शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

मागासक्षेत्र विकास निधीच नाही

By admin | Updated: June 15, 2014 23:48 IST

ग्रामीण आणि शहर भागातील अर्धवट असलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी मागासक्षेत्र विकास योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या वर्षीपासून या योजनेत निधी नसल्याने अनेक कामे रखडली आहे.

यवतमाळ : ग्रामीण आणि शहर भागातील अर्धवट असलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी मागासक्षेत्र विकास योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या वर्षीपासून या योजनेत निधी नसल्याने अनेक कामे रखडली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात प्रस्तावित ३४ कोटीपैकी २० कोटी मिळाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे १४ कोटी आलेच नाही.ग्रामीण विकसात मागस निधीमुळे मोठ भर पडली होती. या योजनेत गावातील कामाचा प्राधान्यक्रम ठरविण्याचा अधिकार प्रथम ग्रामपंचायतींना देण्यात आला होता. गावाची समस्या लक्षात घेऊन ग्रामसभेत कामाची निवड केली जात होती. यामध्ये संरक्षक भिंत, अंगणवाडी इमारत, किचन शेड, सार्वजनिक शौचालय, ग्रामपंचायत भवन, स्मशान रोड, नळ योजनाची पाईप लाईन, सिमेंट रोड, डांबरीकरण, भुमिगत गटारे यासह अनेक कामांची निवड करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ग्रामीण आणि शहरी भागातील एक हजार १६६ कामे प्रस्तावित करण्यात आली. यासाठी ३४ कोटींचा रुपयांचा आराखडा राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. यातील पहिल्या टप्प्याचे २० कोटी रुपये प्राप्त झाले. त्यातून ७८९ कामे पूर्ण झाली आहे. यामध्ये सिमेंट रस्ते आणि डांबरीकरणाची कामे अधिक होती. चालू आर्थिक वर्षात ग्रामपंचायती आणि नगरपरिषदांनी ५३ कोटी ६८ लाख ८९ हजारांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये ६ कोटी ८६ लाख ५० हजार रुपयांची कामे आहेत. यातून एकूण एक हजार २९१ कामे करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव ग्रामीण विकास यंत्रणेने हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीपुढे ठेवला आहे. मात्र नियोज समितीची बैठक झाली नाही. त्यामुळे या प्रस्तावाला अजूनपर्यंत मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर हा प्रस्ताव राज्यशासनाकडून केंद्राकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे. केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर निधी येणार आहे. आता ही प्रक्रियाच ठप्प झाल्याने ग्रामीण कामांना खीळ बसणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)