शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद पोलीस आयुक्तांंचा तीन दिवस यवतमाळात मुक्काम

By admin | Updated: September 10, 2014 23:59 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गुरुवारपासून तीन दिवस यवतमाळ शहरात तळ ठोकून राहणार आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद

यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गुरुवारपासून तीन दिवस यवतमाळ शहरात तळ ठोकून राहणार आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी ते करणार आहेत. राजेंद्रसिंह ११, १२ व १३ सप्टेंबर असे तीन दिवस यवतमाळात चौकशी कामी स्वत: उपस्थित राहणार आहे. त्यांच्या नेतृत्वात चौकशी केली जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातच चौकशीचे हे कामकाज होणार आहे. या चौकशीच्या अनुषंगाने याचिकाकर्ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर, घाटंजी तालुक्यातील अन्य चार जण व प्रकरणाशी संंबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी अशा सर्वांनाच साक्ष देण्यासाठी समन्स जारी करण्यात आले आहे. सुरेश सोनकुसरे आणि अजय मोहिते या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण सन २००३ पासून गाजत आहे. या प्रकरणात शैलेश ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह यांच्याकडे या मृत्यू प्रकरणाची चौकशी सोपविली. शिवाय तीन महिन्यात हा चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेशही जारी करण्यात आले. विशेष असे याप्रकरणात मानवाधिकार आयोगाने चार वर्षांपूर्वी सर्व संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र सरकारने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला. त्याविरोधात शैलेश ठाकूर यांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा कायम ठेवला आहे. येथील धामणगाव रोड स्थित व्यापारी बजाज आणि डॉ. श्रोत्री यांच्याकडे २००३ मध्ये दरोडा पडला होता. या प्रकरणात संशयावरून येथील सुरेश सोनकुसरे आणि अजय मोहिते या दोन तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात असतानाच या दोघांचा मृत्यू झाला. (स्थानिक प्रतिनिधी)