शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

जत्रेच्या लिलावाचा तिढा सुटला

By admin | Updated: February 12, 2016 02:58 IST

रंगनाथ स्वामी यांच्या नावाने दरवर्षी वणीत तब्बल ३७ दिवसांची जत्रा भरते. मात्र या जत्रेच्या लिलावावरून नगरसेवकांमध्ये सुंदोपसुंदी सुरू होती.

अखेर हर्रास होणार : स्थायी समितीने घातला होता मधातच खोडावणी : रंगनाथ स्वामी यांच्या नावाने दरवर्षी वणीत तब्बल ३७ दिवसांची जत्रा भरते. मात्र या जत्रेच्या लिलावावरून नगरसेवकांमध्ये सुंदोपसुंदी सुरू होती. अखेर आता या जत्रेचा लिलाव करण्याचे निश्चत झाल्याने तिढा सुटला आहे.शहरातील जत्रा मैदानात दरवर्षी तब्बल ३७ दिवसांजी जत्रा भरते. ही जत्रा संपूर्ण राज्यात परिचित आहे. होळी सणापूर्वी या जत्रेला सुरूवात होते. जवळपास हनुमान जयंतीपर्यंत ही जत्रा सुरू असते. या जत्रेच्या निमित्ताते वणीत मोठा बैलबाजार भरतो. पूर्वी हा बाजार महाराष्ट्रातच नव्हे, तर मध्यप्रदेशातही मोठा बैलबाजार म्हणून ओळखला जात होता. या बैलबाजारात तब्बल ‘नॅनो‘च्या किमतीपेक्षाही महागड्या बैलजोड्या विक्रीस येत होत्या. आताही बैलजोड्या येतात. मात्र या जत्रेचे पूर्वीचे गतवैभव आता लोप पावत आहे. बैलबाजारावरही अवकळा आली आहे.जत्रा नगरपरिषदेच्या अखत्यारीत येते. आरोग्य समितीला जत्रेचे नियोजन करण्याबाबत अधिकार बहाल करण्यात आले आहे. त्यानुसार मागीलवर्षी आरोग्य समितीने तब्बल नऊ लाख १६ हजारांमध्ये जत्रेचा लिलाव केला होता. त्यापूर्वी काही वर्षे दुसऱ्याच पद्धतीने जत्रेचा कंत्राट दिला जात होता. गेल्यावर्षी आरोग्य समितीने मात्र जत्रेच्या लिलावातून पालिकेला तब्बल नऊ लाख १६ हजारांचा निधी मिळवून दिला. त्यानुसारच याहीवर्षी जत्रेचा लिलाव करणे अपेक्षित होते. मात्र आरोग्य समितीने बोलविलेल्या दोन बैठकांना काही सदस्य उपस्थितच राहिले नाही. तिसऱ्यांदा २१ जानेवारीला झालेल्या बैठकीत जत्रेच्या लिलावाचा ठराव अखेर पारित करण्यात आला. नगरपरिषदेत सध्या प्रचंड सुंदोपसुंदी सुरू आहे. त्यातूनच सुरूवातीला आरोग्य समितीच्या जत्रा लिलाव पद्धतीला काहींकडून खोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिणामी सतत दोनदा आरोग्य समितीची सभा रद्द झाली. त्यानंतर स्थायी समितीने पुढाकार घेत जत्रेच्या लिलावासंदर्भात शासन निर्णयानुसार कारवाई करावी, असे म्हणून लिलावाला बगल देण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे जत्रेचा लिलाव न होता, एखाद-दुसऱ्याला कमी पैशात जत्रेचा कंत्राट देण्याचा घाटच घालण्यात आला होता की काय, अशी शंका यामुळे निर्माण झाली. मात्र आता यावर पडदा पडला आहे. जत्रेचा लवकरच लिलाव करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके यांनी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)