शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

मागासक्षेत्र विकास निधीच नाही

By admin | Updated: June 15, 2014 23:48 IST

ग्रामीण आणि शहर भागातील अर्धवट असलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी मागासक्षेत्र विकास योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या वर्षीपासून या योजनेत निधी नसल्याने अनेक कामे रखडली आहे.

यवतमाळ : ग्रामीण आणि शहर भागातील अर्धवट असलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी मागासक्षेत्र विकास योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या वर्षीपासून या योजनेत निधी नसल्याने अनेक कामे रखडली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात प्रस्तावित ३४ कोटीपैकी २० कोटी मिळाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे १४ कोटी आलेच नाही.ग्रामीण विकसात मागस निधीमुळे मोठ भर पडली होती. या योजनेत गावातील कामाचा प्राधान्यक्रम ठरविण्याचा अधिकार प्रथम ग्रामपंचायतींना देण्यात आला होता. गावाची समस्या लक्षात घेऊन ग्रामसभेत कामाची निवड केली जात होती. यामध्ये संरक्षक भिंत, अंगणवाडी इमारत, किचन शेड, सार्वजनिक शौचालय, ग्रामपंचायत भवन, स्मशान रोड, नळ योजनाची पाईप लाईन, सिमेंट रोड, डांबरीकरण, भुमिगत गटारे यासह अनेक कामांची निवड करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ग्रामीण आणि शहरी भागातील एक हजार १६६ कामे प्रस्तावित करण्यात आली. यासाठी ३४ कोटींचा रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. यातील पहिल्या टप्प्याचे २० कोटी रुपये प्राप्त झाले. त्यातून ७८९ कामे पूर्ण झाली आहे. यामध्ये सिमेंट रस्ते आणि डांबरीकरणाची कामे अधिक होती. चालू आर्थिक वर्षात ग्रामपंचायती आणि नगरपरिषदांनी ५३ कोटी ६८ लाख ८९ हजारांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये ६ कोटी ८६ लाख ५० हजार रुपयांची कामे आहेत. यातून एकूण एक हजार २९१ कामे करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव ग्रामीण विकास यंत्रणेने हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीपुढे ठेवला आहे. मात्र नियोज समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे या प्रस्तावाला अजूनपर्यंत मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर हा प्रस्ताव राज्यशासनाकडून केंद्राकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर निधी येणार आहे. आता ही प्रक्रियाच ठप्प झाल्याने ग्रामीण कामांना खीळ बसणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)