शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जनगणना टाळणे हाच खरा ओबीसींचा अवमान; 'राष्ट्रीय पिछडा वर्ग’ने काढला मोर्चा 

By अविनाश साबापुरे | Updated: March 31, 2023 17:10 IST

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गजानन उल्हे यांच्या नेतृत्वात मोर्चा

यवतमाळ : ओबीसींचा अवमान झाला म्हणून केंद्रातील भाजप सरकार गवगवा करीत आहे. मात्र ओबीसींची जातवार जनगणना टाळणारे भाजप सरकारच ओबीसींचा खरा अवमान करीत आहे, अशी टीका करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) या संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. 

संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गजानन उल्हे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी संपूर्ण समाजबांधव संविधान चौकात गोळा झाले. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. निवडणुकीत इव्हीएम मशिनचा वापर करू नये, खासगी क्षेत्रातही एससी, एसटी, ओबीसींना आरक्षण लागू करावे, शेतकऱ्यांसाठी एमएसपी हमी कायदा करावा, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांची रोखलेली शिष्यवृत्ती ताबडतोब द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले. यावेळी गजानन उल्हे, दीपक प्रधान, किशोर राठोड, बळीराम दिवटे, सुरेंद्र परडके, हरीश राऊत, सारिका भगत, नीरज कचवे, विलास भोयर, प्रवीण गुजर, संदीप मून, दर्शन परडके, सुखदेव पंचभाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी स्वीकारले. 

यापुढे ५ एप्रिल रोजी देशातील ५६३ जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच १७ एप्रिल रोजी या सर्व ठिकाणी रॅली काढली जाणार आहे. तर आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात ३० एप्रिल रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात येणार आहे, असे गजानन उल्हे यांनी सांगितले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीagitationआंदोलनYavatmalयवतमाळ