळणाऱ्या संतोषसोबत त्यांची गाठ बांधली गेली होती. 

गेवराई येथे संतोष गर्जे यांनी सन 2006 मध्ये सहारा अनाथालय बालग्रामची स्थापना केली. गेवराई शहरापासून 3 किमी अंतरावर खंडोबाच्या माळा निसर्ग रम्य ठिकाणी हा अनाथआश्रम स्थापन केला आहे. लहान मुलांसाठी वेगळी, मोठ्या मुला मुलींसाठी वेगळी अशी त्यांना राहण्याची व्यवस्था आहे. 3 एकरच्या क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पातच भाजीपालासारखे उत्पन्न घेतले जाते. त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचासुद्धा आहे. बालग्रामचा परिसर अतिशय स्वच्छ व नीटनेटका असून तेथील मुलांना प्रीतीताई व संतोष गर्जे स्वतः आपल्या मुलांप्रमाणे जपतात. त्यांच्यावर संस्कार करतात. तेथील कोणत्याही मुलाच्या चेहऱ्यावर अनाथपणाचे भाव दिसत नाहीत. माझे संतोष बाबा आणि प्रीती आई अश्याच नावाने ते त्यांना हाक मारतात. इतके दिवस पत्राच्या शेडमध्ये असणाऱ्या आश्रम 23 फेब्रुवारीला नुकत्याच बांधलेल्या प्रशस्त अशा इमारतीत हलवला आहे. अतिशय चांगली अशी मुलांना जेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था प्रीती ताई व संतोष यांनी केली आहे. 

टॅग्स :YavatmalयवतमाळBeedबीड