शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वावटळीत सापडलेल्या ३० निराधार कोवळ्या कळ्यांचा ‘बाबूल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST

प्रकाश चव्हाण असे या ‘पित्या’चे नाव. तर त्याने पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेल्या २५-३० पोरींची नावे जाहीर करण्यावर कायद्याचे बंधन आहे. कारण पारधी बेड्यावर, पोडावर उगवलेल्या या कळ्यांना त्यांच्या जन्मदात्यांनीच पोटासाठी भिकेला लावले होते. काही तर चक्क गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या पोटी जन्माला आलेल्या. त्यांना शिकविणे, खाऊ घालणे तर दूरच पण मायेने कुरवाळण्याचीही फुरसद या ‘नैसर्गिक’ बापांना नव्हती.

ठळक मुद्देभिक्षेला लागलेल्या मुलींना शिक्षणमुली म्हणतात, ‘आम्ही साऱ्या सावित्री’

रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यांमध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम!30 मुली दुर्बल, वंचित घटकातील निराधार मुलींना आपल्या वसतिगृहात आधार देऊन त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना प्रकाश चव्हाण.अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लेकरू थकले तर कुरवाळणारा, शिकले तर कौतुक करणारा आणि चुकले तर गालफाडात थापड मारणारा बाप असतो. लेकरांना राग आला तरी कठोर चेहऱ्याने आणि आतल्या काळजीने तो लेकरांसाठीच धडपडत राहतो. पण अनेक अबोध बालिकांच्या नशिबी बालपणापासूनच हे पितृछत्र येत नाही. समाजातली दुष्ट प्रवृत्ती अशा कोवळ्या कळ्यांना कुस्करण्यासाठी चवताळलेलाच असतो. त्या विखारी नजरांपासून निराधार पोरींना वाचवित आईची माया देणाऱ्या ‘बाप माणसा’ची ही पुरोगामी कथा.प्रकाश चव्हाण असे या ‘पित्या’चे नाव. तर त्याने पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेल्या २५-३० पोरींची नावे जाहीर करण्यावर कायद्याचे बंधन आहे. कारण पारधी बेड्यावर, पोडावर उगवलेल्या या कळ्यांना त्यांच्या जन्मदात्यांनीच पोटासाठी भिकेला लावले होते. काही तर चक्क गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या पोटी जन्माला आलेल्या. त्यांना शिकविणे, खाऊ घालणे तर दूरच पण मायेने कुरवाळण्याचीही फुरसद या ‘नैसर्गिक’ बापांना नव्हती. अखेर प्रकाश चव्हाण यांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना यवतमाळात सुरक्षित केले. भाड्याच्या घरात त्यांच्यासाठी वसतिगृह निर्माण केले. महिना चार हजार रुपये भाडे आणि दहा हजार रुपयांचा किराणा भागविण्यासाठी ते कधी पदरमोड करतात तर कधी लोकवर्गणीसाठी पदर पसरतात. ‘आम्ही साऱ्या सावित्री’ असे नाव देऊन चालणारे हे वसतिगृह जणू सावित्रीबार्इंचाच वसा चालवित आहे. मूळचे हिवरा बु. येथील आणि आता बडनेऱ्याच्या महाविद्यालयात ग्रंथपाल असलेले प्रकाश चव्हाण यांनी स्वत: गरिबी भोगल्यानंतर हे पुरोगामी पाऊल उचलले आहे. त्यामुळे अकोला बाजार, वाघाडी, सावळी, गोपालनगर, धामणी, चिंचोली ता. दिग्रस, आसेगाव ता. बाभूळगाव, आजंती ता. नेर तसेच वाशिम जिल्ह्यातील खिनकिन्ही येथील मुलींना त्यांनी आधार दिला.यातील अनेक मुली हैदराबाद, चेन्नईमध्ये कामाला होत्या. सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात वसतिगृहात अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे. मात्र आम्ही त्यावर मात करीत सर्वांचा उदरनिर्वाह आणि शिक्षणाची व्यवस्था करीत आहोत.-इशू माळवे आणि पपिता माळवे, वसतिगृहातील काळजीवाहकया मुलींना वसतिगृहात ठेऊन आजूबाजूच्या शाळेत त्यांच्या वयानुसार दाखल केले आहे. आता ई-क्लास जमिनीवर तट्ट्याच्या चार खोल्या आम्ही उभारत आहोत. सध्या कोरोनाच्या संकटापायी अनेक गोरगरीब आपल्या मुलींचे बालविवाह करण्याच्या मन:स्थितीत आहे. अशा २० मुली आम्ही शोधल्या.-प्रकाश चव्हाणवसतिगृह संचालक

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिन