शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ वाहकांच्या टपालभत्त्यास यवतमाळ आगारात टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

टपाल वाहतुकीची नोंद आगार पातळीवर घेतली जाते. टपालथैलीची ने-आण झाली असल्यास त्याची नोंद टी-२ए या रजिस्टरवर संबंधित लिपिकाकडून घेतली जाते. पगार देयक तयार करताना वाहकाला नोंदीनुसार टपालभत्ता दिला जातो. परंतु टपालभत्त्याची नोंद घेतली जात असली तरी वाहकांना त्यांचा या कामापोटीचा मेहनताना दरमहा मिळत नाही.

ठळक मुद्देपोस्टाकडून मात्र वसूल । कर्मचाऱ्यांच्या कामातील कुचराईने होत आहे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारातील वाहकांना टपालभत्त्यापासून वंचित राहावे लागत आहे. कर्मचाऱ्यांची कुचराई आणि आगारातील वरिष्ठांचा दुर्लक्षितपणा यामुळे वाहकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. महामंडळ डाक विभागाकडून टपालाची रक्कम वसूल करत असताना वाहकांना देण्यात अडचण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.एसटीच्या काही टपालफेऱ्या आहेत. मार्गात असलेल्या गावांमध्ये टपाल टाकण्याची संपूर्ण जबाबदारी वाहकांवर आहे. यासाठी त्यांना दरमहा टपालभत्ता निश्चित करण्यात आला आहे. टपाल वाहतुकीची नोंद आगार पातळीवर घेतली जाते. टपालथैलीची ने-आण झाली असल्यास त्याची नोंद टी-२ए या रजिस्टरवर संबंधित लिपिकाकडून घेतली जाते. पगार देयक तयार करताना वाहकाला नोंदीनुसार टपालभत्ता दिला जातो. परंतु टपालभत्त्याची नोंद घेतली जात असली तरी वाहकांना त्यांचा या कामापोटीचा मेहनताना दरमहा मिळत नाही. टपाल कोठून घ्यायची आणि कुठे टाकायची ही सर्व जबाबदारी वाहकांवर आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांना भत्त्याची रक्कम देण्यात बेजबाबदारपणा होत असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रामुख्याने यवतमाळ आगार पातळीवर हा प्रकार सातत्याने घडत आहे. संबंधित लिपिक, वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापकांची जबाबदारी असताना या बाबीकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाहकांच्या वेतनाचा आलेख पाहता आजच्या महागाईच्या काळात बराच खाली आलेला आहे. दैनंदिन गरजा भागविताना त्यांना मोठी कसरत करावी लागते. पाल्याचे शिक्षण, आरोग्य विषयक बाबी पार पाडताना होणाऱ्या खर्चामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहात आहे. टपालभत्त्यासारखा अतिरिक्त पैसा जवळ आल्यास काहीना काही प्रमाणात दिलासा मिळतो. मात्र यातही सातत्य नाही. वरिष्ठांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.नुकसान भरपाई होते वसूलटपालथैली संबंधित गावात पोहोचेपर्यंत वाहकांना त्यावर लक्ष ठेवावे लागते. ही थैली हाताळण्यात निष्काळजीपणा झाल्यास वाहकाविरूद्ध गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाते. नुकसान भरपाईलाही सामोरे जावे लागते. शिवाय टपालथैलीतील साहित्य खराब होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते.

टॅग्स :state transportएसटीPost Officeपोस्ट ऑफिस