शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

औरंगाबाद पोलीस आयुक्तांंचा तीन दिवस यवतमाळात मुक्काम

By admin | Updated: September 10, 2014 23:59 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गुरुवारपासून तीन दिवस यवतमाळ शहरात तळ ठोकून राहणार आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद

यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गुरुवारपासून तीन दिवस यवतमाळ शहरात तळ ठोकून राहणार आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी ते करणार आहेत. राजेंद्रसिंह ११, १२ व १३ सप्टेंबर असे तीन दिवस यवतमाळात चौकशी कामी स्वत: उपस्थित राहणार आहे. त्यांच्या नेतृत्वात चौकशी केली जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातच चौकशीचे हे कामकाज होणार आहे. या चौकशीच्या अनुषंगाने याचिकाकर्ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर, घाटंजी तालुक्यातील अन्य चार जण व प्रकरणाशी संंबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी अशा सर्वांनाच साक्ष देण्यासाठी समन्स जारी करण्यात आले आहे. सुरेश सोनकुसरे आणि अजय मोहिते या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण सन २००३ पासून गाजत आहे. या प्रकरणात शैलेश ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह यांच्याकडे या मृत्यू प्रकरणाची चौकशी सोपविली. शिवाय तीन महिन्यात हा चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेशही जारी करण्यात आले. विशेष असे याप्रकरणात मानवाधिकार आयोगाने चार वर्षांपूर्वी सर्व संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र सरकारने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला. त्याविरोधात शैलेश ठाकूर यांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा कायम ठेवला आहे. येथील धामणगाव रोड स्थित व्यापारी बजाज आणि डॉ. श्रोत्री यांच्याकडे २००३ मध्ये दरोडा पडला होता. या प्रकरणात संशयावरून येथील सुरेश सोनकुसरे आणि अजय मोहिते या दोन तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात असतानाच या दोघांचा मृत्यू झाला. (स्थानिक प्रतिनिधी)