शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

बच्चू कडूंपुढे प्रशासन नमले

By admin | Updated: January 10, 2017 01:35 IST

तालुक्यातील बंदी भागातील समस्या सोडविण्यासाठी मोरचंडी जंगलात उपोषणास बसलेल्या नागरिकांसाठी

आंदोलन : बंदी भागातील प्रश्नांवर बिटरगावात चर्चा उमरखेड : तालुक्यातील बंदी भागातील समस्या सोडविण्यासाठी मोरचंडी जंगलात उपोषणास बसलेल्या नागरिकांसाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू सोमवारी धावून आले. समस्या सुटल्याशिवाय बंदी भाग सोडणार नाही, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला. अखेर प्रशासनाने नमते घेत बिटरगाव ठाण्यात चर्चा केली. सकारात्मक तोडगा काढण्यात आला. बंदी भागातील विविध समस्यांसाठी मोरचंडी जंगलात नागरिकांनी उपोषणाला प्रारंभ केला होता. स्थानिक आमदारासह प्रशासनानेही याची दखल घेतली नाही. अखेर प्रहारचे आमदार बच्चू कडू सोमवारी मोरचंडी येथे पोहोचले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथूनच त्यांनी वन, महसूल आणि बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. समस्या सुटल्याशिवाय बंदी भाग सोडणार नाही, असे सांगितले. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. बिटरगाव पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी आमदार विजय खडसे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुदळे, उपविभागीय वन अधिकारी अमोल थोरात, वन्यजीवचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.आर. राठोड, वन हक्क व जंगल समितीचे भगवान देवसरकर, अनिल आडे, जीवन फोपसे, प्रमोद राठोड उपस्थित होते. त्यांच्यासोबत तासभर चर्चा झाली. प्रशासनाने मागण्या मान्य केल्या. परंतु सध्या आचारसंहिता असल्याने तत्काळ उपाययोजना करण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. त्यावर आमदार कडू यांनी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. सकारात्मक तोडगा निघाल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान मोरचंडी येथे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंदी भागातील सुमारे पाच हजार महिला उपस्थित होत्या. आंदोलनाची सांगता होण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)