शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

७८ हजार शेतकऱ्यांची रबी पीक विम्याकडे पाठ

By admin | Updated: January 3, 2016 03:04 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कधीही बसू शकतो याची जाणीव असतानाही जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार शेतकऱ्यांनी रबी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे.

माहितीच पोहोचली नाही : कृषी विभागाचे दुर्लक्षयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका कधीही बसू शकतो याची जाणीव असतानाही जिल्ह्यातील तब्बल ७८ हजार शेतकऱ्यांनी रबी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे. त्याचे कारणही तसेच आहे, बहुतांश शेतकऱ्यांंना या योजनेची माहितीच कृषी विभागामार्फत पोहोचली नाही. परिणामी रबी हंगामात गारपीट झालीच तर या शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. यवतमाळ जिल्ह्यात रबी हंगामात एक लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गहू, हरभरा आणि इतर पिकांचा समावेश आहे. निसर्गाच्या अवकृपेत शेतकऱ्यांना सावरता यावे म्हणून पीक विमा योजना रबी हंगामासाठीही लागू करण्यात आली आहे. परंतु या पीक विम्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात कृषी विभाग अपयशी ठरल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील केवळ २३ हजार शेतकऱ्यांनीच अंतिम मुदतीपर्यंत पीक विमा उतरविला. तर तब्बल ७८ हजार शेतकरी या पीक विम्यापासून अनभिज्ञ राहिले. विशेष म्हणजे या पीक विम्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कृषी सहायकांवर सोपविण्यात आली होती. परंतु त्यांनी शेतकऱ्यांना ही माहिती दिली नसल्याचा आरोप होत आहे. काही शेतकऱ्यांंना अंतिम मुदत असलेल्या ३१ डिसेंबर रोजी माहिती मिळाली. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात वेळ निघून गेला. (शहर वार्ताहर)