शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे हमीभावाकडे लक्ष

By admin | Updated: September 19, 2016 01:18 IST

आता शेतकऱ्यांच्या शेतातील कापुस लवकरच हातात येणार आहे. त्यामुळे शासनाने कापसाचा हमी भाव त्वरित जाहीर करावा

उत्पादन खर्च वाढला : कापसाला हवा सहा हजार रूपये भाववणी : आता शेतकऱ्यांच्या शेतातील कापुस लवकरच हातात येणार आहे. त्यामुळे शासनाने कापसाचा हमी भाव त्वरित जाहीर करावा व हमीभाव कमीतकमी सहा हजार रूपये प्रतिक्विंटल असावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.शासनाने आमदारांचे वेतन व भत्ते वाढवून घेतले. नुकताच शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून दिला. त्याचप्रमाणे कृषी प्रधान देशातील अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे हमी दर वाढवून द्यावे, अशी बळीराजांची मागणी आहे. दिवसेंदिवस शेती लागवडीचा व मशागतीचा खर्च झपाट्याने वाढत आहे. सालगड्यांचे पॅकेज लाखाच्या वर गेले आहे. मजुरांचे दर २०० रूपये प्रतिदिनपेक्षा अधिक झाले आहे. बैलांच्या व शेती अवजारांच्या किंमती सतत वाढत आहे. रासायनीक खते व किटकनाशके, तणनाशके यांच्या किंमती दरवर्षी शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. मात्र शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचे दर ठरविण्याचा अधिकार नाही. शेतमालाचे हमी दर शासन जाहीर करते. त्यावरून मग व्यापारी आपले दर ठरवितात. त्यामुळे शासनाने शेतमालाचे हमी दर ठरविताना शेतमालाचा उत्पादन खर्च विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडतील, याचा विचार करणे गरजेचे आहे. १५ दिवसांत विदर्भातील कापुस व सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या घरात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या दोन्ही पिकांचे हमी दर शासन केव्हा जाहीर करते, याची आस लागली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी कर्ज काढूनच शेतीची लागवड केली आहे. त्यांच्या शिरावरील कर्जाचे ओझे हलके करण्यासाठी शासनाने शेतमालाला योग्य भाव देण्याची गरज आहे. कापुस पिकाला प्रति एकरी २०-२५ हजार रूपये खर्च झाल्याचे शेतकरी सांगतात. कापुस वेचणीचे दर अजून निघायचे आहे. कापुस वेचणीची घाई एकाच वेळी आल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण होतो. अशावेळी शेतकऱ्यांना मजुरांची हाजी-हाजी करावी लागते. त्यांनी शेतात ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी लागते. मजुराच्या टंचाईमुळे वेचणीचे दर वाढतात. मागीलवर्षी हे दर ७०० रूपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. मग प्रति एकरी पाच क्विंटल कापसाचे उत्पन्न झाल्यास व सहा हजार रूपये भाव असल्यास प्रती एकरी ३० हजार रूपये उत्पन्न मिळाले, तर शेतकऱ्यांना ५-१० हजार रूपये एकरी नफा मिळू शकतो. हासुद्धा नफा नसून त्याचे व त्याच्या कुटुंबाने अहोरात्र गाळलेल्या घामाची किंमत आहे. शासनाने गेल्या कित्येक वर्षांपासून कापसाचे हमी दर वाढविले नाही. तीन हजार ५०० ते तीन हजार ८०० रूपये या मर्यादेतच कापुस विकावा लागत आहे. शेतकऱ्यांना नफा होत नसल्याने वीज बील व कर्ज फेडणेसुद्धा अशक्यप्राय होते. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यापेक्षा कापुस व सोयाबीनचे हमी दर वाढवून शासनाने कापुस व सोयाबीनची खरेदी सुरू करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)