शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

सुट्यांमुळे एटीएममध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:10 IST

बँकांना सलग चार दिवस सुटी आल्याने बँकांचा संपूर्ण आर्थिक भार एटीएमवर आला. एटीएममध्ये पैसे साठविण्याची मर्यादा आहे. यामुळे एटीएमचे चक्र प्रभावित झाले असून पैसे नसल्याने ग्राहकांना एटीएममधून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

ठळक मुद्देग्राहकांची तोबा गर्दी : केवळ कागदाचे चिटोरे, जिल्ह्यात १८४ एटीएम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बँकांना सलग चार दिवस सुटी आल्याने बँकांचा संपूर्ण आर्थिक भार एटीएमवर आला. एटीएममध्ये पैसे साठविण्याची मर्यादा आहे. यामुळे एटीएमचे चक्र प्रभावित झाले असून पैसे नसल्याने ग्राहकांना एटीएममधून रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.जिल्ह्यात विविध बँकांचे १८४ एटीएम आहेत. यामध्ये सर्वाधिक एटीएम स्टेट बँकेचे आहेत. यासोबत विविध बँकांचे एटीएम आहेत. प्रत्येक एटीएममध्ये १० ते २५ लाख रूपयांपर्यंतची रक्कम साठविता येते. सर्व एटीएम सुरू राहिल्यास हे पैसे दोन ते तीन दिवस पुरतात. वर्दळ वाढल्यास हे सर्वच पैसे अपुरे पडतात. शनिवारपासून बँका बंद आहेत. यामुळे शुक्रवारी टाकलेले पैसे काही एटीएममध्ये शनिवारपर्यंत पुरले, तर बहुतांश एटीएम रविवारी दुपारपर्यंत सुरू होते. दुपारनंतर एटीएममध्ये खडखडाट पहायला मिळाला.या ठिकाणी येणारा प्रत्येकजण एटीएमपासून रिकाम्या हाताने परत येत होता. यामुळे एटीएममध्ये पैशाच्याच ‘स्लिप’ निघाल्या. पैसे मात्र निघालेच नाही. शहरासह तालुका ठिकाणच्या प्रत्येक एटीएममध्ये नागरिक येरझारा मारतानाचे चित्र पहायला मिळाले. या एटीएममध्ये बुधवारीच पैसे जमा होणार आहे. तोपर्यंत ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.लग्नाचे आंदण उधारीवर देणार कोण?एप्रिल महिन्यात लग्नाच्या सर्वाधिक तिथी आहेत. दुकानात जाण्यापूर्वी एटीएममधून पैसे काढू, असे म्हणत अनेकांनी वेळेवर एटीएमकडे धाव घेतली. मात्र एटीएममध्ये पैसाच नव्हता. अशावेळी लग्नात दिले जाणारे प्रेझेंट घेण्यासाठी पर्याय म्हणून स्वाईप कार्ड वापरण्याला पसंती दिली गेली. मात्र अनेकांकडे स्वाईप मशिनही नाही. यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.एटीएममध्ये सुरक्षा गार्डही दिसेनापैसे नसल्याने काही एटीएमला ‘कॅश नाही’ असे बोर्ड लावले गेले. काही ठिकाणी पैसे नसतानाही कुठलेही बोर्ड नव्हते. अशा ठिकाणी सुरक्षा गार्ड दिसला नाही. यामुळे संपलेले पैसे कधी येतील, असेही अनेकांना विचारता आले नाही.