शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

सुट्यांमुळे एटीएममध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:10 IST

बँकांना सलग चार दिवस सुटी आल्याने बँकांचा संपूर्ण आर्थिक भार एटीएमवर आला. एटीएममध्ये पैसे साठविण्याची मर्यादा आहे. यामुळे एटीएमचे चक्र प्रभावित झाले असून पैसे नसल्याने ग्राहकांना एटीएममधून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

ठळक मुद्देग्राहकांची तोबा गर्दी : केवळ कागदाचे चिटोरे, जिल्ह्यात १८४ एटीएम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बँकांना सलग चार दिवस सुटी आल्याने बँकांचा संपूर्ण आर्थिक भार एटीएमवर आला. एटीएममध्ये पैसे साठविण्याची मर्यादा आहे. यामुळे एटीएमचे चक्र प्रभावित झाले असून पैसे नसल्याने ग्राहकांना एटीएममधून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.जिल्ह्यात विविध बँकांचे १८४ एटीएम आहेत. यामध्ये सर्वाधिक एटीएम स्टेट बँकेचे आहेत. यासोबत विविध बँकांचे एटीएम आहेत. प्रत्येक एटीएममध्ये १० ते २५ लाख रूपयांपर्यंतची रक्कम साठविता येते. सर्व एटीएम सुरू राहिल्यास हे पैसे दोन ते तीन दिवस पुरतात. वर्दळ वाढल्यास हे सर्वच पैसे अपुरे पडतात. शनिवारपासून बँका बंद आहेत. यामुळे शुक्रवारी टाकलेले पैसे काही एटीएममध्ये शनिवारपर्यंत पुरले, तर बहुतांश एटीएम रविवारी दुपारपर्यंत सुरू होते. दुपारनंतर एटीएममध्ये खडखडाट पहायला मिळाला.या ठिकाणी येणारा प्रत्येकजण एटीएमपासून रिकाम्या हाताने परत येत होता. यामुळे एटीएममध्ये पैशाच्याच ‘स्लिप’ निघाल्या. पैसे मात्र निघालेच नाही. शहरासह तालुका ठिकाणच्या प्रत्येक एटीएममध्ये नागरिक येरझारा मारतानाचे चित्र पहायला मिळाले. या एटीएममध्ये बुधवारीच पैसे जमा होणार आहे. तोपर्यंत ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.लग्नाचे आंदण उधारीवर देणार कोण?एप्रिल महिन्यात लग्नाच्या सर्वाधिक तिथी आहेत. दुकानात जाण्यापूर्वी एटीएममधून पैसे काढू, असे म्हणत अनेकांनी वेळेवर एटीएमकडे धाव घेतली. मात्र एटीएममध्ये पैसाच नव्हता. अशावेळी लग्नात दिले जाणारे प्रेझेंट घेण्यासाठी पर्याय म्हणून स्वाईप कार्ड वापरण्याला पसंती दिली गेली. मात्र अनेकांकडे स्वाईप मशिनही नाही. यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.एटीएममध्ये सुरक्षा गार्डही दिसेनापैसे नसल्याने काही एटीएमला ‘कॅश नाही’ असे बोर्ड लावले गेले. काही ठिकाणी पैसे नसतानाही कुठलेही बोर्ड नव्हते. अशा ठिकाणी सुरक्षा गार्ड दिसला नाही. यामुळे संपलेले पैसे कधी येतील, असेही अनेकांना विचारता आले नाही.