शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शेतकऱ्यांचे हमीभावाकडे लक्ष

By admin | Updated: September 19, 2016 01:18 IST

आता शेतकऱ्यांच्या शेतातील कापुस लवकरच हातात येणार आहे. त्यामुळे शासनाने कापसाचा हमी भाव त्वरित जाहीर करावा

उत्पादन खर्च वाढला : कापसाला हवा सहा हजार रूपये भाववणी : आता शेतकऱ्यांच्या शेतातील कापुस लवकरच हातात येणार आहे. त्यामुळे शासनाने कापसाचा हमी भाव त्वरित जाहीर करावा व हमीभाव कमीतकमी सहा हजार रूपये प्रतिक्विंटल असावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.शासनाने आमदारांचे वेतन व भत्ते वाढवून घेतले. नुकताच शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवून दिला. त्याचप्रमाणे कृषी प्रधान देशातील अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे हमी दर वाढवून द्यावे, अशी बळीराजांची मागणी आहे. दिवसेंदिवस शेती लागवडीचा व मशागतीचा खर्च झपाट्याने वाढत आहे. सालगड्यांचे पॅकेज लाखाच्या वर गेले आहे. मजुरांचे दर २०० रूपये प्रतिदिनपेक्षा अधिक झाले आहे. बैलांच्या व शेती अवजारांच्या किंमती सतत वाढत आहे. रासायनीक खते व किटकनाशके, तणनाशके यांच्या किंमती दरवर्षी शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. मात्र शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचे दर ठरविण्याचा अधिकार नाही. शेतमालाचे हमी दर शासन जाहीर करते. त्यावरून मग व्यापारी आपले दर ठरवितात. त्यामुळे शासनाने शेतमालाचे हमी दर ठरविताना शेतमालाचा उत्पादन खर्च विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडतील, याचा विचार करणे गरजेचे आहे. १५ दिवसांत विदर्भातील कापुस व सोयाबीन पीक शेतकऱ्यांच्या घरात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या दोन्ही पिकांचे हमी दर शासन केव्हा जाहीर करते, याची आस लागली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी कर्ज काढूनच शेतीची लागवड केली आहे. त्यांच्या शिरावरील कर्जाचे ओझे हलके करण्यासाठी शासनाने शेतमालाला योग्य भाव देण्याची गरज आहे. कापुस पिकाला प्रति एकरी २०-२५ हजार रूपये खर्च झाल्याचे शेतकरी सांगतात. कापुस वेचणीचे दर अजून निघायचे आहे. कापुस वेचणीची घाई एकाच वेळी आल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण होतो. अशावेळी शेतकऱ्यांना मजुरांची हाजी-हाजी करावी लागते. त्यांनी शेतात ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी लागते. मजुराच्या टंचाईमुळे वेचणीचे दर वाढतात. मागीलवर्षी हे दर ७०० रूपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. मग प्रति एकरी पाच क्विंटल कापसाचे उत्पन्न झाल्यास व सहा हजार रूपये भाव असल्यास प्रती एकरी ३० हजार रूपये उत्पन्न मिळाले, तर शेतकऱ्यांना ५-१० हजार रूपये एकरी नफा मिळू शकतो. हासुद्धा नफा नसून त्याचे व त्याच्या कुटुंबाने अहोरात्र गाळलेल्या घामाची किंमत आहे. शासनाने गेल्या कित्येक वर्षांपासून कापसाचे हमी दर वाढविले नाही. तीन हजार ५०० ते तीन हजार ८०० रूपये या मर्यादेतच कापुस विकावा लागत आहे. शेतकऱ्यांना नफा होत नसल्याने वीज बील व कर्ज फेडणेसुद्धा अशक्यप्राय होते. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यापेक्षा कापुस व सोयाबीनचे हमी दर वाढवून शासनाने कापुस व सोयाबीनची खरेदी सुरू करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)