शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

अवनीचे बछडे शिकारीसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 22:36 IST

आईच्या (अवनी) हत्येनंतर अनाथ झालेल्या दोन बछड्यांची चिंता आता मिटली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हे दोनही बछडे आता शिकार करायला लागल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

ठळक मुद्देचिंता मिटली : वाघासह बछड्यांना इतरत्र हलविणार, वनविभागाचा ‘वॉच’

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : आईच्या (अवनी) हत्येनंतर अनाथ झालेल्या दोन बछड्यांची चिंता आता मिटली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हे दोनही बछडे आता शिकार करायला लागल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे. पित्याच्या तालमीत या बछड्यांनी शिकारीचे प्रशिक्षण घेतले, असे वनविभागाचे अधिकारी सांगतात.१३ जणांच्या बळी घेणाऱ्या अवनी वाघिणीला २ नोव्हेंबरच्या रात्री गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. ही वाघीण दोन बछड्यांसह राळेगाव तालुक्यातील बोराटीच्या जंगलात वास्तव्याला होती. यादरम्यान नर वाघदेखिल तिच्यासोबत होता. दोन वर्षांत १३ जणांवर हल्ले करून ठार मारणाºया अवनीची पंचक्रोशीत दहशत पसरली होती. यामुळे ट्रॅन्क्युलाईज करून तिला पकडा अथवा वेळप्रसंगी ठार मारा, असे आदेशच न्यायालयाने दिले होते. मात्र वन्यजीवप्रेमींचा याला विरोध होता. वनविभागाचे २०० च्यावर अधिकारी व कर्मचारी बोराटीच्या जंगलात रात्रंदिवस अवनीचा शोध घेत होते. अखेर २ नोव्हेंबरच्या रात्री अवनी वनविभागाच्या पथकाच्या टप्प्यात आली आणि शार्पशुटर शहाफत अली खान याचा मुलगा अजगर अली याने अवनीला गोळ्या घातल्या.या घटनेनंतर अवनीच्या बछड्यांचे काय, असा प्रश्न वन्यजीव प्रेमींसह सर्वांनाच छळू लागला. वयाने लहान असल्याने हे बछडे शिकारही करू शकत नव्हते. त्यामुळे वनविभागाने या बछड्यांना पकडण्याची दुसरी मोहिम हाती घेतली. दोघांनाही ट्रँन्क्युलाईज करून सुरक्षित पकडण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता दोन बछड्यांसह नर वाघालाही ट्रँन्क्युलाईज करून अन्य जंगलात सोडण्याचा प्लॅन वनविभागाने आखला आहे.त्यासाठी वनविभागाचे पथक बोराटीच्या जंगलात डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे. ज्या परिसरात हे बछडे फिरत आहे, त्या परिसराला कंपाउंड करून बछडे व नर वाघाला पकडण्याचा प्रयत्न या पथकाकडून केला जात आहे. बछड्यांचे पगमार्क याच भागात आढळत असल्याने त्याचठिकाणी असल्याची खात्री वनविभागाला आहे.पितृत्वाच्या तालमीत शिकारीचे धडेअवनी वाघिण जीवंत असताना बछडे लहान असल्याने ती स्वत: शिकार करून आपल्या बछड्यांची भूक भागवित होती. आईच्या सावलीत वाढत असलेल्या बछड्यांना मात्र काही काळातच अनाथ व्हावे लागले. अवनीला ठार मारल्यानंतर नर वाघाने मात्र बछड्यांची साथ सोडली नाही. तो सावली बनून या बछड्यांच्या सोबत अजुनही भटकत आहे. भूकेने व्याकुळ होऊन बछड्यांचा मृत्यू होऊ नये म्हणून वनविभागाने डुकरांचे छोटे पिल्लंदेखिल त्या भागात सोडले. बछडे मात्र पित्याच्या तालमीत शिकारीचे धडे गिरवत होते. शिकारीत पारंगत होऊन हे बछडे अलिकडे आता स्वत:च शिकार करीत असल्याची माहिती एका जाणकार वन्यजीवप्रेमीने ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. असे असले तरी भविष्यात हे बछडे मोठे होऊन पुन्हा वाघ मानव संघर्ष पेटू नये, यासाठी बछडे व नर वाघाला ट्रँन्क्युलाईज करून पकडण्याच्या मोहिमेला वनविभागाने वेग दिला आहे.

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणTigerवाघ