शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

बाबासाहेब आंबेडकरांचा लढा आत्मसन्मानाचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:09 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा सत्ता, संपत्तीसाठी नसून तो आत्मसन्मानाचा लढा होता.

ठळक मुद्देप्रशांत डोन्था : महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष व्याख्यान

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा सत्ता, संपत्तीसाठी नसून तो आत्मसन्मानाचा लढा होता. यासाठी आपल्याला संघर्ष सुरू ठेवावा लागेल, असे आवाहन हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकरी आंदोलनातील विद्यार्थी नेता तसा रोहित वेमुल्लाचा सहकारी प्रशांत डोन्था यांनी येथे केले.येथील आझाद मैदानावर आयोजित स्मृती पर्वात ते ‘फुले-आंबेडकरी दृष्टीकोनातून सांसदीय लोकशाही प्रणालीसमोरील धोके’ या विषयावर बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्मृती पर्वात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी औरंगाबाद येथील आत्मभान संघटनेचे युवा नेते सिद्धार्थ मोकळे यांचेदेखील व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी चंदन तेलंग होते. प्रशांत डोन्था म्हणाले, रोहित वेमुल्लाने आपले बलिदान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्व आणि सिद्धांतासाठी दिले. त्यांच्या बलिदानाने प्रखर जातीवाद पुन्हा एकदा जगाच्या पुढे उजागार झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिका भारताचे जनक असून ते मानवतावादी महापुरुष आहे. त्यांना कुण्या एका जातीधर्मात बंदिस्त करणे गैर असल्याचे त्यांनी सांगितले.समारोपीय कार्यक्रमप्रसंगी आनंद गायकवाड यांनी संपादित केलेल्या ‘मुक्काम पोस्ट पाटीपुरा’ या गं्रथाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामाबाई टेंभुर्णे, कमलाबाई गायकवाड, विठ्ठलराव पिंपळे, वसंतराव जोगळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे पदाधिकारी बळी खैरे, गोपीचंद कांबळे, डॉ. सुभाष जमधाडे, डॉ. साहेबराव कदम, संजय मानकर, संजय ढोले, अ‍ॅड. सलीम शाह, घनश्याम भारशंकर, वसंत सरपे, अशोक भवरे, योगानंद टेंभुर्णे, संजय बोरकर, प्रा. अशोक कांबळे, गोविंद मेश्राम, संघमित्रा टेंभुर्णे, रवींद्र टेंभुर्णे, हेमंत कांबळे, प्रा. युवराज मानकर, सुमेध ठमके, जे.जे. काझी, प्रशिक भैसारे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.अ‍ॅड. संदीप नगराळे, संचालन सुनील वासनिक, तर आभार कवडू नगराळे यांनी मानले. भूमिका आनंद गायकवाड यांनी विषद केली. प्रारंभी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावरील भावपूर्ण गीतांचा कार्यक्रम घनश्याम पाटील व संचांने सादर केला. संचालन जगदीश भगत यांनी केले. यावेळी स्मृती पर्वाचे समन्वयक ज्ञानेश्वर गोरे, एम.के. कोडापे, संजय ढाकुलकर, अरविंद खोब्रागडे, चव्हाण, माया गोबरे, सुनीता काळे, मालती गायकवाड, सुनील पुनवटकर, रियाज सिद्दिकी, धनंजय गायकवाड उपस्थित होते.