शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

७८ हजार शेतकऱ्यांची रबी पीक विम्याकडे पाठ

By admin | Updated: January 3, 2016 03:04 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कधीही बसू शकतो याची जाणीव असतानाही जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार शेतकऱ्यांनी रबी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे.

माहितीच पोहोचली नाही : कृषी विभागाचे दुर्लक्षयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कधीही बसू शकतो याची जाणीव असतानाही जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार शेतकऱ्यांनी रबी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे. त्याचे कारणही तसेच आहे, बहुतांश शेतकऱ्यांंना या योजनेची माहितीच कृषी विभागामार्फत पोहोचली नाही. परिणामी रबी हंगामात गारपीट झालीच तर या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. यवतमाळ जिल्ह्यात रबी हंगामात एक लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गहू, हरभरा आणि इतर पिकांचा समावेश आहे. निसर्गाच्या अवकृपेत शेतकऱ्यांना सावरता यावे म्हणून पीक विमा योजना रबी हंगामासाठीही लागू करण्यात आली आहे. परंतु या पीक विम्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कृषी विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील केवळ २३ हजार शेतकऱ्यांनीच अंतिम मुदतीपर्यंत पीक विमा उतरविला. तर तब्बल ७८ हजार शेतकरी या पीक विम्यापासून अनभिज्ञ राहिले. विशेष म्हणजे या पीक विम्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कृषी सहायकांवर सोपविण्यात आली होती. परंतु त्यांनी शेतकऱ्यांना ही माहिती दिली नसल्याचा आरोप होत आहे. काही शेतकऱ्यांंना अंतिम मुदत असलेल्या ३१ डिसेंबर रोजी माहिती मिळाली. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात वेळ निघून गेला. (शहर वार्ताहर)