शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

बाबासाहेब आंबेडकरांचा लढा आत्मसन्मानाचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:09 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा सत्ता, संपत्तीसाठी नसून तो आत्मसन्मानाचा लढा होता.

ठळक मुद्देप्रशांत डोन्था : महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष व्याख्यान

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा सत्ता, संपत्तीसाठी नसून तो आत्मसन्मानाचा लढा होता. यासाठी आपल्याला संघर्ष सुरू ठेवावा लागेल, असे आवाहन हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकरी आंदोलनातील विद्यार्थी नेता तसा रोहित वेमुल्लाचा सहकारी प्रशांत डोन्था यांनी येथे केले.येथील आझाद मैदानावर आयोजित स्मृती पर्वात ते ‘फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून सांसदीय लोकशाही प्रणालीसमोरील धोके’ या विषयावर बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मृती पर्वात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औरंगाबाद येथील आत्मभान संघटनेचे युवा नेते सिद्धार्थ मोकळे यांचेदेखील व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी चंदन तेलंग होते. प्रशांत डोन्था म्हणाले, रोहित वेमुल्लाने आपले बलिदान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्व आणि सिद्धांतासाठी दिले. त्यांच्या बलिदानाने प्रखर जातीवाद पुन्हा एकदा जगाच्या पुढे उजागार झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिका भारताचे जनक असून ते मानवतावादी महापुरुष आहे. त्यांना कुण्या एका जातीधर्मात बंदिस्त करणे गैर असल्याचे त्यांनी सांगितले.समारोपीय कार्यक्रमप्रसंगी आनंद गायकवाड यांनी संपादित केलेल्या ‘मुक्काम पोस्ट पाटीपुरा’ या गं्रथाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामाबाई टेंभुर्णे, कमलाबाई गायकवाड, विठ्ठलराव पिंपळे, वसंतराव जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे पदाधिकारी बळी खैरे, गोपीचंद कांबळे, डॉ. सुभाष जमधाडे, डॉ. साहेबराव कदम, संजय मानकर, संजय ढोले, अ‍ॅड. सलीम शाह, घनश्याम भारशंकर, वसंत सरपे, अशोक भवरे, योगानंद टेंभुर्णे, संजय बोरकर, प्रा. अशोक कांबळे, गोविंद मेश्राम, संघमित्रा टेंभुर्णे, रवींद्र टेंभुर्णे, हेमंत कांबळे, प्रा. युवराज मानकर, सुमेध ठमके, जे.जे. काझी, प्रशिक भैसारे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.अ‍ॅड. संदीप नगराळे, संचालन सुनील वासनिक, तर आभार कवडू नगराळे यांनी मानले. भूमिका आनंद गायकवाड यांनी विषद केली. प्रारंभी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील भावपूर्ण गीतांचा कार्यक्रम घनश्याम पाटील व संचांने सादर केला. संचालन जगदीश भगत यांनी केले. यावेळी स्मृती पर्वाचे समन्वयक ज्ञानेश्वर गोरे, एम.के. कोडापे, संजय ढाकुलकर, अरविंद खोब्रागडे, चव्हाण, माया गोबरे, सुनीता काळे, मालती गायकवाड, सुनील पुनवटकर, रियाज सिद्दिकी, धनंजय गायकवाड उपस्थित होते.