शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

युती शासनाच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:14 IST

राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ६४ वर्षांच्या म्हातारीपासून कोवळ्या मुलीही सुरक्षित नाही. क्राईम रेट वाढला.

ठळक मुद्देचित्रा वाघ : दारव्हा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ६४ वर्षांच्या म्हातारीपासून कोवळ्या मुलीही सुरक्षित नाही. क्राईम रेट वाढला. शिक्षेचे प्रमाण मात्र कमी असताना गृह खाते उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केला.येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आयोजित महिला मेळावा व महिला बचत गट मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग होते. मंचावर प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, माजी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,ज्येष्ठ नेते अ‍ॅड.शंकराव राठोड, उत्तमराव शेळके, राकाँ महिला जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, राजेंद्र पाटील, डॉ.महेंद्र लोढा, निलीमा काळे उपस्थित होत्या. चित्राताई वाघ म्हणाल्या, सध्याच्या काळात कोणताही घटक सुखी नाही. ३० टक्के तरुणाईने विश्वास ठेवून युतीचे सरकार आणले. मात्र बेरोजगारीमुळे आज त्या तरुणांचा आक्रोश पाहायला मिळतो. वाढत्या महागाईमुळे महिलांचे बजेट कोलमडले असुन त्यांना घर कसे चालवावे, असा प्रश्न पडला. मात्र सरकार ठोस उपाययोजना करीत नाही. ‘उज्वला’ योजनेतून केवळ गॅस देऊन चालत नाही, तर त्यासाठी ९०० रूपयांचे सिलिंडर घ्यावे लागते, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी अर्ध्या किमतीत गॅस सिलिंडर, सॅनिटरी पॅड जीएसटी मुक्त करावे, आदी मागण्या त्यांनी केल्या.कार्यक्रमाला हरिश कुडे, लालजी राऊत, नानाभाऊ भोकरे, अ‍ॅड.दिलीप देशमुख, मनीषा काटे, प्रवीण खेवले, लालसिंग राठोड, युवराज अर्मळ, सारिका ताजने, इरफान अकबानी आदी उपस्थित होते. संचालन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष गोदावरी पाटील, प्रास्ताविक प्रा.सुषमा गावंडे, तर आभार शहराध्यक्ष नलिनी राठोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष प्रा.चरण पवार, शहराध्यक्ष नासिर शेख, प्रा.सुभाष गावंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.बोंडअळीची मदत, विमा भरपाई, हल्लाबोलचे यशबोंडअळीची मदत आणि पीक विम्याची नुकसान भरपाई, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नेर तालुक्यात भेट दिल्यानंतर केलेला पाठपुरावा आणि पक्षातर्फे यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल मोर्चा काढून केलेल्या आंदोलनाचे यश असल्याचा दावा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ आणि आमदार ख्वाजा बेग यांनी पत्रकार परिषदेत केला. आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ुजनतेशी संवाद साधून या सरकारचे खरे रूप उघड करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोग लागू करणे, दोन कोटी नोकऱ्या, महागाई कमी करणे, महिला सुरक्षा, टोलमुक्त व खड्डेमुक्त महाराष्ट्र, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र एकही पूर्ण केले नसून हे केवळ फेकू सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस