शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

भारतीय संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न : प्रा. श्याम मानव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 16:56 IST

Yavatmal : उमरखेड येथे 'संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव'वर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यावर निर्माण केलेले संविधान हे प्रत्येक नागरिकासाठी सुरक्षित जीवनाची हमी देते. संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. संविधान वाचविण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केले आहे.

राजस्थानी भवन येथे बुधवारी आयोजित 'संविधान बचाव महाराष्ट्र बचाव' या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य दशरथ मडावी, सुरेश झुरमुरे उपस्थिते होते. अभ्यासपूर्ण व्याख्यानातून प्रा. मानव यांनी सद्यःस्थितीत चाललेल्या देशाच्या व राज्याच्या अनागोंदी कारभारावर सडकून टीका केली. सरकारने चालविलेल्या हुकूमशाही कारभाराला रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. 

जातीय सलोखा बिघडविण्याचे व अंधश्रद्धा, बुवाबाजीला खतपाणी घालण्याचे काम करीत आपली सत्ता टिकविण्यासाठी विरोधकांनाही नामोहरम करीत जेलमध्ये घालण्याचा कुटील प्रयत्न केंद्र सरकारने दहा वर्षांच्या कार्यकाळात केल्याचा आरोप प्रा. मानव यांनी केला. काँग्रेस सरकारच्या काळातील पायाभूत सरकारी कंपन्या बड्या उद्योगपतींना विकून देशाला कंगाल करण्याचा घाट सरकार करीत आहे. संविधानाशी फारकत घेऊन सरकारची वाटचाल सुरू आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व दिवसेंदिवस नैसर्गिक संकटात वाढ होत असल्याने देशात शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढत आहे. संविधान निर्मितीमागे देश हिताची तळमळ होती. संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले. ते एससी, एसटी, ओबीसी यांच्यासाठीच आहे, असा संभ्रम लोकांमध्ये पसरविण्यात येत असल्याचे प्रा. मानव म्हणाले. यावेळी २७ वर्षांपासून उमरखेड तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम निस्वार्थ भावनेने करून वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रामीण भागात रुजवणारे अंनिसचे अध्यक्ष माधवराव चौधरी व सचिव राजीव गायकवाड यांचा श्याम मानव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन देवानंद मोरे यांनी केले. 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ