शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

युती शासनाच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:14 IST

राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ६४ वर्षांच्या म्हातारीपासून कोवळ्या मुलीही सुरक्षित नाही. क्राईम रेट वाढला.

ठळक मुद्देचित्रा वाघ : दारव्हा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : राज्यात युती सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ६४ वर्षांच्या म्हातारीपासून कोवळ्या मुलीही सुरक्षित नाही. क्राईम रेट वाढला. शिक्षेचे प्रमाण मात्र कमी असताना गृह खाते उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केला.येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे आयोजित महिला मेळावा व महिला बचत गट मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग होते. मंचावर प्रदेश सरचिटणीस वसंतराव घुईखेडकर, माजी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,ज्येष्ठ नेते अ‍ॅड.शंकराव राठोड, उत्तमराव शेळके, राकाँ महिला जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, राजेंद्र पाटील, डॉ.महेंद्र लोढा, निलीमा काळे उपस्थित होत्या. चित्राताई वाघ म्हणाल्या, सध्याच्या काळात कोणताही घटक सुखी नाही. ३० टक्के तरुणाईने विश्वास ठेवून युतीचे सरकार आणले. मात्र बेरोजगारीमुळे आज त्या तरुणांचा आक्रोश पाहायला मिळतो. वाढत्या महागाईमुळे महिलांचे बजेट कोलमडले असुन त्यांना घर कसे चालवावे, असा प्रश्न पडला. मात्र सरकार ठोस उपाययोजना करीत नाही. ‘उज्वला’ योजनेतून केवळ गॅस देऊन चालत नाही, तर त्यासाठी ९०० रूपयांचे सिलिंडर घ्यावे लागते, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी अर्ध्या किमतीत गॅस सिलिंडर, सॅनिटरी पॅड जीएसटी मुक्त करावे, आदी मागण्या त्यांनी केल्या.कार्यक्रमाला हरिश कुडे, लालजी राऊत, नानाभाऊ भोकरे, अ‍ॅड.दिलीप देशमुख, मनीषा काटे, प्रवीण खेवले, लालसिंग राठोड, युवराज अर्मळ, सारिका ताजने, इरफान अकबानी आदी उपस्थित होते. संचालन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष गोदावरी पाटील, प्रास्ताविक प्रा.सुषमा गावंडे, तर आभार शहराध्यक्ष नलिनी राठोड यांनी मानले. यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष प्रा.चरण पवार, शहराध्यक्ष नासिर शेख, प्रा.सुभाष गावंडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.बोंडअळीची मदत, विमा भरपाई, हल्लाबोलचे यशबोंडअळीची मदत आणि पीक विम्याची नुकसान भरपाई, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नेर तालुक्यात भेट दिल्यानंतर केलेला पाठपुरावा आणि पक्षातर्फे यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल मोर्चा काढून केलेल्या आंदोलनाचे यश असल्याचा दावा महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ आणि आमदार ख्वाजा बेग यांनी पत्रकार परिषदेत केला. आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ुजनतेशी संवाद साधून या सरकारचे खरे रूप उघड करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोग लागू करणे, दोन कोटी नोकऱ्या, महागाई कमी करणे, महिला सुरक्षा, टोलमुक्त व खड्डेमुक्त महाराष्ट्र, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र एकही पूर्ण केले नसून हे केवळ फेकू सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस